शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

# Me Too : अकबर दोषी असतील तर कारवाई व्हावी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:17 IST

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर कायद्यानुसार कारवाईदेखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंघाच्या शस्त्रपूजनात काहीच गैर नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर कायद्यानुसार कारवाईदेखील झाली पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.नागपुरात रविभवन येथे त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी टू’ मोहिमेतील सर्वच आरोप खोटे असतील असे नाही. काही जण इतरांची बदनामी करण्यासाठी असे करतदेखील असतील. मात्र दुर्लक्ष करण्याजोगे हे आरोप नाहीत. एम.जे.अकबर यांच्यावर अनेक महिलांनी आरोप केले. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. याची चौकशी व्हायला हवी, असे आठवले म्हणाले. मी नीतीमत्तेचे पालन करणारा असल्यामुळे माझ्यावर कधीच असे आरोप लागणार नाही, असा दावादेखील त्यांनी केला.संघाला परंपरांचे पालन करण्याचा अधिकारराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवादरम्यान होणाऱ्या शस्त्रपूजनाला काही लोक विरोध करत आहेत. मात्र शस्त्रपूजन हा परंपरेचा भाग आहे. त्यात गैर काहीच नाही. संघाला परंपरेचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या मुद्याचे भांडवल करून संघावर आरोप करणे अयोग्य असल्याचा चिमटा त्यांनी इतर संघटनांना काढला.लोकसभेच्या तीन जागा हव्याआगामी लोकसभा निवडणुकांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असलेल्या ‘आरपीआय’च्या उमेदवारांना राज्यात तीन जागा मिळायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वत: मी दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून उत्सुक आहे. तर विदर्भात एक जागा मिळायला हवी. आम्ही यंदा बहुजन व्यतिरिक्त इतर समाजातील उमेदवारांनादेखील तिकीट देऊ, असे आठवले यांनी स्पष्ट केले.विदर्भ निर्मितीला आणखी पाच वर्षेवेगळ््या विदर्भाची निर्मिती झाली पाहिजे असे आमच्या पक्षाचे धोरण आहे. मात्र काही कारणांमुळे यंदा ती निर्मिती होऊ शकली नाही. मात्र २०२४ पर्यंत नक्कीच विदर्भ वेगळे राज्य झाले असेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.‘एमआयएम’-‘भारिप’च्या युतीमुळे फरक नाही‘एमआयएम’ व भारिप बहुजन महासंघ यांच्या युतीमुळे राज्यात ‘रालोआ’ला काहीही फरक पडणार नाही. उलट काँग्रेसला याचा फटका बसेल व आम्हाला फायदाच होईल, असे प्रतिपादन आठवले यांनी केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMetoo Campaignमीटू