शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मेयो : तब्बल २१ व्या दिवशी नमुने निगेटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:23 IST

कोरोनामुक्त होऊन गुरुवारी मेयो रुग्णालयातून घरी गेलेल्या ४४ व्यक्तीचे नमुने सलग चार वेळा पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पहिल्यांदाच घडले.

ठळक मुद्दे आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुक्त होऊन गुरुवारी मेयो रुग्णालयातून घरी गेलेल्या ४४ व्यक्तीचे नमुने सलग चार वेळा पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पहिल्यांदाच घडले. परंतु डॉक्टरांच्या चमूने हार मानली नाही. मल्टीव्हिटॅमिन सुरू केले. रुग्णांकडून प्रतिसाद मिळाला आणि तब्बल २१ व्या दिवशी नमुने निगेटिव्ह आले. या घटनेने डॉक्टरांचे मनोबल उंचावले. रुग्णालयातून घरी जाताना रुग्णाच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होता. एम्प्रेस सिटी येथील रहिवासी असलेला हा रुग्ण दिल्ली येथील प्रवासावरून नागपुरात आला. दोन आठवडे घरीच होता. ताप, खोकला ही लक्षणे असल्याने तपासणीसाठी मेयोत आला. येथील डॉक्टरांनी त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. हा रुग्ण ज्या रेल्वेतून नागपुरात आला त्याच रेल्वेत खामल्यातील पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे समोर आले. त्यांनी कोरोना संशयित म्हणून तातडीने रुग्णाला दाखल केले. २९ मार्च रोजी नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औषधोपचाराला सुरुवात झाली. परंतु १०, १४ व १८ एप्रिल रोजी नमुने तपासले असता तिन्ही नमुने पॉझिटिव्ह आले. औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते, डॉ. राखी जोशी, डॉ. मृणाल हरदास व डॉ. पांढरीपांडे यांनी याचा बारकाईने अभ्यास केला. औषधोपचारात मल्टीव्हिटॅमिनचा डोज वाढविला. रुग्णानेही स्वत:कडून योग व आयुर्वेदिक औषधोपचार सुरू केला. आणि २१ दिवशी २४ तासाच्या अंतराने घेतलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. डॉक्टरांच्या या कार्याचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याह डॉ. रवी चव्हाण, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी कौतुक केले. बाधित रुग्णानेही सर्व डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांच्या कार्याची स्तुती करीत आभार मानले. मेयो रुग्णालयातून बरा झालेला हा सातव रुग्ण होता. नागपुरातील बाधित ९८ रुग्णांमधून आतापर्यंत १५ रुग्ण बरे झाले आहेत.२ मुली २२ दिवसानंतरही पॉझिटिव्हया रुग्णासोबतच २८ व २९ मार्च रोजी १२ व १७ वर्षाची मुलगी कोरोनाबधित असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही युवतीचे नमुने ७ व्या दिवशी, १४ व्या दिवशी व १८ व्या दिवशी तपासले असता पॉझिटव्ह आले आहेत. शुक्रवारी पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. विशेष म्हणजे, यांचे वडिलांचे नमुने १४ व्या दिवशी निगेटिव्ह आले. परंतु मुलींना रुग्णालयात कसे एकटे सोडणार या विचाराने ते रुग्णालयातून घरी गेले नाही.अन्यथा अनर्थ झाला असता२८ मार्चच्या पूूर्वीपर्यंत केवळ परदेशातून आलेल्या व्यक्तींचे नमुने तपासा असे आदेश होते. मात्र, या रुग्णाकडून जी माहिती काढून घेतली आणि त्याचवेळी जो निर्णय घेतला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर या रुग्णाला घरी पाठविले असते तर आज बाधित रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली असती.

-डॉ. सागर पांडे उपवैद्यकीय अधीक्षक, मेयो