शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

मध्यस्थीतूनच सुटतील वैवाहिक वाद

By admin | Updated: July 5, 2015 02:58 IST

वैवाहिक आणि कौटुंबिक वाद हे सामोपचार व आपसी सहमतीने सोडवण्यासाठी मध्यस्थी व्यवस्था हे माध्यमच प्रभावी असून पक्षकारांनी ...

कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश बोहरी यांचे प्रतिपादननागपूर : वैवाहिक आणि कौटुंबिक वाद हे सामोपचार व आपसी सहमतीने सोडवण्यासाठी मध्यस्थी व्यवस्था हे माध्यमच प्रभावी असून पक्षकारांनी आपले वाद सोडवण्यासाठी याच माध्यमाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आय. एम. बोहरी यांनी येथे केले. कौटुंबिक न्यायालय परिसरात मध्यस्थी केंद्र आणि जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी बोहरी हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मध्यस्थी प्रक्रियेची सर्वात अधिक गरज कौटुंबिक न्यायालयाला आहे. वैवाहिक वाद निर्माण झाला की, न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात भादंविच्या ४९८ अ, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण, कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट, खावटी, मुलांचा ताबा, अशी प्रकरणे एकाच वेळी सुरू होतात. त्यामुळे पती-पत्नीशिवाय संपूर्ण कुटुंबच प्रभावित होते. यावर मध्यस्थी हाच एकमेव तोडगा आहे. कौटुंबिक विवाद हे परस्पर नात्यांवर अवलंबून असतात. अतिशय संवेदनशीलपणे ते हाताळावे लागतात. त्यामुळे सर्वांनीच समन्वय साधण्याचे काम करावे, जेणेकरून पक्षकारांना योग्य लाभ मिळेल. कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी केंद्र भरीव कार्य करीत असून, उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचेही ते म्हणाले. मनाप्रमाणे न्याय मिळवता येतोया कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जिल्हा न्यायालयाच्या सहायक सत्र न्यायाधीश श्रीमती ए. सी. राऊत या मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि मध्यस्थ या विषयावर बोलताना म्हणाल्या की, न्यायालयात प्रकरण दाखल होताच पक्षकारांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढण्यापूर्वीच प्रकरणे मध्यस्थी केंद्राकडे पाठविले तर तडजोड होण्याची शक्यता अधिक असते. न्यायालयात खटला चालून निकाल आपल्याच बाजूने लागेल, याबाबत अनिश्चितता असते. मध्यस्थी प्रक्रियेत मात्र स्वत:च्या मनाप्रमाणे जलदगतीने न्याय मिळवता येतो. कितीही वेळा प्रकरण मध्यस्थी प्रक्रियेसाठी पाठविता येते. अन् मध्यस्थीची निर्माण झाली गरजमध्यस्थी केंद्राचा मूळ गाभा, त्याची गरज आणि फायदे यावर बोलताना मध्यस्थ अ‍ॅड. ज्योती धर्माधिकारी म्हणाल्या की, कायद्याचा गैरवापर होऊन कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ लागली होती. त्यावेळी मध्यस्थीची खरी गरज निर्माण झाली. या कार्यक्रमात व्यासपीठावर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आणि मध्यस्थी केंद्राचे समन्वयक सुभाष काफरे, प्रशिक्षित मध्यस्थ अ‍ॅड. राजेंद्र राठी, जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. एस. ए. दावडा तर आभारप्रदर्शन वकील संघाचे सहसचिव अ‍ॅड. श्रीकांत गौरकर यांनी केले. पक्षकार पायल जांगडे आणि प्रशिक्षित मध्यस्थ अ‍ॅड. स्मिता देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभावी लघुनाटिका पत्नीच्या आईमुळे पती-पत्नीमध्ये निर्माण झालेला टोकाचा वाद मध्यस्थी प्रक्रियेद्वारे कसा संपुष्टात येऊ शकतो, यावर अत्यंत प्रभावीपणे एक लघुनाटिका सादर करून उपस्थितांना स्तब्ध करण्यात आले. या नाटिकेत खुद्द न्यायाधीश सुभाष काफरे यांनी न्यायाधीशाची भूमिका वठविली. मध्यस्थाची भूमिका शर्मिला चरलवार, पतीची भूमिका अ‍ॅड. नितीन रूडे, पत्नीची भूमिका अ‍ॅड. दर्शना गांधी, आईची भूमिका विवाह समुपदेशक श्रीमती एस. पी. लानकर यांनी अत्यंत प्रभावीपणे वठविली. अ‍ॅड. भारत टेकाम, अ‍ॅड. अमृता घोंगे यांनी वकिलांची भूमिका वठविली. या नाटिकेचे सूत्रसंचालन अ‍ॅड. राजेंद्र राठी यांनी केले.(प्रतिनिधी)