शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या राजकारणात मराठी माणूस टिकत नाही

By admin | Updated: May 31, 2014 01:03 IST

सामान्यत: दिल्लीच्या राजकारणात अंतर्गत काय सुरू आहे. ते देशात फारसे कळत नाही. निर्णय आणि आरोप - प्रत्यारोपांच्या बाबतीत बातम्या वाहिन्यांवर आणि माध्यमात येतात.

राम खांडेकर : माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मुख्य सचिवांशी संवाद नागपूर : सामान्यत: दिल्लीच्या राजकारणात अंतर्गत काय सुरू आहे. ते देशात फारसे कळत नाही.  निर्णय आणि आरोप - प्रत्यारोपांच्या बाबतीत बातम्या वाहिन्यांवर आणि माध्यमात येतात. पण  अंतर्गत बरेच काही शिजत असते. या सार्‍या राजकारणात टिकून राहणे मराठी माणसांसाठी  अतिशय कठीण आहे. राज्यातले राजकारण आणि देशाचे राजकारण यात बरेच अंतर आहे. त्यात  विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि विरोधी पक्षाला विश्‍वासात घेऊन काम करणे कुठल्याही  पंतप्रधानांसाठी एक आव्हानच असते, असे मत देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे  मुख्य सचिव राम खांडेकर यांनी व्यक्त केले. वनराईच्यावतीने डॉ. गिरीश गांधी यांनी राम खांडेकर यांच्या आठवणींबाबत एक संवाद निवडक  लोकांसाठी आयोजित केला होता. याप्रसंगी नरसिंहराव यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविताना  त्यांनी नरसिंहराव यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. नेत्यांना बरेचदा अनेक बाबी कळत  नाही. जनभावनेच्या आग्रहाला मोठमोठे नेते बळी पडतात आणि त्यांना नंतर त्याची किंमतही  मोजावी लागते. लातूरला भूकंप झाल्यावर नरसिंहराव यांना अनेकांनी त्वरित लातूरला भेट देण्याची  विनंती केली होती. या भूकंपाने ते पंतप्रधान म्हणून व्यथितही झाले होते. जनभावना पाहता त्यांनी  त्वरित लातूरला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी त्यांच्या जवळ होतो. पंतप्रधान म्हणून त्यांनी  भूकंप झाल्याबरोबर तेथे जाऊ नये, अशी सूचना मी त्यांना केली. कारण पंतप्रधान घटनास्थळी  जाणार म्हटल्यावर रस्ते बंद करण्यात येणार, काम थांबविले जाणार. त्यामुळे नागरिकांचा जीव  वाचविण्याच्या कार्यात अडथळा निर्माण होणार. भूमिका आणि भावना चांगली असली तरी काही  वेळेला त्वरित न जाणे योग्य असते. तेथील मृतदेह पाहायला जाऊन काहीच हाती लागत नाही.  एखादी घटना घडल्यावर तेथील लोकांचे अश्रू पुसायला पंतप्रधानांनी गेले पाहिजे. त्यामुळेच घटना  घडल्यावर तीन दिवसांनी जाण्याचा सल्ला मी त्यांना दिला आणि त्यांनी तो लगेच मानला.  चंदीगडला एका शिबिराच्या तंबूला आग लागली आणि त्यात २५0 विद्यार्थी होरपळून गेले.  त्यावेळीही मी त्यांना दोन दिवसांनी जाण्याची सूचना केली होती. त्यामुळेच एखादा अधिकारी  सारासार विवेकबुद्धीने विचार करणारा असला तर नेत्याला तो योग्य सूचना करू शकतो. यात मी  माझे काम केले पण निर्णय त्यांचाच होता.पण नरसिंहराव यांच्यासारख्या मोठय़ा नेत्याने त्यावर विचार केला, ही मोठी बाब आहे. नरसिंहराव  यांच्या फार जवळ कुणी नव्हते पण शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी  त्यांना साथ दिली. राजकीय नेते प्रचंड महत्वाकांक्षी असतात. त्यामुळे या नेत्यांचे संबंध एकमेकांशी  चांगले असले तरी राजकीय महत्वाकांक्षेपायी मतभेद होत राहतात. प्रत्येकवेळी हे मतभेद  राजकारणाच्या पलिकडे सामान्य माणसांना कळत नाहीत. कळू शकत नाहीत. पण सर्वोच्च पदावर  आरुढ असलेल्या नेत्याला हे सारेच रुसवे-फुगवे सहन करावे लागतात. राज्यसभेवर जाण्यासाठी  प्रत्येकाचे वेगवेगळे ठोकताळे असतात. या सार्‍या लॉबिंगमध्ये योग्य निर्णय घेणे, फार कठीण  होऊन बसते. पण नरसिंहराव यांनी मोठय़ा कौशल्याने माणसे सांभाळलीत. केवळ नरसिंहराव होते  म्हणूनच काँग्रेसचे सरकार पाच वर्षे सत्तेत राहू शकले. माणसे सांभाळण्याची त्यांची हातोटी  वादातीतच म्हणावी लागेल. माझ्याशी नेहमीच त्यांचा संवाद मराठीत व्हायचा. पंतप्रधान  असतानाही त्यांचे वाचनातले सातत्या मला नेहमीच खुणावायचे. विमान प्रवास करताना ते नेहमी  तीन पुस्तके ठेवायचे. एका पुस्तकाची काही पाने वाचली की दुसरे पुस्तक हाती घ्यायचे. विशेष  म्हणजे सरकार चालविताना त्यांनी पक्षाकडे लक्ष दिले नाही. सरकार आणि पक्ष एकाच वेळी  चालविले तर कुणालाच न्याय देता येत नाही, असे त्यांचे मत होते. पंतप्रधान असताना त्यांच्यावर  काही आरोप झाले असले तरी कुठल्याही अनियमिततेत आणि भ्रष्टाचाराला ते बळी पडले नाहीत,  हे मी जवळून पहिले, असे खांडेकर म्हणाले. याप्रसंगी गिरीश गांधी म्हणाले, शरद पवार यांनी  त्यावेळी माझे नाव राज्यसभेसाठी सुचविले होते. शरद पवारांनी नाव सुचविले म्हणजे मी  राज्यसभेवर जाणार, अशीच सर्वांंंंची भूमिका झाली. पण शरद पवार मला म्हणाले, नरसिंहराव  यांनी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केले तरच तुम्ही राज्यसभेवर जाऊ शकता. माझ्याकडून मी  नाव सुचविले आहे. त्यावेळी नरसिंहराव यांना कसे भेटावे? हा प्रश्न माझ्यासमोर पडला. पण  त्यानंतर राज्यसभेची जागाच रिक्त झाली नाही, त्यामुळे माझे राज्यसभेवर जाणे हुकले. याप्रसंगी  खांडेकर यांनी विविध प्रश्नांना मोकळी उत्तरे दिली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजीत,  बाळ कुळकर्णी, गजानन निमदेव, रमेश बोरकुटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)