शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
4
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
5
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
6
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
7
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
8
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
9
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
10
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
11
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
12
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
13
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
14
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
15
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
16
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
17
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
18
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
19
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
20
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ

By admin | Updated: August 10, 2014 01:28 IST

आजच्या विज्ञान युगातही अनेक चुकीच्या समजुतीवर विश्वास ठेवला जातो. पोथ्या चमत्काराने भरल्या आहेत. मात्र संतसाहित्यातून मनुष्याला जगण्याचा मार्ग मिळतो व ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ सापडतो,

अंनिसची रौप्य वर्ष पूर्ती : ज्ञानेश्वर रक्षक यांचे प्रतिपादन नागपूर : आजच्या विज्ञान युगातही अनेक चुकीच्या समजुतीवर विश्वास ठेवला जातो. पोथ्या चमत्काराने भरल्या आहेत. मात्र संतसाहित्यातून मनुष्याला जगण्याचा मार्ग मिळतो व ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ सापडतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य वर्ष पूर्तीनिमित्त शनिवारी ‘विवेक जागृती संकल्प कुटुंब मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. सक्करदरा येथील सेवादल महिला विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष संजय शेंडे होते. मंचावर डॉ. अशोक चोपडे, मधुकर धंदरे, अ‍ॅड. गंगाधर इंगळे, चंद्रकांत श्रीखंडे, डॉ. प्रवीण चरडे व युगल शेंडे उपस्थित होते. रक्षक पुढे म्हणाले, संतांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. एल्गार पुकारला. समाजाला मार्ग दाखविण्याचे काम केले आहे. मात्र आम्ही त्यांना पोथ्यांमध्ये बसविले. त्यांचे विचार कधीच डोक्यात भरले नाही. त्यामुळेच आज अंधश्रद्धेच्या आहारी जात आहे. अनेक जण झोपेतून उठताच भविष्य पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसतात. मात्र त्या भविष्यात खरंच तत्थ आहे का, याचा कुणीच विचार करीत नाही. जर टीव्हीतील त्या पाखंडी माणसाला भविष्य कळले असते तर पुण्यात बॉम्बस्फोटच झाला नसता. त्यापूर्वीच त्या पाखंडी माणसाला माहिती कळली असते. परंतु असे कधीही होत नसून, ती अंधश्रद्धा असल्याचे ते म्हणाले. डॉ. अशोक पावडे यांनी विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख निर्माण करून क्षमता वाढविण्याचे आवाहन केले; अन्यथा पुढील काळ फार कठीण राहणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले. कार्यक्रमाचे संचालन युगल शेंडे यांनी केले. अ‍ॅड़ गंगाधर इंगळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)