शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

मनपा सभागृह की मुक्यांचा बाजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:37 IST

प्रशासन वा पदाधिकाºयांकडून प्रभागातील समस्यांना न्याय न मिळाल्यास कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांना सभागृहात प्रश्न उपस्थित करता येतो.

ठळक मुद्देनगरसेवकांचा सभागृहातील आवाज बंद करणारअधिकारावर निर्बंध घालण्याचा प्रस्तावप्रश्नासाठी लागणार सभापतींची अनुमती- तर मग ही कसली लोकशाही ?

गणेश हुड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासन वा पदाधिकाºयांकडून प्रभागातील समस्यांना न्याय न मिळाल्यास कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांना सभागृहात प्रश्न उपस्थित करता येतो. जनतेच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी नगरसेवकांना प्रश्न उपस्थित करण्याचा मूलभूत अधिकार मिळाला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय देण्याची महापौरांची नैतिक जबाबदारी आहे. परंतु नगरसेवकांच्या प्रश्न उपस्थित करण्याच्या अधिकारावर निर्बंध घालून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रस्ताव आणला जाणार आहे.प्रभागातील ज्वलंत समस्या तातडीने मार्गी लागाव्या यासाठी नगरसेवक गटनेत्यांच्या माध्यमातून सभागृहात प्रश्न उपस्थित करतात. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून गटनेत्याकडून प्रश्न उपस्थित करण्याला संमती दिली जाते. पक्षीय राजकारण न करता नागरिकांना न्याय मिळावा, अशी नगरसेवकांची अपेक्षा असते. परंतु नगरसेवकांच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारावर निर्बंध घालण्यासाठी समिती गठित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नगरसेवकांनी गटनेत्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित न करता संबंधित विषय समित्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करावा. यासाठी महापौरांनी पुढाकार घेतला आहे. पुढील सभागृहात याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार असल्याची माहिती पदाधिकाºयांनी दिली.सभागृहात प्रामुख्याने रस्ते, दूषित पाणीपुरवठा, सिवेज लाईन, प्रभागात साचलेला कचरा, आरोग्य सेवा, शाळांची दूरवस्था, रस्त्यांच्या कामातील गैरप्रकार, प्रलंबित विकास कामे, अशा स्वरूपाच्या समस्या प्रश्नांच्या माध्यमातून मांडल्या जातात. वास्तविक तक्रारीनंतर प्रशासनाने दखल घेतली तर नगरसेवकांना सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याची गरजच भासणार नाही. परंतु पदाधिकाºयांचा प्रशासनावर वचक नसल्याने नगरसेवकांची कामे होत नाही. नाईलाजाने त्यांना सभागृहात प्रश्न उपस्थित करावे लागतात. नगरसेवकांच्या तक्रारी न सोडविल्यास संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची हिंमत महापौरांनी दाखविली तर आपोआपच प्रश्नांची संख्या कमी होईल. पण प्रशासनाला जाब न विचारता नगरसेवकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा घाट घातला आहे. या प्रस्तावामुळे मूलभूत अधिकार हिरावले जाणार असल्याने प्रस्तावाला विरोध दर्शविण्यासाठी महापौर व आयुक्तांना निवेदन देणार असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.शहरातील सर्वच प्रभागात कमी अधिक प्रमाणात मूलभूत समस्या आहेत. परंतु शिस्त म्हणून सत्तापक्षाच्या नगरसेवकांना प्रश्न उपस्थित करण्यावर मर्यादा आहे. सभागृहात प्रश्न उपस्थित करणाºयांची संख्या मोजकीच आहे.सत्ताधारी नगरसेवकांचाही विरोधविषय समित्यांच्या माध्यमातूनच नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याच्या प्रस्तावाला सत्तापक्षाच्या अनेक नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. सभागृहात प्रश्नच मांडता आले नाही तर प्रभागातील समस्या कशा सुटणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. उघडपणे या प्रस्तावाला विरोधही करता येत नसल्याने आम्हाला बघ्याची भूमिका घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.