शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मेडिकल : ६२ हजार औषधांचा साठा केला बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:30 IST

नागपूर मेडिकलमधील सुमारे ६२ हजार गोळ्या व १५ हजारावर इंजेक्शनचा साठा बाद करण्यात आला. या औषधामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारी तत्त्वे आढळून आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देरॅनिटिडीन’मध्ये आढळला दोष!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात प्राप्त झालेल्या ‘अ‍ॅसिडिटी’वरील ‘रॅनिटिडीन’ इंजेक्शनमध्ये नोव्हेंबर २०१८ मध्ये दोष आढळून आला. तब्बल वर्षभरानंतर आता ‘रॅनिटिडीन’ गोळ्या व इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहे. यामुळे नागपूर मेडिकलमधील सुमारे ६२ हजार गोळ्या व १५ हजारावर इंजेक्शनचा साठा बाद करण्यात आला. या औषधामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारी तत्त्वे आढळून आल्याची माहिती आहे. अन्न व औषध प्रशासन याची तपासणी करीत आहे.घाटी रुग्णालयात रॅनिटिडीन इंजेक्शनच्या एका बॅचमध्ये बुरशीसदृश प्रकार गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी समोर आला होता. दोष आढळून आलेल्या तब्बल २२ हजार इंजेक्शनचा रुग्णांना वापर झाल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. तब्बल वर्षभरानंतर गेल्याच आठवड्यात या औषधांचा वापर थांबविण्याचे पत्र सर्व रुग्णालयांना आरोग्य विभागाने दिले. प्राप्त माहितीनुसार, राज्यातील सर्वच मेडिकलला हाफकिन कंपनीकडून या इंजेक्शन व गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता. दोष असल्याची शंका समोर येताच या औषधासंदर्भात अनेक देशांचे अहवाल गोळा करण्यात आले. त्यानुसार ‘रॅनिटिडीन’ औषधांमध्ये ‘एन-नायट्रोसोडामिथेलायमाइन’ (एनडीएमए) कमी प्रमाणात आढळून आले. ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संस्थेनुसार सदर घटक कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. यामुळे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने ‘रॅनिटिडीन’च्या उत्पादकांकडील कच्चा माल व इतर आवश्यक बाबींची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे तर आरोग्य विभागाने पुढील आदेशापर्यंत इंजेक्शन व गोळ्यांचा वापर थांबविण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नागपूर मेडिकलला उपलब्ध झालेल्या गोळ्या व इंजेक्शन रुग्णसेवेतून बाद करण्यात आले आहे. यात सुमारे ६२ हजार गोळ्या व १५ हजार इंजेक्शन असल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक म्हणजे, पुरवठा झालेल्या ३० टक्के औषधांचा वापर झाला आहे.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयmedicinesऔषधं