शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

मनात रुंजी घालणारा कार्यक्रम ‘गंध प्रीतीचा’

By admin | Updated: May 25, 2016 02:55 IST

प्रेम हीच खरी शाश्वत भावना आहे. जगात मोठमोठ्या क्रांती प्रेमाच्या भरवशावर झाल्यात हा इतिहासही आहे.

राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन : १०० वर्षांतील प्रेमकवितांचे अभिवाचननागपूर : प्रेम हीच खरी शाश्वत भावना आहे. जगात मोठमोठ्या क्रांती प्रेमाच्या भरवशावर झाल्यात हा इतिहासही आहे. त्यामुळेच कदाचित जगातल्या कुठल्याही कवीला, कलावंताला प्रेम ही भावना कधीच टाळता आली नाही. किंबहुना ती टाळता येणे अशक्यच आहे. हळुवार मनात घर करणारी, विरहार्त व्याकुळ करणारी आणि हुरहुर लावणारी, आनंदी करणारी, आयुष्य बदलून टाकणारी आणि आयुष्य व्यापून उरणारी, प्रेमाचे दु:खही हळवे आणि सुखही टचकन डोळ्यात आनंदाश्रु आणणारे. माणूस कितीही पांडित्यपूर्ण आणि प्रगल्भतेचा आव आणणारा असला तरी प्रेम ही भावना त्यात असतेच. प्रेमाचे अनेक पदर असतात, पैलू असतात, अनेक नात्यांमध्ये प्रेमाच्या विविध छटाही असतात. प्रेमाच्या या सर्व पैलूंना स्पर्श करणारा अभिवाचनाचा आणि सुरेलतेचा स्पर्श असणारा कार्यक्रम ‘गंध प्रीतीचा’ रसिकांच्या आठवणीत राहणारा ठरला.राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने राम गणेश गडकरी यांच्या १३१ व्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजीतबाबू देशमुख, गिरीश गांधी, डॉ. अविनाश रोडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची भूमिका शुभदा फडणवीस यांनी सांगितली आणि कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, अनुराधा मराठे आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचे अभिवाचन कवितांना अर्थप्रवाही करणारे होते. बालकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे आणि गोविंदाग्रज म्हणून कविता करणारे गडकरी म्हणजे अजब रसायन. या मनस्वी प्रतिभावंतांच्या गद्य आणि पद्य अभिवाचनाने कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या नाटकातील पदे, संवाद आणि कवितांच्या सादरीकरणाने सुरू झालेला हा प्रवास शंभर वर्षांच्या प्रेमकवितेचा धांडोळा घेत मनात रुंजी घालत राहिला. गडकऱ्यांना प्रेमाचे शाहिर असे संबोधन लावले जाते. त्यामुळेच शंभर वर्षातील प्रेमकवितांना स्पर्श करताना केशवसूत, भा. रा. तांबे, उपाध्ये, बालकवी, रॉय किणीकर, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, पद्मा शेळके, इंदिरा संत, वसंत बापट, शंकर वैद्य, सुरेश भट, दासु वैद्य, सुधीर मोघे, अरुण कोल्हटकर, पु. शी. रेगे, कवी अनिल, अरुणा ढेरे असा हा प्रवास आनंददायी झाला. याप्रसंगी अनुराधा मराठे यांनी काही कविता गेय स्वरुपात सादर करून रसिकांना आनंद दिला. (प्रतिनिधी)