शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

मरावे परी ‘अवयव’रूपी उरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:21 IST

निसर्गाने मानवाला अवयवांच्या रूपात अनेक मौल्यवान गोष्टी अगदी नि:शुल्कपणे भेट दिल्या आहेत.

ठळक मुद्देअंजली भांडारकर यांनी घेतली अवयवदानाची शपथ : इतरांमध्येही जागृतीचा प्रयत्न

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाने मानवाला अवयवांच्या रूपात अनेक मौल्यवान गोष्टी अगदी नि:शुल्कपणे भेट दिल्या आहेत. मात्र मृत्यूनंतर जाळून किंवा पुरून हे अनमोल अवयव नष्ट केले जातात. हा कुठला धर्म आहे? त्यापेक्षा आपल्या शरीरातील ही निसर्गाची भेट इतरांना दिली तर अवयवांची प्रतीक्षा करणाºया अनेकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात आणि मृत्यूनंतरही अवयवांच्या रूपात इतरांमध्ये जिवंत राहिले जाऊ शकते. हा विचार स्वत: अवयवदानाची शपथ घेऊन इतरांमध्ये रुजविण्याची धडपड डॉ. अंजली भांडारकर करीत आहेत.डॉ. अंजली भांडारकर हे नाव फार परिचित नसले तरी त्यांनी घेतलेला संकल्प मोठा आणि प्रेरणा देणारा आहे. डॉ. अंजली यांनी अवयवदानाची माहिती मिळताच आठ वर्षांपूर्वी स्वत:च्या शरीरातील अवयव दान करण्याची शपथच घेतली. त्यांनी मोहन फाऊंडेशनच्या माध्यमातून मेंदूमृत अवस्थेत नेत्रदान, अवयवदान आणि मरणोत्तर देहदानाचे स्वेच्छापत्र भरून घेतले. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत तब्बल ३४ वेळा रक्तदानही केले आहे. केवळ फॉर्म भरून त्या थांबल्या नाहीत तर, आपल्याला मिळालेला प्रकाश इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांची धडपड चालली आहे. अवयवदानासंबधी कुठल्याही संस्था, संघटनेच्या कार्यक्रमात त्या जातात. स्वत: घेतलेला संकल्प इतरांना सांगतात व अवयवदानाचे महत्त्व पटवून इतरांना त्यासाठी प्रवृत्त करतात. देवाच्या कीर्तनापेक्षा हे मार्गदर्शन मोलाचे आणि महत्त्वाचे आहे, असे त्यांचे ठाम मत.वास्तविक दान हा शब्द त्यांना मान्य नाही. शरीरातील अवयव मौल्यवान असले तरी ते निसर्गाने मोफत दिलेली भेट आहे. त्यामुळे ही भेट आपण फार तर शेअर किंवा अर्पण करू शकतो, अशी त्यांची प्रामाणिक भावना. त्यात जातीधर्माचे बंधन नाही आणि हिंदू-मुस्लीम असा भेदही नाही. हाच खरा मानवधर्म असल्याचे त्या सांगतात.मेंदूमृत झालेली व्यक्ती फार तर दोन-चार दिवस जगू शकते व मृत्यू अटळ आहे. त्यावेळी त्याच्या शरीराचे अवयव चांगल्या स्वरूपात असतात. अशावेळी कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला तर गरजू व्यक्तींना फायदा होऊ शकतो. शरीरातील किडनी, यकृताचा भाग, हृदयाचे व्हॉल्व, आतडे, डोळे, स्कीन आदी आठ अवयव दान केले जाऊ शकतात. त्यामुळे इतर आठ व्यक्तींच्या शरीरात अवयवांच्या रूपात मृत व्यक्ती जिवंत राहू शकते. हो मात्र अवयवांच्या व्यवसायावर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्या म्हणतात.अवयवदानाची संस्कृती रुजणे आवश्यकभारतात लोक अवयव घेण्यासाठी उत्सुक असतात, मात्र देण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे देशात अवयवांची गरज असलेल्यांची प्रतीक्षा यादी फार मोठी आहे. त्यापेक्षा परदेशात रुग्णालयातील डॉक्टर निर्णय घेऊन मेंदूमृत व्यक्तींचे अवयव इतरांना दान करतात. त्यामुळे स्पेन, अमेरिकेसारख्या प्रगत देशात गरजूंची प्रतीक्षा यादी नाही. भारतात मात्र मृत्यू होईपर्यंत प्रतीक्षा केली जाते व नंतर देह जाळल्या जातो. आपल्याकडे अवयवदानाची संस्कृती रुजणे आवश्यक आहे. नातेवाईकांनी सकारात्मक निर्णय घेतला तर आपला प्रिय व्यक्ती ते इतरांमध्ये बघू शकतात. हे उदात्त दान म्हणजे मृत्यूनंतरही टिकणारी निरपेक्ष मैत्री होय असे वाटते.- डॉ. अंजली भांडारकर