शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

३०० विद्यार्थ्यांनी दिला समतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:08 IST

‘सर्व मनुष्य समान आहे, द्वेष संपविण्यासाठी समता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करा, समता मैत्री, करुणेच्या भावेनचा विकास करा’ हा धम्मसंदेश दीक्षाभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.

ठळक मुद्देधम्मसंदेश अभियान : पथनाट्यामधून पोहचविले बाबासाहेबांचे विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सर्व मनुष्य समान आहे, द्वेष संपविण्यासाठी समता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करा, समता मैत्री, करुणेच्या भावेनचा विकास करा’ हा धम्मसंदेश दीक्षाभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. धम्मसंदेश अभियानाच्यावतीने आयोजित या उपक्रमात शहरातील विविध महाविद्यालयांतील ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपºयातून आंबेडकरी अनुयायी येतात. दीक्षाभूमीवर येणाºया या बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, त्यांनी केलेला त्याग आणि दिलेल्या विचारांची माहिती व्हावी, म्हणून ‘धम्मसंदेश अभियान’च्यावतीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याची माहिती देताना माजी अतिरीक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे म्हणाले, ‘दीक्षाभूमी ही आहे आमचे प्रेरणा स्थान, नका करू याला तीर्थस्थान’, या विचारामधूनच दरवर्षी नव्या विषयाला घेऊन पथनाट्य उभे केले जाते . या अभियानाचे हे सहावे वर्ष आहे. पथनाट्यामध्ये तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, स्वामी विवेकानंद कॉलेज आॅफ सोशल वर्क, बी.पी. नॅशनल समाजकार्य महाविद्यालय, आॅरेंज सिटी कॉलेज आॅफ सोशल वर्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय आदींचा सहभाग होता. दीक्षाभूमी सोबतच शहरातील विविध बुद्ध विहारातही व मोठ्या कार्यक्रमस्थळी हे पथनाट्य सादर केले जाते. या उपक्रमाच्या निमित्ताने नवीन पिढी आंबेडकरी चळवळीशी जुळत आहे, असेही ते म्हणाले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंजाबराव वानखेडे, प्रा. प्रदीप आगलावे, प्रा. सुनील तलवारे, राजेश हाडके, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रशांत तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.