शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मेडिकलचे पाणी अशुद्ध

By admin | Updated: October 17, 2016 02:38 IST

पाणी म्हणजे जीवन! तेच जर दूषित झालं, तर आपल्या रोजच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडू शकतो.

नीरीचा अहवाल : रुग्णांचा जीव धोक्यातसुमेध वाघमारे नागपूरपाणी म्हणजे जीवन! तेच जर दूषित झालं, तर आपल्या रोजच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडू शकतो. म्हणूनच पाणी उकळून, गाळून पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु रुग्णालयातच अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असेल तर...मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हा धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) मेडिकलमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचा अहवाल दिल्याने खळबळ उडाली आहे.मेडिकलला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ६० वर्षे जुनी आहे. त्यावेळची रुग्णसंख्या गृहीत धरून ही सोय करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात यात कोणतेही बदल झाले नाहीत. मेडिकलला महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या मुख्य टाकीतून संपूर्ण मेडिकल व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला पाणीपुरवठा होतो. मेडिकलमध्ये १५०० वर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा राबता असतो. यामुळे रोज ३० लाख लिटर पाण्याची गरज असताना साधारण २२ ते २५ लाख लिटरपर्यंत पाणी मिळते. परंतु या पाण्याची योग्यता तपासली असता हे पाणी अयोग्य असल्याचे सामोर आले आहे. विशेष म्हणजे, मेडिकल प्रशासन रुग्णांवरील उपचारांना घेऊन कठोर उपाययोजना अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग रुग्णालयाच्या देखभालीकडे विशेष लक्ष देत नसल्याने हा प्रकार होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दूषित पाण्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जीव धोक्यात आला आहे. ९० टक्के पाणी अशुद्ध‘नीरी’च्या वॉटर टेक्नालॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंटने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात मेडिकलमधील विविध वॉर्ड, विभाग, अतिदक्षता विभागातील पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली. यात रुग्णालयाच्या साधारणपणे ९० ठिकाणामधील नळाला पाणी अशुद्ध येत असल्याचे निष्पन्न आले. मात्र मुख्य टाकीपर्यंत येणारे पाणी हे शुद्ध असल्याचाही निर्वाळा देण्यात आला.