शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मायग्रेनची समस्‍या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:09 IST

नागपूर : मायग्रेन ही सामान्‍य समस्‍या आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्‍ये त्‍याचे प्रमाण अधिक आढळते. हार्मोन्‍समधील बदल, अपौष्‍टिक आहार, अतिताण, ...

नागपूर : मायग्रेन ही सामान्‍य समस्‍या आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्‍ये त्‍याचे प्रमाण अधिक आढळते. हार्मोन्‍समधील बदल, अपौष्‍टिक आहार, अतिताण, झोपण्‍याची व उठण्‍याची चुकीची सवय, औषधांचा अतिरेकी वापर आदी त्‍यामागे कारणे आहेत. ‍यावर वेळीच उपचार आवश्यक आहे, असे मत डॉ. देबाशिष चौधरी यांनी व्‍यक्‍त केले.

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे १८ ते २४ डिसेंबर दरम्यान ‘राष्ट्रीय मेंदू सप्ताह’ आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध ऑनलाईन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ ही या वर्षीची संकल्पना आहे. चर्चासत्राच्या आज तिसऱ्या दिवशी डॉ. सुधीर कोठारी (पुणे), डॉ. देबाशिष चौधरी (नवी दिल्ली), डॉ. हृषिकेश कुमार (कोलकाता) सहभागी झाले होते.

औषधांबरोबर नियमित योगासने, व्‍यायाम, पौष्‍टिक आहार घेतला तर ही समस्‍या दूर केली जाऊ शकते असे सांगत डॉ. चौधरी म्हणाले, मायग्रेनवर इंजेक्‍शनही आले आहे. ते घेतल्‍याने एक महिना मायग्रेनपासून दूर राहता येते. त्‍यानंतरही ही समस्‍या दूर झाली नाही तर शस्‍त्रक्रियेचा पर्यायदेखील उपलब्‍ध आहे.

डॉ. सुधीर कोठारी यांनी ‘भोवळ येणे’ या विषयावर आपले विचार मांडले. त्‍यांनी भोवळ, चक्‍कर येणे म्‍हणजे काय, ती कशामुळे येते, त्याचे प्रकार कोणते, त्‍यावर उपाय काय आहेत, याबद्दल माहिती दिली. ते म्‍हणाले, शरीराचे संतुलन चांगले असते तेव्‍हा आपण त्‍याकडे दुर्लक्ष करतो. पण संतुलन बिघडले की चक्‍कर येण्‍यासारख्‍या समस्‍या उद्भवतात. कानात असलेली सूक्ष्‍म प्रणाली शरीराचे संतुलन साधण्‍याचे काम करते. त्‍यात बिघाड झाला तर शरीराचे संतुलन बिघडते व चक्‍कर यायला लागतात.

‘गेट डिसऑर्डर्स’ या विषयावर डॉ. हृषिकेश कुमार यांनी विचार मांडले. ते म्हणाले, पायांचा नियमित व्‍यायाम केला, चालताना काळजी घेतली, डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याने औषधे घेतली तर बऱ्याच अंशी ही समस्‍या दूर होऊ शकते. ज्‍या व्‍यक्‍तींना नीट चालता येणे शक्‍य नसते, त्‍यांच्‍याप्रति सहानुभूती ठेवण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला.

अध्‍यक्षस्‍थानी हैदराबादचे आयएएनचे माजी अध्‍यक्ष डॉ. सुभाष कौल व एमडीएसआयचे अध्‍यक्ष डॉ. विनय गोयल होते. राष्‍ट्रीय मेंदू सप्‍ताहाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी प्रास्‍ताविक केले व सर्वांचे आभार मानले.