शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माध्यमांनी कोरोना काळात व्यवस्थेच्या उणीवांवर केलेला प्रहार योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

- विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद जयंती उत्सव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात माध्यमांनी शासन, प्रशासनाच्या ...

- विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद जयंती उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात माध्यमांनी शासन, प्रशासनाच्या तोकड्या व्यवस्थेवर केलेला प्रहार हा योग्य होता. त्यासोबतच माध्यमांनी या काळात आपल्या जबाबदारीचे योग्य निर्वहन केल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख नरेंद्रकुमार ठाकूर यांनी व्यक्त केली.

विश्व संवाद केंद्राच्या वतीने देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘वर्तमान स्थितीत माध्यमांची भूमिका’ या विषयावर भाष्य केले.

कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेच्या वेळी शासन, प्रशासन आणि समाज गाफील राहिला आणि त्याचे भोग प्रत्येकाच्याच वाट्याला आले. या काळात व्यवस्थेच्या बाबतीत निर्माण झालेली तूट वेदनादायी ठरली. मात्र, जगाच्या तुलनेत आणि अतिशय प्रगत देशांचा विचार केल्यास, भारताने एकजुटीने या महामारीतही उत्तम कामगिरी बजावली. याच काळात अनेक भ्रामक वृत्तही मोठ्या प्रमाणात फोफावले. गंगा नदीच्या काठावर दफन केलेल्या प्रेतांचे चित्र रंगवण्यात आले. मात्र, असे चित्र २०१५, २०१७ या वर्षातही दिसून आले होते. त्यामुळे, त्याचे गालबोट व्यवस्थेवर लावून होणार नाही. त्यामागची वस्तुस्थिती दाखवणेही योग्य राहील. अर्धसत्य वृत्तांनी समाजात भ्रम व भयाची स्थिती उत्पन्न होते आणि अराजकतेला चालना मिळते. त्यामुळे, माध्यमांनी आपल्या पारंपरिक कर्तव्याची जाणीव ठेवून समाजाचे बलिकरण करणे अपेक्षित असल्याचे मत नरेंद्र ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. विज्ञानाची प्रगती आणि वैज्ञानिकांच्या परिश्रमाने आपण अत्यंत कमी वेळेत लस निर्माण केली. हा एक इतिहास आहे. माध्यमांनी सकारात्मकता पसरवण्यासोबतच आपण कोण्या अजेंड्याला बळी तर पडत नाही ना, याची काळजी घेण्याचे आवाहन ठाकूर यांनी यावेळी केले.

-----------------

नारदाचे ८४ भक्तीसुत्र प्रत्येकासाठी

देवर्षी नारदाबाबत अनेक भ्रामक कल्पना पसरविण्यात आल्या आहेत. ते संदेशवाहक असण्यासोबतच विद्वानही होते आणि त्यांची ८४ भक्तीसुत्रे समाजघटकातील प्रत्येकासाठी प्रेरक असल्याचे मत नरेंद्रकुमार ठाकूर यांनी व्यक्त केले.

.................