शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ

By admin | Updated: August 10, 2014 01:28 IST

आजच्या विज्ञान युगातही अनेक चुकीच्या समजुतीवर विश्वास ठेवला जातो. पोथ्या चमत्काराने भरल्या आहेत. मात्र संतसाहित्यातून मनुष्याला जगण्याचा मार्ग मिळतो व ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ सापडतो,

अंनिसची रौप्य वर्ष पूर्ती : ज्ञानेश्वर रक्षक यांचे प्रतिपादन नागपूर : आजच्या विज्ञान युगातही अनेक चुकीच्या समजुतीवर विश्वास ठेवला जातो. पोथ्या चमत्काराने भरल्या आहेत. मात्र संतसाहित्यातून मनुष्याला जगण्याचा मार्ग मिळतो व ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ सापडतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य वर्ष पूर्तीनिमित्त शनिवारी ‘विवेक जागृती संकल्प कुटुंब मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. सक्करदरा येथील सेवादल महिला विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष संजय शेंडे होते. मंचावर डॉ. अशोक चोपडे, मधुकर धंदरे, अ‍ॅड. गंगाधर इंगळे, चंद्रकांत श्रीखंडे, डॉ. प्रवीण चरडे व युगल शेंडे उपस्थित होते. रक्षक पुढे म्हणाले, संतांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. एल्गार पुकारला. समाजाला मार्ग दाखविण्याचे काम केले आहे. मात्र आम्ही त्यांना पोथ्यांमध्ये बसविले. त्यांचे विचार कधीच डोक्यात भरले नाही. त्यामुळेच आज अंधश्रद्धेच्या आहारी जात आहे. अनेक जण झोपेतून उठताच भविष्य पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसतात. मात्र त्या भविष्यात खरंच तत्थ आहे का, याचा कुणीच विचार करीत नाही. जर टीव्हीतील त्या पाखंडी माणसाला भविष्य कळले असते तर पुण्यात बॉम्बस्फोटच झाला नसता. त्यापूर्वीच त्या पाखंडी माणसाला माहिती कळली असते. परंतु असे कधीही होत नसून, ती अंधश्रद्धा असल्याचे ते म्हणाले. डॉ. अशोक पावडे यांनी विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख निर्माण करून क्षमता वाढविण्याचे आवाहन केले; अन्यथा पुढील काळ फार कठीण राहणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले. कार्यक्रमाचे संचालन युगल शेंडे यांनी केले. अ‍ॅड़ गंगाधर इंगळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)