शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सीएए, एनआरसी विरोधात विशाल रॅली : बहुजन क्रांती मोर्चासह अनेक संघटनांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 21:42 IST

केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) व एनपीआर विरोधात बुधवारी नागपुरात विशाल रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकत्त्व सुधारणा कायद्याचा कोट्यवधी हिंदूंना बसेल फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) व एनपीआर विरोधात बुधवारी नागपुरात विशाल रॅली काढण्यात आली. देशातील घुसखोर आणि बाहेरच्या देशातील मुस्लिमांची भीती दाखवून हे कायदे करण्यात आले आहेत. मात्र या कायद्यांचे दुष्परिणाम मुस्लिमच नाही तर ४० टक्के हिंदूंनाही भोगावे लागतील, असा आरोप करीत हे कायदे ताबडतोब रद्द करण्याची मागणी करून हवे तर डिएनएच्या आधारावर एनआरसी आणण्याची मागणी करण्यात आली. 

बहुजन क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात अनेक संघटना या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये मुस्लिम संघटनांसह ओबीसी, बौद्ध, ख्रिश्चन, सिख तसेच महिलांची संख्या लक्षणीय होती. दुपारी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बडकस चौक, गोळीबार चौक, अग्रसेन चौक, मोमीनपुरा, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, एलआयसी होत संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचे सभेचे रुपांतर करण्यात आले. या सभेदरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. रहमत अली, बहुजन क्रांती मोर्चाचे रविकांत मेश्राम, रवी घोडेस्वार यांच्यासह जेयुएच-एचे हाफीज बासित, सिराज अ. कासिम, डब्ल्यूपीआयचे कबीर खान, एआयएमएमएमचे शाहिद रंगुनवाला, एमआयएमचे शहर अध्यक्ष जावेद अख्तर, अल्फा ओमेगाचे पास्टर गायकवाड, ऑल इंडिया फोरमचे मोहम्मद शाहीद, भीम पँथरचे मनोज बन्सोड, तेली समाजाचे विकी बेलखोडे, एनटीडीएनटीचे दीपक ढोके, नवसंघटनाचे पी.के. मेश्राम, भीम आर्मीचे चिमणकर, रिझवानुर्रहमान खान, बुद्धिस्ट संघटनेचे शरद वासे, प्रफुल्ल पाटील, महेश शहारे, बीकेएमचे अध्यक्ष कमलेश सोरते, कुणबी बीकेएमचे गणेश चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 
मुस्लिम समुदायाविरोधात असल्याचे सांगण्यात येत असले तरी बहुसंख्य हिंदूंना या कायद्यामुळे त्रास सहन करावे लागणार असल्याचे वक्त्यांनी सांगितले. अनेक भटक्या जमाती, रोजगारासाठी कायम स्थलांतर करणारे, असंघटीत क्षेत्रात काम करणारे आणि गरीब, अशिक्षित नागरिकांना या कायद्यामुळे होरपळावे लागणार आहे. देशात बेरोजगारी, अनेक कंपन्या बंद होणे, शासकीय संस्थांचे खाजगीकरण, शैक्षणिक अभाव व अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना अशा मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी मुस्लिमांची भीती दाखवून हा कायदा करण्यात आल्याचा आरोप वक्त्यांनी केला.राष्ट्रीय प्रतिकांचा समावेश लक्षवेधीरॅलीमध्ये सर्व समाजाच्या नागरिकांचा समावेश असला तरी अपेक्षेप्रमाणे तरुण व महिलांची संख्या लक्षणीय होती. उल्लेखनीय म्हणजे जातीय प्रतीक चिन्हांपेक्षा राष्ट्रीय प्रतीक चिन्हांचा समावेश लक्षवेधी ठरला. हातात तिरंगा ध्वज उंचावण्यासह मानवी श्रुंखला करून त्यामध्ये काही फुटाचे तिरंगा ध्वज घेउन तरुण रॅलीमध्ये चालत होते. संविधानाच्या प्रतिकासह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र झळकवित होते. विविध बॅनरद्वारे केंद्र शासनाचा निषेध नोंदविला जात होता. तरुणांद्वारे ‘इन्कलाब जिंदाबाद’ व ‘हमे चाहिए आझादी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या..

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMorchaमोर्चा