शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

मेडिकलचे पाणी अशुद्ध

By admin | Updated: October 17, 2016 02:38 IST

पाणी म्हणजे जीवन! तेच जर दूषित झालं, तर आपल्या रोजच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडू शकतो.

नीरीचा अहवाल : रुग्णांचा जीव धोक्यातसुमेध वाघमारे नागपूरपाणी म्हणजे जीवन! तेच जर दूषित झालं, तर आपल्या रोजच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडू शकतो. म्हणूनच पाणी उकळून, गाळून पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु रुग्णालयातच अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असेल तर...मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हा धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) मेडिकलमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचा अहवाल दिल्याने खळबळ उडाली आहे.मेडिकलला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ६० वर्षे जुनी आहे. त्यावेळची रुग्णसंख्या गृहीत धरून ही सोय करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात यात कोणतेही बदल झाले नाहीत. मेडिकलला महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या मुख्य टाकीतून संपूर्ण मेडिकल व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला पाणीपुरवठा होतो. मेडिकलमध्ये १५०० वर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा राबता असतो. यामुळे रोज ३० लाख लिटर पाण्याची गरज असताना साधारण २२ ते २५ लाख लिटरपर्यंत पाणी मिळते. परंतु या पाण्याची योग्यता तपासली असता हे पाणी अयोग्य असल्याचे सामोर आले आहे. विशेष म्हणजे, मेडिकल प्रशासन रुग्णांवरील उपचारांना घेऊन कठोर उपाययोजना अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग रुग्णालयाच्या देखभालीकडे विशेष लक्ष देत नसल्याने हा प्रकार होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दूषित पाण्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जीव धोक्यात आला आहे. ९० टक्के पाणी अशुद्ध‘नीरी’च्या वॉटर टेक्नालॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंटने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात मेडिकलमधील विविध वॉर्ड, विभाग, अतिदक्षता विभागातील पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली. यात रुग्णालयाच्या साधारणपणे ९० ठिकाणामधील नळाला पाणी अशुद्ध येत असल्याचे निष्पन्न आले. मात्र मुख्य टाकीपर्यंत येणारे पाणी हे शुद्ध असल्याचाही निर्वाळा देण्यात आला.