शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

अन्न विक्रेत्यांवर केवळ कारवाईचा फास, दंड व शिक्षा नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 00:52 IST

भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर केवळ कारवाई करण्यात येते. त्यानंतर विक्रेत्यांचे काय होते, याची माहिती बाहेर येत नाही. किरकोळ दंड आकारून त्यांना सोडण्यात येते. अन्न सुरक्षा मानके कायद्यात सहा महिन्याची शिक्षा किंवा पाच लाखांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. पण अन्न व औषध विभागाच्या नागपूर विभागांतर्गत सहा महिन्याची शिक्षा वा पाच लाखांपर्यंत दंड झाल्याची एकही नोंद नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे फावत आहे. विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे विक्रेत्यांना शिक्षा आणि जास्त दंड कधीही आकारण्यात येत नाही, अशी प्रतिक्रिया ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभाग : नमुने गोळा करण्यापुरतेच काम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर केवळ कारवाई करण्यात येते. त्यानंतर विक्रेत्यांचे काय होते, याची माहिती बाहेर येत नाही. किरकोळ दंड आकारून त्यांना सोडण्यात येते. अन्न सुरक्षा मानके कायद्यात सहा महिन्याची शिक्षा किंवा पाच लाखांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. पण अन्न व औषध विभागाच्या नागपूर विभागांतर्गत सहा महिन्याची शिक्षा वा पाच लाखांपर्यंत दंड झाल्याची एकही नोंद नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे फावत आहे. विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे विक्रेत्यांना शिक्षा आणि जास्त दंड कधीही आकारण्यात येत नाही, अशी प्रतिक्रिया ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.खाद्यतेलात भेसळबाजारात तयार मिळणारे खाद्यपदार्थ पाकिटात बंद करून दिले पाहिजेत, असा नियम आहे. विभागाला नियमांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरावा लागतो. घाणीवर तयार होणारे आणि छोट्यामोठ्या तेल घाणीत गाळले जाणारे खाद्यतेल अजूनही सुटे विकले जात आहे. ग्रामीण भागातही खुल्या तेलाची सरसकट विक्री होते. खुल्या तेलात भेसळीची १०० टक्के शक्यता असते. विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे हा व्यवसाय सर्रास सुरू आहे. विभागाचा परवाना घेतलेला दुकानदारही असे खुले तेल विकत असेल तर त्याला एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. पाकिटावर कंपनीचे नाव, तेलाचे वजन, पॅकिंगची तारीख आणि आतील घटकांचे वर्णन लिहावे, असे कायद्यात नमूद आहे.तेलाच्या ठोक व्यापाऱ्याला एकाच वेळी ९०० क्विंटलपेक्षा अधिक साठा ठेवता येत नाही. किरकोळ व्यापाऱ्यांसाठी हे बंधन १०० लिटर एवढे आहे. भेसळीची सुरुवात अशा बेकायदा साठ्यापासून होते. भेसळीमुळे तेलाच्या रासायनिक स्वरूपात काही बदल होतात आणि त्यामुळे ते तेल खाण्यास योग्य राहात नाही. म्हणूनच आता ग्राहकांनीच तेल पॅकिंगमध्येच विकत घ्यावे.खाद्य पदार्थांची शुद्धता मानकानुसार असावीखाद्य पदार्थांची शुद्धता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मानकाप्रमाणे असणे आवश्यक आहे. अनेकदा पदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार बरेच अन्न उत्पादक आणि विक्रेत्यांकडून होतो. विक्री परवाना नसताना विविध खाद्य पदार्थांची दुकाने थाटलेली दिसतात. अशा विभागाने बिगर परवाना दुकानांवर कारवाई करून फार कमी दंड वसूल केला आहे. परवाना नसलेल्या आणि कायद्याचे उल्लंघन करीत असलेल्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप अ.भा. ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी यांनी केला आहे.अन्न विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक उल्लंघन केल्यास पाच लाखांचा दंडशहर तसेच ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेते, पान टपरीधारक तसेच अन्न व खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना नोंदणी, परवाना बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्यास पाच लाख रुपयांचा दंड केला जाणार असल्याचेही एफडीएने स्पष्ट केले. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ आणि नियमन २०११ नुसार सर्व अन्न व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवाना तसेच नोंदणी करणे बंधनकारक आहे. १२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विक्रेत्यांना १०० रुपये भरून नोंदणी तर १२ लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्त्पन्न असणाऱ्या विक्रेत्यांना कमीत कमी दोन हजार तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये शुल्क भरून परवाना मिळवणे आवश्यक आहे. विनापरवाना किंवा नोंदणी व्यवसाय करणाऱ्यास कायद्याच्या कलम ६३ नुसार सहा महिने कारावास तसेच पाच लाखांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.खटले निश्चितच दाखल होणारनमुन्याच्या अहवालाच्या आधारे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर निश्चितच खटले दाखल करण्यात येणार आहे. दिवाळीच्या दिवसात नागपूर विभागात खाद्यतेल आणि मिठाईचे १०० पेक्षा जास्त नमुने घेतले आहेत. सर्व नमुने नागपूर आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. १४ ते १५ दिवसात निकाल अपेक्षित आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रातून नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असल्यामुळे अहवाल येण्यास उशीर होतो. दिवाळीत जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले आहे. प्रत्येक प्रकरणात जातीने लक्ष घालून खटले दाखल करणार आहे.मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन विभाग.

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfoodअन्न