शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

लाखो रुपयांची विज्ञान केंद्र धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:09 IST

सर्व शिक्षा अभियानातून किमान १०० जि. प. शाळांना मिळाले केंद्र : उपयोगिता शून्य नागपूर : सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा ...

सर्व शिक्षा अभियानातून किमान १०० जि. प. शाळांना मिळाले केंद्र : उपयोगिता शून्य

नागपूर : सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेच्या शाळेत अतिशय दर्जेदार व अत्याधुनिक विज्ञान केंद्र तयार करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात किमान १०० शाळांमध्ये हे केंद्र आहे. मात्र, बहुतांश शाळांमध्ये याची उपयोगिता शून्य असून, काही शाळांमध्ये विज्ञान केंद्रातील साहित्य धूळखात पडले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यातून भविष्याचा मार्ग सुकर व्हावा, या उद्देशातून अतिशय दर्जेदार आणि अत्याधुनिक विज्ञान केंद्र सर्व शिक्षा अभियानातून या शाळांना देण्यात आले. वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना प्रयोगातून विज्ञान शिकण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. विज्ञानाच्या सर्वच शाखांचे प्रयोग साहित्य यात आहे. यात काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणेसुद्धा आहेत. विज्ञान केंद्रासाठी चुकीच्या शाळेची निवड करण्यात आल्याने ही विज्ञान केंद्र उपयोगिताशून्य ठरत आहेत.

- २३ शाळांमध्ये विज्ञान केंद्रासाठी वर्गखोलीच नाही

यु-डायसमधील पटसंख्येच्या आधारावर शासनाने शाळांची परस्पर निवड केली आणि केंद्रासाठी परस्पर साहित्य पाठविण्यात आले. परंतु निवड करण्यात आलेल्या २३ शाळांमध्ये विज्ञान केंद्रासाठी वर्गखोलीच उपलब्ध नसल्याने विज्ञानाचे साहित्य अडगळीत पडले आहे. यातील काही शाळांमधील थकीत बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही शाळांमध्ये तर विज्ञानाचे शिक्षकच नसल्याने केंद्राचा उपयोग झाला नाही. काही शाळांमध्ये लाखो रुपयांचे साहित्य कुलूपबंद असून, धूळखात पडले आहे.

- त्रुटींचे अहवाल दिल्यानंतरही सुधारणा नाही

विज्ञानकेंद्राचे साहित्य शाळेत पाठविल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला त्याच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले. शिक्षण विभागाने विज्ञान केंद्राच्या त्रुटींचा अहवाल दिल्यानंतरही त्यात सुधारणा करण्यात आल्या नाहीत. लाखो रुपये खर्चून साकारलेले विज्ञान केंद्र बंद

असल्याने शासनाच्या उद्देशाला हरताळच फासला जात आहे.

- शिक्षण विभागाशी समन्वयच साधला नाही

यु-डायसच्या अहवालावरून शासनाने शाळांची परस्पर निवड केली. शाळेतील सुविधांचा आढावा घेतला नाही. शिक्षण विभागाशी समन्वय साधला नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे साहित्य धूळखात आहे. २३ शाळांनी विज्ञान केंद्रासाठी खोल्यांची मागणी केली आहे.