शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

 क्षुल्लक कारणांवरून लग्न तोडले जाऊ शकत नाही; तीव्र स्वरूपाची क्रूरता आवश्यक; हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 07:30 IST

Nagpur News पती-पत्नीपैकी कुणालाही घटस्फोट मिळवायचा असल्यास त्यांच्यासोबत तीव्र स्वरूपाची क्रूरता केली जात असल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.

नागपूर : लग्न हे पती-पत्नीला आयुष्यभर सोबत ठेवणारे पवित्र बंधन आहे. हे बंधन क्षुल्लक कारणांवरून तोडले जाऊ शकत नाही. त्यामुळे पती-पत्नीपैकी कुणालाही घटस्फोट मिळवायचा असल्यास त्यांच्यासोबत तीव्र स्वरूपाची क्रूरता केली जात असल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणातील दाम्पत्य आशा व नवीन (काल्पनिक नावे) मतभेदामुळे विभक्त राहात आहेत. आशा व्यवसायाने डॉक्टर आहे. कुटुंब न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळल्यामुळे तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयानेही तिला दिलासा नाकारून हे निरीक्षण नोंदविले. सासरची मंडळी धुणीभांडी, साफसफाई इत्यादी घरगुती कामे करायला लावतात. त्यांनी घरकामांसाठी मोलकरीण ठेवली नाही. ते सतत टोचून बोलतात. पती याकडे डोळेझाक करतो. तो काहीच सहकार्य करीत नाही. सासरमधील छळामुळे पहिल्यावेळी गर्भपात झाला. दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतरही सासरी काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे तब्येत खराब झाली होती. परिणामी, माहेरी जाऊन आराम करावा लागला. बाळंतपणानंतर पतीने सासरी परत नेले नाही, असे आरोप आशाने केले होते. परंतु, तिला हे आरोप सिद्ध करता आले नाहीत.

पतीचा प्रामाणिकपणा सिद्ध

आशा व नवीन यांनी १० जुलै २००० रोजी आंतरजातीय लग्न केले. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. नवीनने आशाचे सर्व आरोप अमान्य करून स्वत:चा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी विविध ठोस पुरावे सादर केले. त्यामुळे उच्च न्यायालयाला नवीनची बाजू योग्य आढळून आली. आशाला घरगुती कामे करावी लागली असती तर, ती नोकरीवर जाऊ शकली नसती. नवीनला संसार करायचा नसता तर, त्याने आशासोबत वेगळे राहण्यासाठी स्वतंत्र घर शोधले नसते, यासह विविध बाबीही न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केल्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय