शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

३०० विद्यार्थ्यांनी दिला समतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:08 IST

‘सर्व मनुष्य समान आहे, द्वेष संपविण्यासाठी समता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करा, समता मैत्री, करुणेच्या भावेनचा विकास करा’ हा धम्मसंदेश दीक्षाभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.

ठळक मुद्देधम्मसंदेश अभियान : पथनाट्यामधून पोहचविले बाबासाहेबांचे विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सर्व मनुष्य समान आहे, द्वेष संपविण्यासाठी समता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करा, समता मैत्री, करुणेच्या भावेनचा विकास करा’ हा धम्मसंदेश दीक्षाभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. धम्मसंदेश अभियानाच्यावतीने आयोजित या उपक्रमात शहरातील विविध महाविद्यालयांतील ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपºयातून आंबेडकरी अनुयायी येतात. दीक्षाभूमीवर येणाºया या बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, त्यांनी केलेला त्याग आणि दिलेल्या विचारांची माहिती व्हावी, म्हणून ‘धम्मसंदेश अभियान’च्यावतीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याची माहिती देताना माजी अतिरीक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे म्हणाले, ‘दीक्षाभूमी ही आहे आमचे प्रेरणा स्थान, नका करू याला तीर्थस्थान’, या विचारामधूनच दरवर्षी नव्या विषयाला घेऊन पथनाट्य उभे केले जाते . या अभियानाचे हे सहावे वर्ष आहे. पथनाट्यामध्ये तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, स्वामी विवेकानंद कॉलेज आॅफ सोशल वर्क, बी.पी. नॅशनल समाजकार्य महाविद्यालय, आॅरेंज सिटी कॉलेज आॅफ सोशल वर्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय आदींचा सहभाग होता. दीक्षाभूमी सोबतच शहरातील विविध बुद्ध विहारातही व मोठ्या कार्यक्रमस्थळी हे पथनाट्य सादर केले जाते. या उपक्रमाच्या निमित्ताने नवीन पिढी आंबेडकरी चळवळीशी जुळत आहे, असेही ते म्हणाले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंजाबराव वानखेडे, प्रा. प्रदीप आगलावे, प्रा. सुनील तलवारे, राजेश हाडके, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रशांत तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.