शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांना तारणार मध्यम प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:28 IST

तोतलाडोह प्रकल्प अजूनही कोरडा असला तरी नागपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मात्र भरू लागले आहेत.

ठळक मुद्देमध्यम प्रकल्प ४३ टक्के भरले : तोतलाडोहमध्ये अल्प पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह प्रकल्प अजूनही कोरडा असला तरी नागपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मात्र भरू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचे संकट ओढवलेच तर त्याचा सामना करण्यासाठी हे मध्यम प्रकल्प उपयोगाचे ठरतील.यंदा मान्सून सुरू झाला तेव्हापासून पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. आकडेवारीनुसार पाऊस चांगला झाल्याचे सांगितले जात असले तरी, नागपुरातील मोठी धरणे अजूनही कोरडी आहेत. त्यामुळे भविष्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण होते की काय? अशी भीती वर्तविली जात होती. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसाने मध्यम प्रकल्प भरू लागली आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी तोतलाडोह सोडले तर उर्वरित तीन प्रकल्पही बºयापैकी भरू लागली आहेत.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यात आजच्या तारखेला एकूण २८ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. यापैकी नागपूर जिल्ह्यात पाच मोठे प्रकल्प येतात. यामध्ये तोतलाडोह हे सर्वात मोठे धरण असून, त्याची एकूण पाणीसाठा क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. त्यात आजघडीला केवळ ११४ दलघमी म्हणजे ११ टक्के इतकाच पाणीसाठा आहे तसेच रामटेक (खिंडसी) या प्रकल्पात २२ टक्के इतका पाणीसाठा आहे. परंतु कामठी खैरी या प्रकल्पात ५३ टक्के, लोअर नांद वणा ८८ टक्के, वडगाव ८४ टक्के इतका पाणीसाठा आहे.याशिवाय नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता २००.६ दलघमी इतकी आहे. आजघडीला ही धरणे ८६.०७ दलघमी म्हणजे ४३ टक्के इतकी भरली आहेत. यामध्ये पांढराबोडी हे १०० टक्के भरले आहे. त्यानंतर कान्होलीबारा ५८ टक्के, खेकरानाला ५२ टक्के, वेणा ४९ टक्के, सायकी ४४ टक्के, उमरी ४० टक्के, कार ३४ टक्के, कोलार ३० टक्के, मोरधाम ३२ टक्के, चंद्रभागा ३१ टक्के इतके भरले आहे. धरणांमधील साठा वाढत असला तरी उपलब्ध पाणीसाठासुद्धा पुरेसा म्हणता येणार नाही. परंतु आणखी काही दिवस सलग पाऊस होईल आणि धरणे भरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तर आवश्यक उपाययोजना केली जाईलसध्या पाऊस कमी असला तरी नागपुरातील पिकांसाठी योग्य पाऊस झालेला आहे. धानाचीही ६५ टक्के रोवणी झालेली आहे. ३५ टक्के रोवणी व्हायची आहे. काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे धानासाठीसुद्धा समाधानकारक पाऊस राहील, असा विश्वास आहे. राहिला प्रश्न पिण्याच्या पाण्याचा तर पाऊस होईल आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र तशी वेळ आलीच तर जिल्हा प्रशासन आवश्यक उपाययोजना करेल, पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ दिले जाणार नाही.- सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी