नागपूर : वातावरणातील आर्द्रता काहीशी वाढल्याने तपमानात किंचितशी वाढ झाल्याचे दिसून आले. गाेंदिया, भंडारा वगळता विदर्भातील सर्व शहराच्या किमान तापमानात वाढ हाेऊन ते १० अंशाच्या वर पाेहचले. मात्र थंडीच्या तडाख्यातून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. दिवसेंदिवस गारठा अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवत आहे.
इंग्लंडहून आलेल्या नव्या काेराेनाच्या भीतीने राजकीय ताप वाढला असून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र निसर्गानेच लाेकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. रात्री बाेचऱ्या थंडीने घरात बसून राहणे भलाईचे वाटत आहे. त्यामुळे रात्री काही अपवाद वगळता बाहेर निघणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, विदर्भात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात किंचित वाढ नाेंदविण्यात आली. गाेंदिया व भंडाऱ्याच्या तापमानात ०.६ अंशाची वाढ हाेऊन ते ९.४ अंशावर गेले. त्यापाठाेपाठ यवतमाळचे तापमान १० अंश नाेंदविण्यात आले. नागपुरात शुक्रवारी १०.१ अंशाची नाेंद झाली. त्यानंतर वर्धा ११.२ अंश, चंद्रपूर ११.६ अंश, गडचिराेली ११, वाशिम ११, अकाेला ११.४, बुलडाणा १२.६ तर अमरावतीत १४.७ अंश किमान तापमानाची नाेंद हवामान खात्याने केली आहे. अमरावतीत तापमानात माेठी वाढ दिसून येत आहे.