पोलीस पोहोचल्यावर तणाव निवळलानागपूर : मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी ऐवजदार कर्मचाऱ्यांनी बुधवारी महापालिकेत एकच गोंधळ घातला. मानधनाबाबत चर्चा करण्यासाठी ऐवजदारांनी आयुक्तांची वेळ घेतली होती. मात्र, चर्चेसाठी ऐवजदार पोहोचताच आयुक्त दुसऱ्या कामासाठी निघून गेले. त्यामुळे ऐवजदार संतापले.ऐवजदार सफाई कामगार श्रमिक संघाच्या बॅनरखाली १०० हून अधिक ऐवजदार महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचले. आयुक्तांचा जन्मदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी पुष्पगुच्छही आणला होता. मात्र, आयुक्त पूर्वीच निघून गेले. त्यानंतरही दोन तास ऐवजदार तेथे आयुक्तांची वाट पाहत बसले. आयुक्तांविरोधात नारेबाजी केली. शेवटी वाढता तणाव पाहून प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. आंदोलक तोडफोड करण्याच्या विचारात होते. मात्र पोलीस बंदोबस्त पाहून त्यांनी विचार बदलला. सुभाष सहारे, रूपचंद सोनटक्के, सुनील जाधव, अविनाश डेलीकर आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. (प्रतिनिधी)
ऐवजदारांचा मनपात गोंधळ
By admin | Updated: July 3, 2014 01:00 IST