शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

# Me Too : अकबर दोषी असतील तर कारवाई व्हावी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:17 IST

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर कायद्यानुसार कारवाईदेखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंघाच्या शस्त्रपूजनात काहीच गैर नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर कायद्यानुसार कारवाईदेखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.नागपुरात रविभवन येथे त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी टू’ मोहिमेतील सर्वच आरोप खोटे असतील असे नाही. काही जण इतरांची बदनामी करण्यासाठी असे करतदेखील असतील. मात्र दुर्लक्ष करण्याजोगे हे आरोप नाहीत. एम.जे.अकबर यांच्यावर अनेक महिलांनी आरोप केले. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. याची चौकशी व्हायला हवी, असे आठवले म्हणाले. मी नीतीमत्तेचे पालन करणारा असल्यामुळे माझ्यावर कधीच असे आरोप लागणार नाही, असा दावादेखील त्यांनी केला.संघाला परंपरांचे पालन करण्याचा अधिकारराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवादरम्यान होणाऱ्या शस्त्रपूजनाला काही लोक विरोध करत आहेत. मात्र शस्त्रपूजन हा परंपरेचा भाग आहे. त्यात गैर काहीच नाही. संघाला परंपरेचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या मुद्याचे भांडवल करून संघावर आरोप करणे अयोग्य असल्याचा चिमटा त्यांनी इतर संघटनांना काढला.लोकसभेच्या तीन जागा हव्याआगामी लोकसभा निवडणुकांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असलेल्या ‘आरपीआय’च्या उमेदवारांना राज्यात तीन जागा मिळायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वत: मी दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून उत्सुक आहे. तर विदर्भात एक जागा मिळायला हवी. आम्ही यंदा बहुजन व्यतिरिक्त इतर समाजातील उमेदवारांनादेखील तिकीट देऊ, असे आठवले यांनी स्पष्ट केले.विदर्भ निर्मितीला आणखी पाच वर्षेवेगळ््या विदर्भाची निर्मिती झाली पाहिजे असे आमच्या पक्षाचे धोरण आहे. मात्र काही कारणांमुळे यंदा ती निर्मिती होऊ शकली नाही. मात्र २०२४ पर्यंत नक्कीच विदर्भ वेगळे राज्य झाले असेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.‘एमआयएम’-‘भारिप’च्या युतीमुळे फरक नाही‘एमआयएम’ व भारिप बहुजन महासंघ यांच्या युतीमुळे राज्यात ‘रालोआ’ला काहीही फरक पडणार नाही. उलट काँग्रेसला याचा फटका बसेल व आम्हाला फायदाच होईल, असे प्रतिपादन आठवले यांनी केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMetoo Campaignमीटू