शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

मनरेगामध्ये कोट्यवधींचा घोटाळा ; विजय वडेट्टीवार यांचा बॉम्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:46 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत (मनरेगा) गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून निविदा प्रक्रिया न राबिवता मर्जीतील कंत्राटदारांकडून नियमबाह्य कामे सुरू आहेत. यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे. असे असताना दोषींना पाठीशी घालण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देनिविदा न काढता मर्जीतील कंत्राटदारांकडून काम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत (मनरेगा) गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून निविदा प्रक्रिया न राबिवता मर्जीतील कंत्राटदारांकडून नियमबाह्य कामे सुरू आहेत. यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे. असे असताना दोषींना पाठीशी घालण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी मनरेगाचा निधी कुशल कामावर ५१ टक्के तर अकुशल कामावर ४९ टक्के खर्च करण्यात यावा, असे निकष आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यात कुशल कामावर तब्बल ६२ टक्के तर अकुशल कामांवर ३८ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वनविभागाला मनरेगाच्या कामांसाठी १३९ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर झाला. यातील ८४ कोटी कुशल कामावर खर्च करण्यात आले. नियमबाह्य कामाची बोगस बिले सादर करून रक्कम उचलण्यात आल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.वनविभागाच्या घोट व मार्कंडा क्षेत्रात कार्तिक कन्स्ट्रक्शन या एजन्सीच्या माध्यमातून कामे करण्यात आली. अधिकारी व एजन्सीच्या संगनमताने बोगस बिल सादर करून कोट्यवधीची रक्कम उचलण्यात आली. कुरखेडा सिंचन विभागातही असाच प्रकार सुरू आहे. ३ कोटी ४४ लाखापैकी २ कोटी ३२ लाख कुशल कामावर तर १ कोटी ११ लाखल अकुशल कामावर खर्च करण्यात आले. सिमेंटीकरणाच्या कामावर १० कोटी ५४ लाखांचा खर्च करण्यात आला. याची रक्कम उचलताना कृ षी केंद्राची बिले जोडण्यात आली. साहित्य खरेदीतही असाच घोटाळा आहे. लेखा परीक्षणातून हे स्पष्ट झाले असतानाही स्टेट फायनान्स अ‍ॅडव्हायजरी समितीचे प्रमुख राम बोंडे दोषींचा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी कृती अहवाल सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात दोषीवर कारवाई करता येत नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. गडचिरोली प्रमाणे राज्यातील अन्य जिल्ह्यातही मनरेगात मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार सुरू असल्याने या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर केलेले आरोप तथ्यहीनआर्थिक घोटाळा करून भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या बरोबर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची बैठक झालेली नाही, तर काँग्रेसचाच यात हात असल्याचे वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांनी कोणतीही माहिती न घेता काँग्रेसवर आरोप केले आहेत. पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करावे. तथ्यहीन आरोप करू नये असा सल्ला काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला. मल्ल्या भारत सोडण्यापूर्वी अरुण जेटली यांना भेटले होते. तर नीरव मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. मल्ल्या व नीरव मोदी यांनी भाजपाच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा के ल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात वृक्ष लागवड करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षापैकी ३ कोटीही वृक्ष जगलेले नाहीत. वृक्ष लागवड योजना अयशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारCorruptionभ्रष्टाचार