शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

औषध असते २ रुपयांचे, विकले जाते २५ रुपयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:35 PM

अ‍ॅड. मनोग्य सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून जेनेरिक औषधांच्या व्यवसायातील नफेखोरीचा भंडाफोड केला आहे. त्यांनी भारतामध्ये २ रुपयांचे जेनेरिक औषध २५ रुपयांत कसे विकले जाते हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. जेनेरिक औषधांच्या किमतीवर नियंत्रण नसल्यामुळे फार्मास्युटिकल्स कंपन्या रुग्णांना लुटत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात जनहित याचिका : किमतीवर नियंत्रण आणण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅड. मनोग्य सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून जेनेरिक औषधांच्या व्यवसायातील नफेखोरीचा भंडाफोड केला आहे. त्यांनी भारतामध्ये २ रुपयांचे जेनेरिक औषध २५ रुपयांत कसे विकले जाते हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. जेनेरिक औषधांच्या किमतीवर नियंत्रण नसल्यामुळे फार्मास्युटिकल्स कंपन्या रुग्णांना लुटत असल्याचा त्यांचा आरोप आहे.देशामध्ये २०१३ पासून औषधी द्रव्ये मूल्य नियंत्रण आदेश लागू करण्यात आला आहे. आदेशाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी व आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी २०१५ मध्ये नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग आॅथोरिटीची स्थापना करण्यात आली. परंतु, आॅथोरिटला औषधांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश येत आहे. हा आदेश केवळ ८५० औषधांसाठी लागू आहे. त्यामुळे संबंधित औषधांची किंमत निर्धारित आहे. इतर औषधांच्या किमती मात्र अनियंत्रित आहे. इथिकल औषधांच्या (केवळ डॉक्टरांच्या सूचनेनुसार उपलब्ध होणारी औषधे) ठोक किमतीत व एमआरपीमध्ये केवळ १५ ते २० टक्क्यांचा फरक असतो. परंतु, जेनेरिक औषधांच्या ठोक किमतीत व एमआरपीमध्ये २५ ते १००० टक्क्यांचा फरक दिसून येतो. त्यामुळे यासंदर्भात आवश्यक कारवाई व्हायला पाहिजे असे सिंग यांचे म्हणणे आहे.अशा आहेत मागण्यागरजू रुग्णांना वाजवी दरात औषधे उपलब्ध करून देण्यात यावीत, सर्व औषधांची वाजवी किंमत निर्धारित करण्यात यावी, जेनेरिक औषधांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या फार्मास्युटिकल्स कंपन्यांचे लायसेन्स रद्द करण्यात यावे अशा सिंग यांच्या मागण्या आहेत. याचिकेत केंद्रीय रसायने व खते (औषधी द्रव्ये नियंत्रण) मंत्रालय आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग आॅथोरिटी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmedicineऔषधं