शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

कीटकनाशकांमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी कृषी मंत्रालय दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:59 IST

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भातील शेतकºयांच्या मृत्यूप्रकरणी राजकारण तापले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शासनावर टीकास्त्र सोडले आहे.

ठळक मुद्देशरद पवारांचा आरोप : कर्जमाफीची नियोजनशून्य अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भातील शेतकºयांच्या मृत्यूप्रकरणी राजकारण तापले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शासनावर टीकास्त्र सोडले आहे. प्रशासकीय परवानगीशिवाय कुठलेही कीटकनाशक बाजारात येऊच शकत नाही. या प्रकरणात कृषी मंत्रालयच दोषी असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.अमरावती येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शरद पवार सोमवारी सकाळच्या सुमारास नागपूर विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कीटकनाशक नियंत्रणासाठी कायदा आहे व वापरासाठी स्वतंत्र संशोधन संस्थादेखील आहे. संस्थेच्या मान्यतेशिवाय कुठलेही कीटकनाशक बाजारात येऊ शकत नाही. आम्ही आमच्या कार्यकाळात नियमांचे काटेकोरपणे पालन केले. गेल्या तीन वर्षात काय झाले माहीत नाही. या प्रकरणात संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. आमच्या काळात जे नियमांचे उल्लंघन करून विक्री करायचे, त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई केली होती, अशी आठवण त्यांनी करून दिली.राज्यात शेतकºयांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र ही कर्जमाफी नियोजनशून्य असल्याचे दिसून येत आहे. कर्ज न घेतलेल्या शेतकºयांना पत्रे आली. सुधारणा करण्यासाठी शासनाला १५ दिवसांचा वेळ देऊ, नाहीतर पुढील दिशा ठरवू, असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला. दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वादावर काहीच भाष्य करणार नसल्याचे सांगितले.नियमात अडकून न पडता शेतकºयांना मदत करापरतीच्या पावसामुळे विदर्भात सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले आहे . केंद्र व राज्य शासनाने नियमात अडकून न पडता शेतकºयांना मदत केली पाहिजे . यासंदर्भात राज्य शासनाशी बोलणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितले.