शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

# Me Too : अकबर दोषी असतील तर कारवाई व्हावी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:17 IST

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर कायद्यानुसार कारवाईदेखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंघाच्या शस्त्रपूजनात काहीच गैर नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर कायद्यानुसार कारवाईदेखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.नागपुरात रविभवन येथे त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी टू’ मोहिमेतील सर्वच आरोप खोटे असतील असे नाही. काही जण इतरांची बदनामी करण्यासाठी असे करतदेखील असतील. मात्र दुर्लक्ष करण्याजोगे हे आरोप नाहीत. एम.जे.अकबर यांच्यावर अनेक महिलांनी आरोप केले. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. याची चौकशी व्हायला हवी, असे आठवले म्हणाले. मी नीतीमत्तेचे पालन करणारा असल्यामुळे माझ्यावर कधीच असे आरोप लागणार नाही, असा दावादेखील त्यांनी केला.संघाला परंपरांचे पालन करण्याचा अधिकारराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवादरम्यान होणाऱ्या शस्त्रपूजनाला काही लोक विरोध करत आहेत. मात्र शस्त्रपूजन हा परंपरेचा भाग आहे. त्यात गैर काहीच नाही. संघाला परंपरेचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या मुद्याचे भांडवल करून संघावर आरोप करणे अयोग्य असल्याचा चिमटा त्यांनी इतर संघटनांना काढला.लोकसभेच्या तीन जागा हव्याआगामी लोकसभा निवडणुकांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असलेल्या ‘आरपीआय’च्या उमेदवारांना राज्यात तीन जागा मिळायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वत: मी दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून उत्सुक आहे. तर विदर्भात एक जागा मिळायला हवी. आम्ही यंदा बहुजन व्यतिरिक्त इतर समाजातील उमेदवारांनादेखील तिकीट देऊ, असे आठवले यांनी स्पष्ट केले.विदर्भ निर्मितीला आणखी पाच वर्षेवेगळ््या विदर्भाची निर्मिती झाली पाहिजे असे आमच्या पक्षाचे धोरण आहे. मात्र काही कारणांमुळे यंदा ती निर्मिती होऊ शकली नाही. मात्र २०२४ पर्यंत नक्कीच विदर्भ वेगळे राज्य झाले असेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.‘एमआयएम’-‘भारिप’च्या युतीमुळे फरक नाही‘एमआयएम’ व भारिप बहुजन महासंघ यांच्या युतीमुळे राज्यात ‘रालोआ’ला काहीही फरक पडणार नाही. उलट काँग्रेसला याचा फटका बसेल व आम्हाला फायदाच होईल, असे प्रतिपादन आठवले यांनी केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMetoo Campaignमीटू