शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

 क्षुल्लक कारणांवरून लग्न तोडले जाऊ शकत नाही; तीव्र स्वरूपाची क्रूरता आवश्यक; हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 07:30 IST

Nagpur News पती-पत्नीपैकी कुणालाही घटस्फोट मिळवायचा असल्यास त्यांच्यासोबत तीव्र स्वरूपाची क्रूरता केली जात असल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.

नागपूर : लग्न हे पती-पत्नीला आयुष्यभर सोबत ठेवणारे पवित्र बंधन आहे. हे बंधन क्षुल्लक कारणांवरून तोडले जाऊ शकत नाही. त्यामुळे पती-पत्नीपैकी कुणालाही घटस्फोट मिळवायचा असल्यास त्यांच्यासोबत तीव्र स्वरूपाची क्रूरता केली जात असल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणातील दाम्पत्य आशा व नवीन (काल्पनिक नावे) मतभेदामुळे विभक्त राहात आहेत. आशा व्यवसायाने डॉक्टर आहे. कुटुंब न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळल्यामुळे तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयानेही तिला दिलासा नाकारून हे निरीक्षण नोंदविले. सासरची मंडळी धुणीभांडी, साफसफाई इत्यादी घरगुती कामे करायला लावतात. त्यांनी घरकामांसाठी मोलकरीण ठेवली नाही. ते सतत टोचून बोलतात. पती याकडे डोळेझाक करतो. तो काहीच सहकार्य करीत नाही. सासरमधील छळामुळे पहिल्यावेळी गर्भपात झाला. दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतरही सासरी काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे तब्येत खराब झाली होती. परिणामी, माहेरी जाऊन आराम करावा लागला. बाळंतपणानंतर पतीने सासरी परत नेले नाही, असे आरोप आशाने केले होते. परंतु, तिला हे आरोप सिद्ध करता आले नाहीत.

पतीचा प्रामाणिकपणा सिद्ध

आशा व नवीन यांनी १० जुलै २००० रोजी आंतरजातीय लग्न केले. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. नवीनने आशाचे सर्व आरोप अमान्य करून स्वत:चा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी विविध ठोस पुरावे सादर केले. त्यामुळे उच्च न्यायालयाला नवीनची बाजू योग्य आढळून आली. आशाला घरगुती कामे करावी लागली असती तर, ती नोकरीवर जाऊ शकली नसती. नवीनला संसार करायचा नसता तर, त्याने आशासोबत वेगळे राहण्यासाठी स्वतंत्र घर शोधले नसते, यासह विविध बाबीही न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केल्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय