शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांचे लाखो रुपये हडपले : बहुउद्देशीय संस्थेच्या आरोपी दाम्पत्याचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:13 IST

गोरगरीब, कष्टकरी व्यक्तींना वर्षाला २५ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने त्यांचे गुंतवणुकीच्या नावाआड लाखो रुपये जमा केले आणि ही रक्कम घेऊन आरोपी दाम्पत्याने पलायन केले.

ठळक मुद्देयशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरगरीब, कष्टकरी व्यक्तींना वर्षाला २५ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने त्यांचे गुंतवणुकीच्या नावाआड लाखो रुपये जमा केले आणि ही रक्कम घेऊन आरोपी दाम्पत्याने पलायन केले. किरण गणेश ठाकूर (वय ४०) आणि गणेश प्रतापसिंग ठाकूर (वय ४८), अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. यशोधरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील प्राथमिक तक्रारीनुसार, या दोघांनी पावणेदोनशे लोकांचे ५० लाख रुपये हडपल्याचे पोलीस सांगतात.बम्लेश्वरीनगरात आरोपी ठाकूर दाम्पत्याने २०१३ मध्ये शांताबाई बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था स्थापन केली. या संस्थेचे अध्यक्षपद अर्थातच किरण आणि सचिवपद तिचा पती गणेश ठाकूर याने आपल्याकडे ठेवून घेतले. यशोधरानगर, पिवळी नदीजवळ असलेल्या माँ बम्लेश्वरीनगरात कष्टकरी, गोरगरीब, छोटे दुकानदार, हातठेले चालविणारे तसेच मजुरांची संख्या जास्त आहे. ऐनवेळी कोणते काम पडल्यास मोठी आर्थिक रक्कम शिल्लक राहावी म्हणून आरोपी ठाकूर दाम्पत्याने त्यांना आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व समजावून सांगितले. ५०, १०० रुपयांपासून दैनिक बचत ते मासिक ५०० रुपयांपासून त्यांना आपल्या संस्थेत रक्कम जमा करण्यास भाग पाडले. रक्कम जमा करावी म्हणून त्यांना वर्षाला २५ टक्के व्याजाचे आमिष दाखवले. त्यामुळे अनेक गोरगरिबांनी आपल्या मुलाबाळांचे शिक्षण आणि संभाव्य कामांच्या पूर्ततेसाठी आरोपी ठाकूर दाम्पत्याकडे वर्षाला हजारो रुपये जमा केले. भिलगाव शिवनगर ग्रामपंचायतसमोर राहणाऱ्या सिंधू बबन पवार (वय ५२) यांनीही १ मे २०१३ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत ९६ हजार रुपये गुंतविले. त्यांना तसेच अन्य गुंतवणूकदारांना ठरवून दिलेली मुदत संपल्यानंतर ते आपली रक्कम परत मागू लागले असता, आरोपी ठाकूर दाम्पत्य आणि त्यांचे दलाल वेगवेगळे कारण सांगून, नंतर नोटाबंदी आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे कारण सांगून आरोपी दाम्पत्य गुंतवणूकदारांना टाळत होते. तगादा लावणाऱ्यांना धमकावत होते. ते रक्कम परत करणार नाही, हे ध्यानात आल्याने सिंधू पवार आणि इतरांनी यशोधरानगर ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार झाल्याचे कळताच आरोपी ठाकूर दाम्पत्याने यशोधरानगरातून पलायन केले.पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ठाकूर दाम्पत्य तसेच त्यांच्या साथीदाराविरुद्ध ४९ लाख ५१,२०० रुपये हडपल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.पोलिसांची उदासिनता!गरीब, कष्टकरी नागरिकांनी आपल्या पोटाला पीळ देऊन आरोपी ठाकूर दाम्पत्याकडे आपली रक्कम जमा केली. त्यांच्या रकमेवर आरोपी ठाकूर गब्बर बनला. पैसे मागायला येणाºयाला तो नोटाबंदी, आर्थिक मंदीचे कारण सांगत होता. दुसरीकडे स्वत: ऐशोआरामाचे जीवन जगत होता. पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतले असते तर त्याला पळून जाण्याची संधी मिळाली नसती, असे तक्रारदार पीडितांचे मत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यास सुरुवातीपासूनच उदासिनता दाखविल्याचाही आरोप आहे.

टॅग्स :Investmentगुंतवणूकfraudधोकेबाजी