शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांनी कोरोना काळात व्यवस्थेच्या उणीवांवर केलेला प्रहार योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

- विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद जयंती उत्सव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात माध्यमांनी शासन, प्रशासनाच्या ...

- विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद जयंती उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात माध्यमांनी शासन, प्रशासनाच्या तोकड्या व्यवस्थेवर केलेला प्रहार हा योग्य होता. त्यासोबतच माध्यमांनी या काळात आपल्या जबाबदारीचे योग्य निर्वहन केल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख नरेंद्रकुमार ठाकूर यांनी व्यक्त केली.

विश्व संवाद केंद्राच्या वतीने देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘वर्तमान स्थितीत माध्यमांची भूमिका’ या विषयावर भाष्य केले.

कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेच्या वेळी शासन, प्रशासन आणि समाज गाफील राहिला आणि त्याचे भोग प्रत्येकाच्याच वाट्याला आले. या काळात व्यवस्थेच्या बाबतीत निर्माण झालेली तूट वेदनादायी ठरली. मात्र, जगाच्या तुलनेत आणि अतिशय प्रगत देशांचा विचार केल्यास, भारताने एकजुटीने या महामारीतही उत्तम कामगिरी बजावली. याच काळात अनेक भ्रामक वृत्तही मोठ्या प्रमाणात फोफावले. गंगा नदीच्या काठावर दफन केलेल्या प्रेतांचे चित्र रंगवण्यात आले. मात्र, असे चित्र २०१५, २०१७ या वर्षातही दिसून आले होते. त्यामुळे, त्याचे गालबोट व्यवस्थेवर लावून होणार नाही. त्यामागची वस्तुस्थिती दाखवणेही योग्य राहील. अर्धसत्य वृत्तांनी समाजात भ्रम व भयाची स्थिती उत्पन्न होते आणि अराजकतेला चालना मिळते. त्यामुळे, माध्यमांनी आपल्या पारंपरिक कर्तव्याची जाणीव ठेवून समाजाचे बलिकरण करणे अपेक्षित असल्याचे मत नरेंद्र ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. विज्ञानाची प्रगती आणि वैज्ञानिकांच्या परिश्रमाने आपण अत्यंत कमी वेळेत लस निर्माण केली. हा एक इतिहास आहे. माध्यमांनी सकारात्मकता पसरवण्यासोबतच आपण कोण्या अजेंड्याला बळी तर पडत नाही ना, याची काळजी घेण्याचे आवाहन ठाकूर यांनी यावेळी केले.

-----------------

नारदाचे ८४ भक्तीसुत्र प्रत्येकासाठी

देवर्षी नारदाबाबत अनेक भ्रामक कल्पना पसरविण्यात आल्या आहेत. ते संदेशवाहक असण्यासोबतच विद्वानही होते आणि त्यांची ८४ भक्तीसुत्रे समाजघटकातील प्रत्येकासाठी प्रेरक असल्याचे मत नरेंद्रकुमार ठाकूर यांनी व्यक्त केले.

.................