शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

मेयो : तब्बल २१ व्या दिवशी नमुने निगेटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:23 IST

कोरोनामुक्त होऊन गुरुवारी मेयो रुग्णालयातून घरी गेलेल्या ४४ व्यक्तीचे नमुने सलग चार वेळा पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पहिल्यांदाच घडले.

ठळक मुद्दे आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुक्त होऊन गुरुवारी मेयो रुग्णालयातून घरी गेलेल्या ४४ व्यक्तीचे नमुने सलग चार वेळा पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पहिल्यांदाच घडले. परंतु डॉक्टरांच्या चमूने हार मानली नाही. मल्टीव्हिटॅमिन सुरू केले. रुग्णांकडून प्रतिसाद मिळाला आणि तब्बल २१ व्या दिवशी नमुने निगेटिव्ह आले. या घटनेने डॉक्टरांचे मनोबल उंचावले. रुग्णालयातून घरी जाताना रुग्णाच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होता. एम्प्रेस सिटी येथील रहिवासी असलेला हा रुग्ण दिल्ली येथील प्रवासावरून नागपुरात आला. दोन आठवडे घरीच होता. ताप, खोकला ही लक्षणे असल्याने तपासणीसाठी मेयोत आला. येथील डॉक्टरांनी त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. हा रुग्ण ज्या रेल्वेतून नागपुरात आला त्याच रेल्वेत खामल्यातील पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे समोर आले. त्यांनी कोरोना संशयित म्हणून तातडीने रुग्णाला दाखल केले. २९ मार्च रोजी नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औषधोपचाराला सुरुवात झाली. परंतु १०, १४ व १८ एप्रिल रोजी नमुने तपासले असता तिन्ही नमुने पॉझिटिव्ह आले. औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते, डॉ. राखी जोशी, डॉ. मृणाल हरदास व डॉ. पांढरीपांडे यांनी याचा बारकाईने अभ्यास केला. औषधोपचारात मल्टीव्हिटॅमिनचा डोज वाढविला. रुग्णानेही स्वत:कडून योग व आयुर्वेदिक औषधोपचार सुरू केला. आणि २१ दिवशी २४ तासाच्या अंतराने घेतलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. डॉक्टरांच्या या कार्याचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याह डॉ. रवी चव्हाण, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी कौतुक केले. बाधित रुग्णानेही सर्व डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांच्या कार्याची स्तुती करीत आभार मानले. मेयो रुग्णालयातून बरा झालेला हा सातव रुग्ण होता. नागपुरातील बाधित ९८ रुग्णांमधून आतापर्यंत १५ रुग्ण बरे झाले आहेत.२ मुली २२ दिवसानंतरही पॉझिटिव्हया रुग्णासोबतच २८ व २९ मार्च रोजी १२ व १७ वर्षाची मुलगी कोरोनाबधित असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही युवतीचे नमुने ७ व्या दिवशी, १४ व्या दिवशी व १८ व्या दिवशी तपासले असता पॉझिटव्ह आले आहेत. शुक्रवारी पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. विशेष म्हणजे, यांचे वडिलांचे नमुने १४ व्या दिवशी निगेटिव्ह आले. परंतु मुलींना रुग्णालयात कसे एकटे सोडणार या विचाराने ते रुग्णालयातून घरी गेले नाही.अन्यथा अनर्थ झाला असता२८ मार्चच्या पूूर्वीपर्यंत केवळ परदेशातून आलेल्या व्यक्तींचे नमुने तपासा असे आदेश होते. मात्र, या रुग्णाकडून जी माहिती काढून घेतली आणि त्याचवेळी जो निर्णय घेतला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर या रुग्णाला घरी पाठविले असते तर आज बाधित रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली असती.

-डॉ. सागर पांडे उपवैद्यकीय अधीक्षक, मेयो