शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

नागपूरकरांना तारणार मध्यम प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:28 IST

तोतलाडोह प्रकल्प अजूनही कोरडा असला तरी नागपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मात्र भरू लागले आहेत.

ठळक मुद्देमध्यम प्रकल्प ४३ टक्के भरले : तोतलाडोहमध्ये अल्प पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह प्रकल्प अजूनही कोरडा असला तरी नागपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मात्र भरू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचे संकट ओढवलेच तर त्याचा सामना करण्यासाठी हे मध्यम प्रकल्प उपयोगाचे ठरतील.यंदा मान्सून सुरू झाला तेव्हापासून पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. आकडेवारीनुसार पाऊस चांगला झाल्याचे सांगितले जात असले तरी, नागपुरातील मोठी धरणे अजूनही कोरडी आहेत. त्यामुळे भविष्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण होते की काय? अशी भीती वर्तविली जात होती. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसाने मध्यम प्रकल्प भरू लागली आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी तोतलाडोह सोडले तर उर्वरित तीन प्रकल्पही बºयापैकी भरू लागली आहेत.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यात आजच्या तारखेला एकूण २८ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. यापैकी नागपूर जिल्ह्यात पाच मोठे प्रकल्प येतात. यामध्ये तोतलाडोह हे सर्वात मोठे धरण असून, त्याची एकूण पाणीसाठा क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. त्यात आजघडीला केवळ ११४ दलघमी म्हणजे ११ टक्के इतकाच पाणीसाठा आहे तसेच रामटेक (खिंडसी) या प्रकल्पात २२ टक्के इतका पाणीसाठा आहे. परंतु कामठी खैरी या प्रकल्पात ५३ टक्के, लोअर नांद वणा ८८ टक्के, वडगाव ८४ टक्के इतका पाणीसाठा आहे.याशिवाय नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता २००.६ दलघमी इतकी आहे. आजघडीला ही धरणे ८६.०७ दलघमी म्हणजे ४३ टक्के इतकी भरली आहेत. यामध्ये पांढराबोडी हे १०० टक्के भरले आहे. त्यानंतर कान्होलीबारा ५८ टक्के, खेकरानाला ५२ टक्के, वेणा ४९ टक्के, सायकी ४४ टक्के, उमरी ४० टक्के, कार ३४ टक्के, कोलार ३० टक्के, मोरधाम ३२ टक्के, चंद्रभागा ३१ टक्के इतके भरले आहे. धरणांमधील साठा वाढत असला तरी उपलब्ध पाणीसाठासुद्धा पुरेसा म्हणता येणार नाही. परंतु आणखी काही दिवस सलग पाऊस होईल आणि धरणे भरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तर आवश्यक उपाययोजना केली जाईलसध्या पाऊस कमी असला तरी नागपुरातील पिकांसाठी योग्य पाऊस झालेला आहे. धानाचीही ६५ टक्के रोवणी झालेली आहे. ३५ टक्के रोवणी व्हायची आहे. काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे धानासाठीसुद्धा समाधानकारक पाऊस राहील, असा विश्वास आहे. राहिला प्रश्न पिण्याच्या पाण्याचा तर पाऊस होईल आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र तशी वेळ आलीच तर जिल्हा प्रशासन आवश्यक उपाययोजना करेल, पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ दिले जाणार नाही.- सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी