शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस दोन गटात विभागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : कृषी उत्पन्न्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील केदार गट व ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : कृषी उत्पन्न्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील केदार गट व आशिष देशमुख यांच्यात विभागले आहेत. त्यांच्यातील आराेप व प्रत्याराेपांच्या फैरींमुळे नरखेड तालुक्यातील राजकीय आखाडा चांगलाच रंगला आहे. उमेदवार गटागटाने मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर देत आहेत.

या बाजार समितीवर २६ वर्षापासून आ. अनिल देशमुख गटाचे वर्चस्व आहे. नऊ वर्षांपासून याच गटाचे बबन लोहे सभापती आहेत. सहकार क्षेत्रात पकड असलेल्या सुरेश आरघोडे यांना शह देण्याकरिता त्यांचा मुलगा अमोल आरघोडे याला डावलून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील स्थानिक नेत्यांनी बबन लोहे यांना सभापतिपद बहाल केले हाेते. त्यांच्या कार्यशैलीमुळे संचालकांमध्ये फूट पडली होती.

आ. अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बंडाेपंत उमरकर, सुरेश आरघोडे, नरेश अरसडे, सतीश रेवतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे, काँग्रेसचे सुदर्शन नवघरे महाविकास आघाडी पॅनलच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. माजी आ. आशिष देशमुख यांनी बबन लोहे यांना जवळ करून भाजपशी हातमिळवणी केली व बळीराजा सहकार पॅनल रिंगणात उतरविले. या पॅनलच्या प्रचाराची धुरा डॉ. आशिष देशमुख, भाजपचे उकेश चव्हाण, मनोज कोरडे सांभाळत आहेत. दुसरीकडे, व्यापारी मतदारसंघातून विद्यमान संचालक मुशीर शेख व संदीप बालपांडे हे स्वतंत्र निवडणूक लढवित आहे.

...

मतदान व मतमाेजणी

नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सध्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (केदार गट) व शिवसेना यांचे महाविकास आघाडी पॅनल व काँग्रेस (डॉ. आशिष देशमुख गट) व भाजप यांच्या बळीराजा सहकार पॅनल यांच्यात थेट लढत आहे. एकूण १८ संचालक पदांसाठी ही निवडणूक होत असून, सेवा सहकारी संस्था गटातून ११, ग्रामपंचायत गटातून ४, अडते व व्यापारी गटातून २ व हमाल तोलारी गटातून १ असे एकूण १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी ३ ऑक्टोबर राेजी मतदान तर ४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

...

सागवान ताेड, रिकव्हरी प्रकरण चर्चेत

या उत्पन्न बाजार समितीच्या भारसिंगी येथील यार्डातील अवैध सागवान ताेड प्रकरण, ऑडिट रिपाेर्टमध्ये काही संचालकांवर काढण्यात आलेली रिकव्हरी ही प्रकरणे सध्या चर्चेत आली आहेत. नरखेड संत्रा बाजार जगविख्यात आहे. पण, येथे शेतकऱ्यांच्या संत्र्यासाठी अद्यापही पक्के शेड उभारण्यात आले नाही. शेतकरी भवनातील सुविधांचा अभाव, अस्वच्छता, कार्यालय दुरुस्ती व रंगरंगोटी अभाव, यासह अन्य बाबींमुळे संचालकांमध्ये असंतोष निर्माण हाेऊन त्यांच्यात दुफळी निर्माण झाली. मध्यंतरी बबन लाेहे यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते अनिल देशमुखांपासून दुरावले आहेत.

...