शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सैनिकी शाळेतील मुली उपाशी

By admin | Updated: September 24, 2015 03:21 IST

राष्ट्रभक्तीच्या भावनेतून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी सरकारने सैनिकी शाळा सुरू केल्या.

रेशन नाही म्हणून भोजन बंद : ९० टक्के मुली परतल्या घरी, अनुदान जाते तरी कुठे?मंगेश व्यवहारे नागपूरराष्ट्रभक्तीच्या भावनेतून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी सरकारने सैनिकी शाळा सुरू केल्या. विदर्भातही दहा वर्षापूर्वी १०० टक्के अनुदान तत्त्वावरील सैनिकी मुलींची निवासी शाळा नागपूरजवळच्या वडधामन्यात सुरू करण्यात आली. मात्र, या शाळेत शिकणाऱ्या मुलींना दोनवेळचे जेवणही मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उपाशीपोटी राहावे लागत असल्याने ९० टक्के मुली घरी परतल्या आहेत. या सैनिकी शाळेला सरकारी अनुदान मिळते. तरीही संस्थाचालक शाळेत रेशनचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे अनुदान जाते तरी कुठे, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.समाजकल्याण विभागाची लक्तरे वेशीला टांगणाऱ्या या संस्थेला अधिकाऱ्यांचेच तर पाठबळ नसावे ना, असा प्रश्न वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतली जात असल्याने उपस्थित केला जात आहे.महावैष्णवी महिला मंडळाद्वारे संचालित असलेली राणी लक्ष्मीबाई नावाने मुलींची सैनिकी शाळा २००५पासून वडधामना येथे चालविली जात आहे. शाळेच्या शेजारीच मुलींचे वसतिगृह आहे. पाचवी ते दहावीपर्यंत येथे वर्ग आहेत. विदर्भातील ९० मुली येथे प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्येक मुलीमागे १५००० रुपयांचे अनुदान समाजकल्याण विभागाकडून संस्थेला देण्यात येते. या अनुदानातून संस्था मुलींच्या राहण्याची, खाण्याची सोय करते. गेल्या काही महिन्यापासून संस्थाचालकाच्या दुर्लक्षामुळे येथील मुलींचे हाल होत आहेत. नियमानुसार मुलींना दररोज दुध, नाश्ता, पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. परंतु येथे नियमित जेवणाचेही वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून वसतिगृहातील रेशन संपले आहे. संस्थाचालकांना वारंवार सांगूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. शौेचालयात किचन, स्वयंपाक मुलींकडे शौचालयाच्या ठिकाणी किचन बनविण्यात आले आहे. किचनमध्ये ठेवलेल्या भांड्यामध्ये अन्नाचा दाणासुद्धा आढळला नाही. पिण्यासाठी फिल्टर आहे, मात्र तेही नादुरुस्त. एवढ्या मोठ्या संख्येने मुली असतानाही स्वयंपाकासाठी गॅस नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. दोन्ही स्वयंपाकीला पगार न मिळाल्याने त्या सोडून गेल्यामुळे मुली स्वत: स्वयंपाक करीत आहेत. आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध नाही. विशेष म्हणजे वसतिगृहाचे वीज बिल न भरल्याने वर्षभरापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वसतिगृहात अस्वच्छतेचा कळस आहे.