शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अ.भा. मराठी साहित्य संमेलन; रविवारी जाहीर होणार नवीन संमेलनाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 10:28 IST

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गुजरात राज्यातील बडोदा येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून रविवारी १० डिसेंबर रोजी निर्वाचित संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल.

ठळक मुद्देमतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

आॅनलाईन लोकमतनागपूर : ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गुजरात राज्यातील बडोदा येथे होत आहे. यंदाच्या पंचरंगी लढतीत कोण बाजी मारतो याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून शनिवारी ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ पर्यंत सर्व मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचलेल्या असतील. रविवारी १० डिसेंबर रोजी निर्वाचित संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, लक्ष्मीकांत देशमुख आणि राजन खान हे पाच उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात आहेत. अखिल भारतीय मराठी जणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षाची निवड जेमतेम १ हजार ७० मतदार करीत असतात. त्यापैकी फक्त ४०५ मतपत्रिका ४ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत पोचल्या होत्या, अशी माहिती आहे. शेवटच्या दोन दिवसात मतपत्रिका येण्याचा वेग वाढेल, अशी अपेक्षा आहे. मतदारांना मतपत्रिका पाठवताना काहींचे पत्ते चुकले. त्यांना पुन्हा डुप्लिकेट मतपत्रिका पाठवण्यासोबतच ज्यांचे राहण्याचे ठिकाण बदलले आहे, त्यांच्या विनंतीवरून त्यांनाही पुन्हा डुप्लिकेट मतपत्रिका पाठवल्याचे कळते. अखेर ही दीर्घ प्रक्रिया पूर्ण होत आली असून निकाल जाहीर व्हायला आता केवळ चार दिवस उरले आहेत. सुरुवातील पंचरंगी वाटणारी ही निवडणूक आता जवळजवळ दुहेरी लढतीवर येऊन थांबली आहे. मतदानाच्या विभाजनाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडते त्यावरून नवीन संमेलनाध्यक्ष ठरणार आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत बृहन्महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये या निवडणुकीबाबत विशेष उत्साह आहे. ते आपला कौल कुणाला देतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. उमेदवारांचे प्रचार कार्य थांबले असून ते निकालाची उत्कटतेने प्रतीक्षा करीत आहेत. रविवारी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात जाहीर होणारे नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षाचे नाव विदर्भातले असेल की पश्चिम महाराष्ट्रातले याकडेही त्यांचे लक्ष लागले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारासाठी विदर्भातून फोनकुणी कितीही नाकारले तरी या निवडणुकीमध्ये प्रादेशिकवादाचा ‘फॅक्टर’ महत्त्वाचा ठरतोच. संमेलनाध्यक्ष आपला प्रांतातला असावा, असा सर्वांचाच प्रयत्न असतो. परंतु यंदा विदर्भातील चित्र वेगळे होते. विदर्भातीलच काही साहित्यिकांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी तिकडच्या आपल्या मित्रांना फोन केल्याची चर्चा असून अशा ‘फोनाफोनी’ने विदर्भातील उमेदवारांचे किती नुकसान केले हेही निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :marathiमराठी