शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
4
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
5
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
6
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
7
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
8
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
9
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
10
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
11
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
12
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
13
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
14
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
15
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
16
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
17
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
18
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
19
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
20
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांचे लाखो रुपये हडपले : बहुउद्देशीय संस्थेच्या आरोपी दाम्पत्याचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:13 IST

गोरगरीब, कष्टकरी व्यक्तींना वर्षाला २५ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने त्यांचे गुंतवणुकीच्या नावाआड लाखो रुपये जमा केले आणि ही रक्कम घेऊन आरोपी दाम्पत्याने पलायन केले.

ठळक मुद्देयशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरगरीब, कष्टकरी व्यक्तींना वर्षाला २५ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने त्यांचे गुंतवणुकीच्या नावाआड लाखो रुपये जमा केले आणि ही रक्कम घेऊन आरोपी दाम्पत्याने पलायन केले. किरण गणेश ठाकूर (वय ४०) आणि गणेश प्रतापसिंग ठाकूर (वय ४८), अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. यशोधरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील प्राथमिक तक्रारीनुसार, या दोघांनी पावणेदोनशे लोकांचे ५० लाख रुपये हडपल्याचे पोलीस सांगतात.बम्लेश्वरीनगरात आरोपी ठाकूर दाम्पत्याने २०१३ मध्ये शांताबाई बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था स्थापन केली. या संस्थेचे अध्यक्षपद अर्थातच किरण आणि सचिवपद तिचा पती गणेश ठाकूर याने आपल्याकडे ठेवून घेतले. यशोधरानगर, पिवळी नदीजवळ असलेल्या माँ बम्लेश्वरीनगरात कष्टकरी, गोरगरीब, छोटे दुकानदार, हातठेले चालविणारे तसेच मजुरांची संख्या जास्त आहे. ऐनवेळी कोणते काम पडल्यास मोठी आर्थिक रक्कम शिल्लक राहावी म्हणून आरोपी ठाकूर दाम्पत्याने त्यांना आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व समजावून सांगितले. ५०, १०० रुपयांपासून दैनिक बचत ते मासिक ५०० रुपयांपासून त्यांना आपल्या संस्थेत रक्कम जमा करण्यास भाग पाडले. रक्कम जमा करावी म्हणून त्यांना वर्षाला २५ टक्के व्याजाचे आमिष दाखवले. त्यामुळे अनेक गोरगरिबांनी आपल्या मुलाबाळांचे शिक्षण आणि संभाव्य कामांच्या पूर्ततेसाठी आरोपी ठाकूर दाम्पत्याकडे वर्षाला हजारो रुपये जमा केले. भिलगाव शिवनगर ग्रामपंचायतसमोर राहणाऱ्या सिंधू बबन पवार (वय ५२) यांनीही १ मे २०१३ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत ९६ हजार रुपये गुंतविले. त्यांना तसेच अन्य गुंतवणूकदारांना ठरवून दिलेली मुदत संपल्यानंतर ते आपली रक्कम परत मागू लागले असता, आरोपी ठाकूर दाम्पत्य आणि त्यांचे दलाल वेगवेगळे कारण सांगून, नंतर नोटाबंदी आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे कारण सांगून आरोपी दाम्पत्य गुंतवणूकदारांना टाळत होते. तगादा लावणाऱ्यांना धमकावत होते. ते रक्कम परत करणार नाही, हे ध्यानात आल्याने सिंधू पवार आणि इतरांनी यशोधरानगर ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार झाल्याचे कळताच आरोपी ठाकूर दाम्पत्याने यशोधरानगरातून पलायन केले.पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ठाकूर दाम्पत्य तसेच त्यांच्या साथीदाराविरुद्ध ४९ लाख ५१,२०० रुपये हडपल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.पोलिसांची उदासिनता!गरीब, कष्टकरी नागरिकांनी आपल्या पोटाला पीळ देऊन आरोपी ठाकूर दाम्पत्याकडे आपली रक्कम जमा केली. त्यांच्या रकमेवर आरोपी ठाकूर गब्बर बनला. पैसे मागायला येणाºयाला तो नोटाबंदी, आर्थिक मंदीचे कारण सांगत होता. दुसरीकडे स्वत: ऐशोआरामाचे जीवन जगत होता. पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतले असते तर त्याला पळून जाण्याची संधी मिळाली नसती, असे तक्रारदार पीडितांचे मत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यास सुरुवातीपासूनच उदासिनता दाखविल्याचाही आरोप आहे.

टॅग्स :Investmentगुंतवणूकfraudधोकेबाजी