शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

गुणवंत विद्यार्थ्यांची धाव नामांकित महाविद्यालयांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 10:33 IST

अकरावीच्या बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. दहावीत मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील नामांकित महाविद्यालयात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देबायफोकलची अंतिम यादी जाहीर राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकरावीच्या बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. दहावीत मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील नामांकित महाविद्यालयात धाव घेतली. दहावीत ९९.२ टक्के गुण मिळवून विदर्भात प्रथम आलेल्या मैत्रेयी घनोटे हिने डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये फिशरीत प्रवेश मिळविला आहे. तर शहरातून गुणवत्ता यादीत आलेल्या अनुजा सहस्रबुद्धे हिने सुद्धा आंबेडकर महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळविला आहे. यावषीर्ही नामवंत महाविद्यालयांचा कट ऑफ ९७ टक्क्यावर गेला आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे ८ जून रोजी निकाल जाहीर केला. त्यापूर्वीच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली. मात्र यंदा दहावीच्या निकालात १८ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच ९० टक्क्यांच्यावर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे. त्यामुळे यंदा द्विलक्षी अभ्यासक्रमाचा कट ऑफमध्ये सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व दिसेल अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत द्विलक्षीचे प्रवेशासाठी मंगळवारी २ हजार ७८६ विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली. यापैकी ८२४ विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केले. यात शहरातील नामवंत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दिली आहे. यावर्षी या महाविद्यालयांमध्ये ९८.४ टक्क्यापासून सुरू होऊन ९७.६० टक्क्यावर आले आहे. यामध्ये इलेक्ट्रानिक्स, फिशरीज आणि कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसून आली. तर शिवाजी महाविद्यालयात असलेल्या ५० अनुदानित तुकडीसाठी ९७ टक्क्यांपर्यत कट ऑफ आला आहे. याच अभ्यासक्रमात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा कट ऑफ ९७.६ टक्क्यांवर असून कॉम्प्युटर सायन्समध्ये महाविद्यालयाचा कट ऑफ ९६.६ टक्क्यांवर आहे.

२५ हजारावर विद्यार्थ्यांनी भरला भाग -२अकरावी प्रवेशाची प्रक्रिया निकालापूर्वीच सुरू झाली होती. १ जूनपासून विद्यार्थ्यांना भाग-१ भरायचे होते आणि निकालानंतर भाग-२ ची प्रक्रिया करायची होती. आतापर्यंत भाग-१ साठी ३३,९४० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे, तर भाग-२ साठी २५,७६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. आतापर्यंत सर्वाधिक १५,४५० अर्ज विज्ञान शाखेसाठी आले आहेत. तर वाणिज्यचे अर्ज ७,७४६, कला शाखेसाठी १८७७, एमसीव्हीसीसाठी २९५ व बायोफोकलसाठी ४,३८६ अर्ज आले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र