शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडे बजेट नसल्याने मीडिया अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 14:35 IST

सरकारने मीडियाचा उपयोग त्यांना नको ते दडपण्यासाठी केला, असे खळबळजनक वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांनी आज केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : 2015 मध्ये सरकारने मीडियासाठी नऊ हजार कोटी रुपये बजेट ठेवले होते. यात इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी ४ हजार कोटी रुपये तर प्रिंट मीडियासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद होती. २०१८-१९ पर्यंत हे बजेट ९ ते ११ हजार कोटी रुपयांपर्यंत गेले. २०१९ मध्ये टीव्हीसाठी २ हजार कोटी रुपये तर प्रिंट मीडियासाठी अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद या सरकारने केली होती. सरकारचा प्रपोगंडा करण्यासाठी आणि त्यांना जे हवे ते मीडियाने दाखवावे यासाठी या बजेटचे प्रावधान होते. मीडियानेही सरकारला पाहिजे ते दाखवले. सरकारने मीडियाचा उपयोग त्यांना नको ते दडपण्यासाठी केला, असे खळबळजनक वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांनी आज केले.

स्वर्गीय बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी समितीच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी यांचा पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे होते. ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र प्रमुख पाहुणे होते.ते म्हणाले, या वेळी मात्र या सरकारकडे मिडियासाठी बजेट नाही. द्यायला पैसे नसल्याने आता मीडिया अस्वस्थ आहे. गेल्या काळात मीडियाच्या सवयी बदलल्या. आता ते लोकांपर्यंत जातात तेव्हा लोकांचा त्यांच्यावर विश्वास उडाल्याचे जाणवत आहे. यामुळे मिडियामध्ये प्रचंड अस्वस्थता दिसत आहे. ज्या मीडियाने आणि नेत्यांनी या सरकारचे ऐकले नाही त्यांच्या दाराशी इडी आणि सीबीआयला उभे करण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप त्यांनी केला.भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून स्वत:चा राजकीय फंड वाढविला. त्याचा उपयोग निवडणुकीत केला.आज देशाची स्थिती अत्यंत वाईट आहे. बीएसएनएल चे 90 टक्के कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांच्या पगाराचा पैसा देण्यासाठी या सरकारकडे निधी नाही. लवकरच बजेट मांडले जाणार आहे. या बजेटसाठीसुद्धा पुरेशी तरतूद करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही.या सरकारकडे आर्थिक विकासाची कोणतीही योजना नाही किंवा देशात आर्थिक विकास करण्यासाठी पोषक अशी प्रयोगशाळा या देशात नाही. प्लॅनिंग कमिशन नंतर निती आयोग या देशामध्ये आला. मात्र हा आयोग सरकारसाठी एचआरचे काम करीत असल्याची टीका त्यांनी केली.काँग्रेसने महात्मा गांधींच्या नेतृत्वात अहिंसेचे आंदोलन केले. मात्र आता अहिंसादेखील गुन्हा ठरतोय, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.2014 नंतर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक झाल्या. यामुळे व्होट बँक हातून जात असल्याचे शिवसेनेने राज्यात ओळखले. तेव्हापासूनच शिवसेनेने आपली भूमिका बदलली होती. महाराष्ट्रातील निवडणुकीत काँग्रेस कुठेच दिसली नाही. ख?्या अथार्ने या निवडणुका जनतेने लढवल्या. अन्य राज्यांच्या निवडणूक निकालात देखील हेच दिसत आहे, असे ते म्हणाले.भारतात माध्यमांची भूमिका सर्वात मोठी आहे. मीडिया ही देशातली सर्वात मोठी शक्ती आहे. शासक येत राहतील आणि जात राहतील, मात्र तत्कालीन परिस्थितीत आपली ओळख आपल्याला कायम ठेवावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Mediaमाध्यमे