शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

सैनिकी शाळेतील मुली उपाशी

By admin | Updated: September 24, 2015 03:21 IST

राष्ट्रभक्तीच्या भावनेतून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी सरकारने सैनिकी शाळा सुरू केल्या.

रेशन नाही म्हणून भोजन बंद : ९० टक्के मुली परतल्या घरी, अनुदान जाते तरी कुठे?मंगेश व्यवहारे नागपूरराष्ट्रभक्तीच्या भावनेतून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी सरकारने सैनिकी शाळा सुरू केल्या. विदर्भातही दहा वर्षापूर्वी १०० टक्के अनुदान तत्त्वावरील सैनिकी मुलींची निवासी शाळा नागपूरजवळच्या वडधामन्यात सुरू करण्यात आली. मात्र, या शाळेत शिकणाऱ्या मुलींना दोनवेळचे जेवणही मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उपाशीपोटी राहावे लागत असल्याने ९० टक्के मुली घरी परतल्या आहेत. या सैनिकी शाळेला सरकारी अनुदान मिळते. तरीही संस्थाचालक शाळेत रेशनचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे अनुदान जाते तरी कुठे, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.समाजकल्याण विभागाची लक्तरे वेशीला टांगणाऱ्या या संस्थेला अधिकाऱ्यांचेच तर पाठबळ नसावे ना, असा प्रश्न वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतली जात असल्याने उपस्थित केला जात आहे.महावैष्णवी महिला मंडळाद्वारे संचालित असलेली राणी लक्ष्मीबाई नावाने मुलींची सैनिकी शाळा २००५पासून वडधामना येथे चालविली जात आहे. शाळेच्या शेजारीच मुलींचे वसतिगृह आहे. पाचवी ते दहावीपर्यंत येथे वर्ग आहेत. विदर्भातील ९० मुली येथे प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्येक मुलीमागे १५००० रुपयांचे अनुदान समाजकल्याण विभागाकडून संस्थेला देण्यात येते. या अनुदानातून संस्था मुलींच्या राहण्याची, खाण्याची सोय करते. गेल्या काही महिन्यापासून संस्थाचालकाच्या दुर्लक्षामुळे येथील मुलींचे हाल होत आहेत. नियमानुसार मुलींना दररोज दुध, नाश्ता, पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. परंतु येथे नियमित जेवणाचेही वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून वसतिगृहातील रेशन संपले आहे. संस्थाचालकांना वारंवार सांगूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. शौेचालयात किचन, स्वयंपाक मुलींकडे शौचालयाच्या ठिकाणी किचन बनविण्यात आले आहे. किचनमध्ये ठेवलेल्या भांड्यामध्ये अन्नाचा दाणासुद्धा आढळला नाही. पिण्यासाठी फिल्टर आहे, मात्र तेही नादुरुस्त. एवढ्या मोठ्या संख्येने मुली असतानाही स्वयंपाकासाठी गॅस नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. दोन्ही स्वयंपाकीला पगार न मिळाल्याने त्या सोडून गेल्यामुळे मुली स्वत: स्वयंपाक करीत आहेत. आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध नाही. विशेष म्हणजे वसतिगृहाचे वीज बिल न भरल्याने वर्षभरापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वसतिगृहात अस्वच्छतेचा कळस आहे.