शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मध्यस्थीतूनच सुटतील वैवाहिक वाद

By admin | Updated: July 5, 2015 02:58 IST

वैवाहिक आणि कौटुंबिक वाद हे सामोपचार व आपसी सहमतीने सोडवण्यासाठी मध्यस्थी व्यवस्था हे माध्यमच प्रभावी असून पक्षकारांनी ...

कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश बोहरी यांचे प्रतिपादननागपूर : वैवाहिक आणि कौटुंबिक वाद हे सामोपचार व आपसी सहमतीने सोडवण्यासाठी मध्यस्थी व्यवस्था हे माध्यमच प्रभावी असून पक्षकारांनी आपले वाद सोडवण्यासाठी याच माध्यमाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आय. एम. बोहरी यांनी येथे केले. कौटुंबिक न्यायालय परिसरात मध्यस्थी केंद्र आणि जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी बोहरी हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मध्यस्थी प्रक्रियेची सर्वात अधिक गरज कौटुंबिक न्यायालयाला आहे. वैवाहिक वाद निर्माण झाला की, न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात भादंविच्या ४९८ अ, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण, कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट, खावटी, मुलांचा ताबा, अशी प्रकरणे एकाच वेळी सुरू होतात. त्यामुळे पती-पत्नीशिवाय संपूर्ण कुटुंबच प्रभावित होते. यावर मध्यस्थी हाच एकमेव तोडगा आहे. कौटुंबिक विवाद हे परस्पर नात्यांवर अवलंबून असतात. अतिशय संवेदनशीलपणे ते हाताळावे लागतात. त्यामुळे सर्वांनीच समन्वय साधण्याचे काम करावे, जेणेकरून पक्षकारांना योग्य लाभ मिळेल. कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी केंद्र भरीव कार्य करीत असून, उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचेही ते म्हणाले. मनाप्रमाणे न्याय मिळवता येतोया कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जिल्हा न्यायालयाच्या सहायक सत्र न्यायाधीश श्रीमती ए. सी. राऊत या मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि मध्यस्थ या विषयावर बोलताना म्हणाल्या की, न्यायालयात प्रकरण दाखल होताच पक्षकारांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढण्यापूर्वीच प्रकरणे मध्यस्थी केंद्राकडे पाठविले तर तडजोड होण्याची शक्यता अधिक असते. न्यायालयात खटला चालून निकाल आपल्याच बाजूने लागेल, याबाबत अनिश्चितता असते. मध्यस्थी प्रक्रियेत मात्र स्वत:च्या मनाप्रमाणे जलदगतीने न्याय मिळवता येतो. कितीही वेळा प्रकरण मध्यस्थी प्रक्रियेसाठी पाठविता येते. अन् मध्यस्थीची निर्माण झाली गरजमध्यस्थी केंद्राचा मूळ गाभा, त्याची गरज आणि फायदे यावर बोलताना मध्यस्थ अ‍ॅड. ज्योती धर्माधिकारी म्हणाल्या की, कायद्याचा गैरवापर होऊन कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ लागली होती. त्यावेळी मध्यस्थीची खरी गरज निर्माण झाली. या कार्यक्रमात व्यासपीठावर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आणि मध्यस्थी केंद्राचे समन्वयक सुभाष काफरे, प्रशिक्षित मध्यस्थ अ‍ॅड. राजेंद्र राठी, जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. एस. ए. दावडा तर आभारप्रदर्शन वकील संघाचे सहसचिव अ‍ॅड. श्रीकांत गौरकर यांनी केले. पक्षकार पायल जांगडे आणि प्रशिक्षित मध्यस्थ अ‍ॅड. स्मिता देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभावी लघुनाटिका पत्नीच्या आईमुळे पती-पत्नीमध्ये निर्माण झालेला टोकाचा वाद मध्यस्थी प्रक्रियेद्वारे कसा संपुष्टात येऊ शकतो, यावर अत्यंत प्रभावीपणे एक लघुनाटिका सादर करून उपस्थितांना स्तब्ध करण्यात आले. या नाटिकेत खुद्द न्यायाधीश सुभाष काफरे यांनी न्यायाधीशाची भूमिका वठविली. मध्यस्थाची भूमिका शर्मिला चरलवार, पतीची भूमिका अ‍ॅड. नितीन रूडे, पत्नीची भूमिका अ‍ॅड. दर्शना गांधी, आईची भूमिका विवाह समुपदेशक श्रीमती एस. पी. लानकर यांनी अत्यंत प्रभावीपणे वठविली. अ‍ॅड. भारत टेकाम, अ‍ॅड. अमृता घोंगे यांनी वकिलांची भूमिका वठविली. या नाटिकेचे सूत्रसंचालन अ‍ॅड. राजेंद्र राठी यांनी केले.(प्रतिनिधी)