शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

लाखो रुपयांची विज्ञान केंद्र धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:09 IST

सर्व शिक्षा अभियानातून किमान १०० जि. प. शाळांना मिळाले केंद्र : उपयोगिता शून्य नागपूर : सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा ...

सर्व शिक्षा अभियानातून किमान १०० जि. प. शाळांना मिळाले केंद्र : उपयोगिता शून्य

नागपूर : सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेच्या शाळेत अतिशय दर्जेदार व अत्याधुनिक विज्ञान केंद्र तयार करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात किमान १०० शाळांमध्ये हे केंद्र आहे. मात्र, बहुतांश शाळांमध्ये याची उपयोगिता शून्य असून, काही शाळांमध्ये विज्ञान केंद्रातील साहित्य धूळखात पडले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यातून भविष्याचा मार्ग सुकर व्हावा, या उद्देशातून अतिशय दर्जेदार आणि अत्याधुनिक विज्ञान केंद्र सर्व शिक्षा अभियानातून या शाळांना देण्यात आले. वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना प्रयोगातून विज्ञान शिकण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. विज्ञानाच्या सर्वच शाखांचे प्रयोग साहित्य यात आहे. यात काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणेसुद्धा आहेत. विज्ञान केंद्रासाठी चुकीच्या शाळेची निवड करण्यात आल्याने ही विज्ञान केंद्र उपयोगिताशून्य ठरत आहेत.

- २३ शाळांमध्ये विज्ञान केंद्रासाठी वर्गखोलीच नाही

यु-डायसमधील पटसंख्येच्या आधारावर शासनाने शाळांची परस्पर निवड केली आणि केंद्रासाठी परस्पर साहित्य पाठविण्यात आले. परंतु निवड करण्यात आलेल्या २३ शाळांमध्ये विज्ञान केंद्रासाठी वर्गखोलीच उपलब्ध नसल्याने विज्ञानाचे साहित्य अडगळीत पडले आहे. यातील काही शाळांमधील थकीत बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही शाळांमध्ये तर विज्ञानाचे शिक्षकच नसल्याने केंद्राचा उपयोग झाला नाही. काही शाळांमध्ये लाखो रुपयांचे साहित्य कुलूपबंद असून, धूळखात पडले आहे.

- त्रुटींचे अहवाल दिल्यानंतरही सुधारणा नाही

विज्ञानकेंद्राचे साहित्य शाळेत पाठविल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला त्याच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले. शिक्षण विभागाने विज्ञान केंद्राच्या त्रुटींचा अहवाल दिल्यानंतरही त्यात सुधारणा करण्यात आल्या नाहीत. लाखो रुपये खर्चून साकारलेले विज्ञान केंद्र बंद

असल्याने शासनाच्या उद्देशाला हरताळच फासला जात आहे.

- शिक्षण विभागाशी समन्वयच साधला नाही

यु-डायसच्या अहवालावरून शासनाने शाळांची परस्पर निवड केली. शाळेतील सुविधांचा आढावा घेतला नाही. शिक्षण विभागाशी समन्वय साधला नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे साहित्य धूळखात आहे. २३ शाळांनी विज्ञान केंद्रासाठी खोल्यांची मागणी केली आहे.