शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

हिवाळी अधिवेशनात मंत्री- अधिकारी पिणार ५० लाख रुपयांचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 08:20 IST

Nagpur News हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाटली बंद पाणी पाजण्यावर जवळपास ५० लाख रुपयाचा खर्च होणार असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे५ ते १० टक्के अधिक दरावर उघडल्या निविदा 

कमल शर्मा

नागपूर : येत्या १९ डिसेंबरपासून सुुरू होणारे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या दरम्यान मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाटलीबंद पाणी देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी)एकूण ४६.५ लाख रुपयाची निविदा जारी केली. एजन्सींनी एक पाऊल पुढे जाऊन संगनमत करून निविदा भरल्या. परिणामी ५ ते १० टक्के अधिक दराने निविदा उघडल्या. त्यामुळे हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाटली बंद पाणी पाजण्यावर जवळपास ५० लाख रुपयाचा खर्च होणार असल्याचे दिसून येत आहे.

पाणी पुरवठ्यावर दरवर्षीच भरभक्कम निधी खर्च होते. पीडब्ल्यूडीचे म्हणणे आहे की, पॅकेट बंद वस्तुंवर ६ टक्के अधिक जीएसटी लागत असल्यामुळे दर थोडे वाढले आहेत. पाणी पुरवठ्यासाठी सर्वाधिक खर्च विधानभवनात अपेक्षित आहे. यासाठी २१.५ लाख रुपयाच्या निविदा जारी झाल्या आहेत. रवि भवनासाठी १६.५० लाख व आमदार निवासात ८.५ लाख रुपये पाणी पुरवठ्यावर खर्च अपेक्षित आहे.

पाणीपुरवठा हा २० लिटरच्या कॅनसह एक लीटर व २५० मिलीलिटरच्या बाटलीद्वारे केली जाईल. बहुतांश पाणी पुरवठा मंत्र्यांचे केबिन, बंगले, आमदार निवासात आमदारांच्या खोल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये केला जाईल. पीडब्ल्यूडीने यासाठी दर निश्चित करून निविदा जारी केली होती. परंतु एजन्सींनी संगनमत करीत अधिक दर कोट केले आहेत. ऑनलाइन निविदा असुनही एजन्सींनी दर वाडवण्यासाठी टेंडर फिक्सींग केल्याचा आरोपही केला जात आहे.

मनपाच्या पाणी पुरवठ्यावर विश्वास नाही का?

नागपूर महानगरपालिका शहरात पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळते. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध केले जा असल्याचा दावाही केला जातो. परंतु मंत्री आणि अधिकाऱ्यांना कदाचित मनपाच्या पाणीपुरवठ्यावर विश्वास नाही. त्यामुळे त्यांना बाटलीबंद पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ५० लाख रुपये खर्च करावे लागत आहे. स्थानिक अधिकारीसुद्धा दबक्या आवाजात सांगतात की आम्ही काय करू, बाटलीबंद पाण्याचीच मागणी होत असते.

 

एजन्सींशी होणार चर्चा -पीडब्ल्यूडी

५ ते १० टक्के अधिक दरावर निविदा उघडल्याची बाब पीडब्ल्यूडीने मान्य केली आहे. विभागाचे म्हणणे आहे की, ई-टेंडर जारी झाले होते. दरसुद्धा परवडण्यासारखे होते. २०१९ च्या तुलनेत या वेळी दर कमी ठेवण्यात आले आहेत. निविदा निश्चित झाली आहे. परंतु वर्क ऑर्डर द्यायचे आहे. परंतु त्यापूर्वी एजन्सींशी चर्चा करून दर कमी करण्याची विनंती केली जाईल.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन