शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कोट्यवधींचा निधी खर्चच नाही

By admin | Updated: April 30, 2017 01:33 IST

शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा कोट्यवधींचा निधी सामाजिक न्याय विभागाच्या उदासीनतेमुळे खर्चच झाला नाही.

सामाजिक न्याय विभागाची उदासीनता : मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांमुळे मिळणार ६०९ कोटीनागपूर : शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा कोट्यवधींचा निधी सामाजिक न्याय विभागाच्या उदासीनतेमुळे खर्चच झाला नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.सन २०१७-१८ पासून मिळणारा निधी आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वापरण्यात यावा यासाठी पालकमंत्र्यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे हा निधी आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च करण्यात यावा, असा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. परिणामी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी तिन्ही योजनांचा यंदा ६०९ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.बिगर आदिवासी योजनेंतर्गत जनतेच्या कल्याणासाठी नियोजन विभागाकडून निधी जिल्ह्याला प्राप्त होतो. आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत निधी प्राप्त होत असतो. विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती, दलित वस्त्या व मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून समाज कल्याण विभागाला निधी प्राप्त होत असतो.या तिन्ही योजना नियोजन विभाग, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून नियंत्रित केल्या जातात. या विभागांकडून प्राप्त होणारा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च केल्यास स्थानिक स्तरावरील प्रश्न जिल्ह्यातच सुटतील, या हेतूने १६ फेब्रुवारी २००८ रोजी नियोजन विभागाने एका आदेशान्वये हा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च करण्याचा निर्णय घेतला. तसेच आदिवासी विकास विभागाने १६ डिसेंबर २००९ रोजी शासन निर्णय काढला व त्याचीही अंमलबजावणी केली. शासन निर्णयानुसार आदिवासी विभाग आणि नियोजन विभागाने हा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च करण्याचा निर्णय घेतला. पण सामाजिक न्याय विभागाने मात्र त्यांचा ४ फेब्रुवारी २०१० च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. परिणामी जिल्ह्याला दरवर्षी मिळणारा सुमारे ९ ते १० कोटी रुपयांचा निधी पूर्णपणे खर्च होऊ शकला नाही. अशीच स्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यातही असल्यामुळे केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे कोट्यवधीचा निधी व्यपगत झाला.(प्रतिनिधी)पालकमंत्री बावनकुळे यांनी वेधले लक्ष ही बाब पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लक्षात येताच त्यांनी ४ फेब्रुवारी २०१० च्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून सामाजिक न्याय विभाग, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे व १२ आॅगस्ट २०१६ च्या जिल्हा नियोजन समितीत प्रस्ताव पारित करून पाठपुरावा केला. या प्रस्तावाची गंभीर दखल घेत सामाजिक न्याय विभागाने सन २०१७-१८ या वर्षापासून २०१० च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विशेष घटक योजनेचा निधी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे यंदापासून जिल्ह्याला प्राप्त होईल. यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांचाही फायदा होणार आहे. सन २०१७-१८ ला नागपूर जिल्ह्यासाठी तीनही योजना ंमिळून ६०९.८५ कोटींचा निधी मंजूर आहे.