शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मेडिकल : ‘टेलिमेडिसीन’मधून सात हजार रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:09 IST

दुर्गम भागातच नव्हे तर खेड्यापाड्यात विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर नाहीत. येथील रुग्ण प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवितात. तेथील उपचारांनी फरक न पडल्यास मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येतात. यात पैशांची सोय न झाल्यास वा सोबतीला कुणी नसल्यास बराच उशीर होतो. त्यामुळे रोग बळावतो. अनेकवेळा हाताबाहेरही जातो. मात्र, टेलिमेडिसीनमुळे ही परिस्थिती सुधारतेय. रुग्णाला त्यांच्या गावाजवळच विशेषज्ञाकडून उपचार होत असल्याने हा प्रकल्प रुग्णांसाठी संजीवनी ठरतोय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या प्रकल्पात गेल्या तीन वर्षात टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सात हजार रुग्णांना उपचाराला घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देदुर्गम व खेड्यापाड्यातील रुग्णांना विशेषज्ञांकडून मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुर्गम भागातच नव्हे तर खेड्यापाड्यात विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर नाहीत. येथील रुग्ण प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवितात. तेथील उपचारांनी फरक न पडल्यास मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येतात. यात पैशांची सोय न झाल्यास वा सोबतीला कुणी नसल्यास बराच उशीर होतो. त्यामुळे रोग बळावतो. अनेकवेळा हाताबाहेरही जातो. मात्र, टेलिमेडिसीनमुळे ही परिस्थिती सुधारतेय. रुग्णाला त्यांच्या गावाजवळच विशेषज्ञाकडून उपचार होत असल्याने हा प्रकल्प रुग्णांसाठी संजीवनी ठरतोय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या प्रकल्पात गेल्या तीन वर्षात टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सात हजार रुग्णांना उपचाराला घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना आरोग्यसेवा देणे म्हणजे, टेलिमेडिसीन. यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्णाशी संवाद साधला जातो. याशिवाय विशेष तंत्रज्ञानामुळे ई स्टेथोस्कोपद्वारे रुग्णाच्या हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसाचे कार्य ऐकण्याची सोय आहे. रुग्णाचे एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय विशिष्ट सॉफ्टवेअरने पाठवताही येतात. या शिवाय रुग्णाचे ईसीजी, ईको, अँजिओग्राफी थेट पाहण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील रुग्णांच्या चाचण्यांची माहिती, सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन उपचार केला जात आहे. या प्रकल्पाची सुरुवात २००९ मध्ये मेडिकलमध्ये झाली. सुरुवातीला ही योजना ढेपाळली. मात्र २०१३-१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे, ४९१९ रुग्णांना उपचारविषयक मार्गदर्शन करण्यात आले. २०१४-२०१५ मध्ये टेलिमेडिसीनच्या जागेला घेऊन बराच गोंधळ उडाल्याने हे केंद्र बंद पडल्यासारखेच होते. जुलै २०१६ पर्यंत ही स्थिती होती. परंतु त्यानंतर ‘फॅसिलीटी मॅनेजर’ची जागा भरताच गेल्या गेल्या तीन वर्षांत सात हजार दोन रुग्णांच्या समस्या सोडविण्यात आल्या.११ केंद्रांवरील रुग्णांवर होतो उपचारगडचिरोली जिल्ह्याच्या तीन, गोंदिया, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा ११ केंद्रांवरील रुग्णांवर टेलिमेडिसीनच्या मदतीने उपचार केले जात आहे. या केंद्रावरील डॉक्टरांना रुग्णांच्या उपचाराला घेऊन काही शंका असल्यास त्याचे निदान नागपूर मेडिकलमधील तज्ज्ञ डॉक्टर करतात. यात हृदयरोग, कान-नाक-घसा, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती, कॅन्सर,अस्थिरोग, शस्त्रक्रियांसह उर्वरित विभागांशी संबंधित रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.४८९ कैद्यांना मिळाला उपचारमध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांनाही ‘टेलिमेडिसीन’द्वारे मेडिकल डॉक्टरांची वैद्यकीय सेवा दिली जात होती. यासाठी मध्यवर्ती कारागृह व मेडिकल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडण्यात आले होते. आजारी कैद्याला कारागृहातील इस्पितळामध्ये दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी निदान न झाल्यास तेथील डॉक्टर मेडिकलमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधत. आजारी कैद्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवून उपचाराची दिशा ठरवली जायची. जून २०१८ पासून या कार्याचा प्रारंभ झाला. परंतु सहा महिन्यातच ‘कॉल’ येणे बंद झाले. या कालावधीमध्ये ४८९ कैदी रुग्णांना लाभ मिळाल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनmedicineऔषधंGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय