शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

विवाहित मुलगीही रेल्वे अपघाताच्या भरपाईसाठी पात्र; उच्च न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 07:00 IST

Nagpur News रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीची विवाहित मुलगीही भरपाई मिळण्यासाठी पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देआठ लाख रुपये देण्याचा आदेश

राकेश घानोडे

नागपूर : रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीची विवाहित मुलगीही भरपाई मिळण्यासाठी पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला.

रेल्वे कायद्यातील कलम १२३ (बी) (आय) मध्ये मृतावर अवलंबून असलेल्या व्यक्तीची व्याख्या देण्यात आली आहे. त्यामध्ये पती, पत्नी, मुलगा, मुलगी आदींचा समावेश आहे. भरपाई अदा करण्यासाठी मुलगी अविवाहित असावी, हा निकष नाही, असेही न्यायालयाने पुढे नमूद केले. गोरेगाव, जि. गोंदिया येथील मीना शहारे या विवाहित मुलीने भरपाईसाठी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने ते अपील मंजूर करून मीनाला भरपाईसाठी पात्र ठरवले, तसेच तिला तीन महिन्यांत आठ लाख रुपये भरपाई अदा करा, असा आदेश दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

रेल्वे न्यायाधिकरणचा आदेश रद्द

मीनाने भरपाई मिळविण्यासाठी सुरुवातीला रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने २३ ऑगस्ट २०१३ रोजी तो अर्ज खारीज केला. मृताकडे प्रवासाचे तिकीट नव्हते. तो प्रामाणिक प्रवासी नव्हता. त्याच्या अपघाताकरिता रेल्वे जबाबदार नाही, असे न्यायाधिकरणचे म्हणणे होते. त्यामुळे मीनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणचा वादग्रस्त आदेशही रद्द केला.

अशी घडली घटना

मृताचे नाव सूरज गणवीर होते. तो १४ एप्रिल २०११ रोजी गोंदिया ते वडसा असा प्रवास करीत होता. रेल्वेत गर्दी असल्यामुळे तो दारात उभा होता. दरम्यान, तोल जाऊन तो खाली पडला व गंभीर जखमी होऊन मरण पावला.

तिकीट नसले तरी भरपाई अनिवार्य

अपघातानंतर मृताकडे रेल्वे प्रवासाचे तिकीट आढळून आले नाही तरी, त्याच्या वारसदारांना भरपाई देणे अनिवार्य आहे, असेदेखील उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. अपघातानंतर तिकीट हरवू शकते. तिकीट मिळाले नाही म्हणून, मृत व्यक्ती विनातिकीट प्रवास करीत होती, असा दावा रेल्वे करीत असेल तर, तो दावा सिद्ध करण्याची जबाबदारीही रेल्वेची आहे. ‘रिना देवी’ प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात याकडे लक्ष वेधण्यात आले आहे, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय