शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

कोट्यवधींचा निधी खर्चच नाही

By admin | Updated: April 30, 2017 01:33 IST

शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा कोट्यवधींचा निधी सामाजिक न्याय विभागाच्या उदासीनतेमुळे खर्चच झाला नाही.

सामाजिक न्याय विभागाची उदासीनता : मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांमुळे मिळणार ६०९ कोटीनागपूर : शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा कोट्यवधींचा निधी सामाजिक न्याय विभागाच्या उदासीनतेमुळे खर्चच झाला नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.सन २०१७-१८ पासून मिळणारा निधी आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वापरण्यात यावा यासाठी पालकमंत्र्यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे हा निधी आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च करण्यात यावा, असा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. परिणामी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी तिन्ही योजनांचा यंदा ६०९ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.बिगर आदिवासी योजनेंतर्गत जनतेच्या कल्याणासाठी नियोजन विभागाकडून निधी जिल्ह्याला प्राप्त होतो. आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत निधी प्राप्त होत असतो. विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती, दलित वस्त्या व मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून समाज कल्याण विभागाला निधी प्राप्त होत असतो.या तिन्ही योजना नियोजन विभाग, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून नियंत्रित केल्या जातात. या विभागांकडून प्राप्त होणारा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च केल्यास स्थानिक स्तरावरील प्रश्न जिल्ह्यातच सुटतील, या हेतूने १६ फेब्रुवारी २००८ रोजी नियोजन विभागाने एका आदेशान्वये हा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च करण्याचा निर्णय घेतला. तसेच आदिवासी विकास विभागाने १६ डिसेंबर २००९ रोजी शासन निर्णय काढला व त्याचीही अंमलबजावणी केली. शासन निर्णयानुसार आदिवासी विभाग आणि नियोजन विभागाने हा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्च करण्याचा निर्णय घेतला. पण सामाजिक न्याय विभागाने मात्र त्यांचा ४ फेब्रुवारी २०१० च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. परिणामी जिल्ह्याला दरवर्षी मिळणारा सुमारे ९ ते १० कोटी रुपयांचा निधी पूर्णपणे खर्च होऊ शकला नाही. अशीच स्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यातही असल्यामुळे केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे कोट्यवधीचा निधी व्यपगत झाला.(प्रतिनिधी)पालकमंत्री बावनकुळे यांनी वेधले लक्ष ही बाब पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लक्षात येताच त्यांनी ४ फेब्रुवारी २०१० च्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून सामाजिक न्याय विभाग, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे व १२ आॅगस्ट २०१६ च्या जिल्हा नियोजन समितीत प्रस्ताव पारित करून पाठपुरावा केला. या प्रस्तावाची गंभीर दखल घेत सामाजिक न्याय विभागाने सन २०१७-१८ या वर्षापासून २०१० च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विशेष घटक योजनेचा निधी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे यंदापासून जिल्ह्याला प्राप्त होईल. यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांचाही फायदा होणार आहे. सन २०१७-१८ ला नागपूर जिल्ह्यासाठी तीनही योजना ंमिळून ६०९.८५ कोटींचा निधी मंजूर आहे.