शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

# Me Too : अकबर दोषी असतील तर कारवाई व्हावी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:17 IST

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर कायद्यानुसार कारवाईदेखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंघाच्या शस्त्रपूजनात काहीच गैर नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर कायद्यानुसार कारवाईदेखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.नागपुरात रविभवन येथे त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी टू’ मोहिमेतील सर्वच आरोप खोटे असतील असे नाही. काही जण इतरांची बदनामी करण्यासाठी असे करतदेखील असतील. मात्र दुर्लक्ष करण्याजोगे हे आरोप नाहीत. एम.जे.अकबर यांच्यावर अनेक महिलांनी आरोप केले. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. याची चौकशी व्हायला हवी, असे आठवले म्हणाले. मी नीतीमत्तेचे पालन करणारा असल्यामुळे माझ्यावर कधीच असे आरोप लागणार नाही, असा दावादेखील त्यांनी केला.संघाला परंपरांचे पालन करण्याचा अधिकारराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवादरम्यान होणाऱ्या शस्त्रपूजनाला काही लोक विरोध करत आहेत. मात्र शस्त्रपूजन हा परंपरेचा भाग आहे. त्यात गैर काहीच नाही. संघाला परंपरेचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या मुद्याचे भांडवल करून संघावर आरोप करणे अयोग्य असल्याचा चिमटा त्यांनी इतर संघटनांना काढला.लोकसभेच्या तीन जागा हव्याआगामी लोकसभा निवडणुकांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असलेल्या ‘आरपीआय’च्या उमेदवारांना राज्यात तीन जागा मिळायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वत: मी दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून उत्सुक आहे. तर विदर्भात एक जागा मिळायला हवी. आम्ही यंदा बहुजन व्यतिरिक्त इतर समाजातील उमेदवारांनादेखील तिकीट देऊ, असे आठवले यांनी स्पष्ट केले.विदर्भ निर्मितीला आणखी पाच वर्षेवेगळ््या विदर्भाची निर्मिती झाली पाहिजे असे आमच्या पक्षाचे धोरण आहे. मात्र काही कारणांमुळे यंदा ती निर्मिती होऊ शकली नाही. मात्र २०२४ पर्यंत नक्कीच विदर्भ वेगळे राज्य झाले असेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.‘एमआयएम’-‘भारिप’च्या युतीमुळे फरक नाही‘एमआयएम’ व भारिप बहुजन महासंघ यांच्या युतीमुळे राज्यात ‘रालोआ’ला काहीही फरक पडणार नाही. उलट काँग्रेसला याचा फटका बसेल व आम्हाला फायदाच होईल, असे प्रतिपादन आठवले यांनी केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMetoo Campaignमीटू