शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

विवाहित मुलगीही रेल्वे अपघाताच्या भरपाईसाठी पात्र; उच्च न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 07:00 IST

Nagpur News रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीची विवाहित मुलगीही भरपाई मिळण्यासाठी पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देआठ लाख रुपये देण्याचा आदेश

राकेश घानोडे

नागपूर : रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीची विवाहित मुलगीही भरपाई मिळण्यासाठी पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला.

रेल्वे कायद्यातील कलम १२३ (बी) (आय) मध्ये मृतावर अवलंबून असलेल्या व्यक्तीची व्याख्या देण्यात आली आहे. त्यामध्ये पती, पत्नी, मुलगा, मुलगी आदींचा समावेश आहे. भरपाई अदा करण्यासाठी मुलगी अविवाहित असावी, हा निकष नाही, असेही न्यायालयाने पुढे नमूद केले. गोरेगाव, जि. गोंदिया येथील मीना शहारे या विवाहित मुलीने भरपाईसाठी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने ते अपील मंजूर करून मीनाला भरपाईसाठी पात्र ठरवले, तसेच तिला तीन महिन्यांत आठ लाख रुपये भरपाई अदा करा, असा आदेश दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

रेल्वे न्यायाधिकरणचा आदेश रद्द

मीनाने भरपाई मिळविण्यासाठी सुरुवातीला रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने २३ ऑगस्ट २०१३ रोजी तो अर्ज खारीज केला. मृताकडे प्रवासाचे तिकीट नव्हते. तो प्रामाणिक प्रवासी नव्हता. त्याच्या अपघाताकरिता रेल्वे जबाबदार नाही, असे न्यायाधिकरणचे म्हणणे होते. त्यामुळे मीनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणचा वादग्रस्त आदेशही रद्द केला.

अशी घडली घटना

मृताचे नाव सूरज गणवीर होते. तो १४ एप्रिल २०११ रोजी गोंदिया ते वडसा असा प्रवास करीत होता. रेल्वेत गर्दी असल्यामुळे तो दारात उभा होता. दरम्यान, तोल जाऊन तो खाली पडला व गंभीर जखमी होऊन मरण पावला.

तिकीट नसले तरी भरपाई अनिवार्य

अपघातानंतर मृताकडे रेल्वे प्रवासाचे तिकीट आढळून आले नाही तरी, त्याच्या वारसदारांना भरपाई देणे अनिवार्य आहे, असेदेखील उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. अपघातानंतर तिकीट हरवू शकते. तिकीट मिळाले नाही म्हणून, मृत व्यक्ती विनातिकीट प्रवास करीत होती, असा दावा रेल्वे करीत असेल तर, तो दावा सिद्ध करण्याची जबाबदारीही रेल्वेची आहे. ‘रिना देवी’ प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात याकडे लक्ष वेधण्यात आले आहे, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय