शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वैद्यकीय विद्यार्थ्यांना ११ वर्षांनंतर मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 11:52 IST

वैद्यकीय विद्यार्थ्यांना नोंदणी व पात्रता शुल्कातील बेकायदेशीर वृद्धीच्या प्रकरणात ११ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून न्याय मिळाला. न्यायालयाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरूचा शुल्कवृद्धीचा आदेश रद्द केला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णयमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दणका

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय विद्यार्थ्यांना नोंदणी व पात्रता शुल्कातील बेकायदेशीर वृद्धीच्या प्रकरणात ११ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून न्याय मिळाला. न्यायालयाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरूचा शुल्कवृद्धीचा आदेश रद्द केला. तसेच, विद्यार्थ्यांनी वाढीव शुल्क जमा केले असल्यास त्यांना ते परत करण्यात यावे असे निर्देश विद्यापीठाला दिलेत.न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला. एखाद्या विषयावर कायदा, वटहुकूम, नियम अस्तित्वात नसल्यास कुलगुरू आकस्मिक बाब म्हणून आवश्यक आदेश जारी करू शकतात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कायदा-१९९८ यातील कलम १६ (८) मध्ये ही तरतूद आहे.२००७-२००८ या शैक्षणिक वर्षामध्ये कुलगुरूंनी या अधिकाराचा उपयोग करून खासगी दंत महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नोंदणी व पात्रता शुल्काबाबत दोनवेळा आदेश जारी केले होते. ११ एप्रिल २००७ रोजी जारी आदेशाद्वारे ८ हजार रुपये नोंदणी व पात्रता शुल्क ठरविण्यात आले होते. त्यानंतर, १६ जून २००७ रोजी दुसरा आदेश जारी करून ते शुल्क वाढवून ३० हजार रुपये करण्यात आले. न्यायालयाने कुलगुरूंची ही कृती अवैध ठरवली.कायद्यानुसार कुलगुरू एकाच विषयावर वारंवार आदेश जारी करू शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.कुलगुरूंनी बेकायदेशीरपणे एकाच विषयावर दोनवेळा आदेश जारी केले. पहिला आदेश जारी झाल्यानंतर कुलगुरूंचे अधिकार संपले होते.असे असताना शुल्कवाढीसाठी दुसरा आदेश जारी करण्यात आला. त्या आदेशाला अद्याप वटहुकूमात परिवर्तित करण्यात आले नाही. त्यामुळे शुल्कवाढीचा निर्णय कायम ठेवला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने विद्यापीठाला सुनावले. वादातील आदेशाविरुद्ध डॉ. अक्षय ढोबळे व इतर सहा विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती.

निर्धारित प्रक्रियेची पायमल्लीएका विषयावर एकदा आदेश जारी केल्यानंतर कुलगुरूंचा संबंधित अधिकार संपुष्टात येतो. त्यानंतर वटहुकूम आणण्यासाठी तो आदेश विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद किंवा अन्य सक्षम प्राधिकरणासमक्ष ठेवायला पाहिजे. वटहुकूम अस्तित्वात आल्यानंतर आदेशाचा प्रभाव संपतो. परंतु, नोंदणी व पात्रता शुल्काच्या बाबतीत या प्रक्रियेचे पालन झाले नाही याकडे न्यायालयाने हा निर्णय देताना लक्ष वेधले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय