शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

मध्य प्रदेशातील अपघाताचा धसका

By admin | Updated: August 7, 2015 03:02 IST

मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा धसका मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे.

वेगावर नियंत्रण : नदीवरील बांधांची पाहणी, पुलांवर वॉचमनची ड्युटीनागपूर : मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा धसका मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे. रेल्वे रुळांना प्रभावित करणाऱ्या नदीवरील बांधांची मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे पाहणी करण्यात येत आहे. अभियांत्रिकी आणि सिंचन विभागाचे अधिकारी या बांधांची माहिती घेत असून राज्य शासनालाही बांधावरून पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्व रेल्वे रुळावर पावसाळ्यात गस्त वाढविण्यात आली आहे. पहिल्यांदाच रेल्वे पुलांवर वॉचमनची ड्युटी लावण्यात आली आहे. रेल्वे येण्यापूर्वी पुलाकडील भागात पाऊस पडल्याची सूचना हे वॉचमन देणार आहेत. सूचना मिळताच रेल्वेगाड्यांना थांबविण्यात येईल किंवा कमी वेगाने गाड्या चालविण्यात येतील. अशा प्रकारची घटना सिंदी-तुळजापूर रेल्वे मार्गावर १९ जुलै २०१३ रोजी घडली होती. रुळाखालील माती वाहून गेल्यामुळे रेल्वे रुळ हवेत लोंबले होते. या घटनेत ४० मीटर रेल्वे रुळाखालील माती वाहून गेली होती. परंतु या घटनेची पूर्वसूचना मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. दरम्यान पावसामुळे रेल्वेगाड्या कमी वेगाने चालविण्यात येणार असून संवेदनशील भागात ९० ऐवजी ७५ किलोमीटर प्रतितास वेग ठरवून देण्यात आला आहे. तसेच रेल्वे रुळावर पाणी जमा झाल्यास ५० किलोमीटरच्या अधिक वेगाने गाड्या चालविण्यात येणार नसल्याची माहिती वरिष्ठ विभागीय अभियंता डी. आर. टेंभुर्णे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)