शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार

By admin | Updated: July 3, 2014 00:53 IST

मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान नाही. त्यामुळे मराठी सिनेमा पाहिलाच पाहिजे, असे त्याला वाटत नाही. त्यामुळे मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार आहे,

मुलाखत : सिनेपटकथाकार संजय पवार यांची लोकमतशी बातचीतसंतोष कुंडकर - चंद्रपूरमराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान नाही. त्यामुळे मराठी सिनेमा पाहिलाच पाहिजे, असे त्याला वाटत नाही. त्यामुळे मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार आहे, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात सिनेपटकथा तथा नाट्य लेखक संजय पवार यांनी व्यक्त केले.राज्य नाट्य स्पर्धेतील विजेत्या नाटकांच्या महोत्सवाला बुधवारपासून येथे प्रारंभ झाला. या महोत्सवासाठी येथे आलेल्या संजय पवार यांनी ‘लोकमत’शी बातचीत केली. मराठी सिनेमांना प्रेक्षक मिळत नाही, ही ओरड सातत्याने होते. त्याला असलेल्या अनेक कारणांपैकी भाषाभिमान हेदेखील एक कारण आहे. दक्षिणेतील चित्रपट केवळ दक्षिणेतच नाही, अन्य प्रांत वा देशातही चालतात. पण खुद्द महाराष्ट्रातच मराठी सिनेमा पहायला मराठी माणूस जात नाही. यावरून मराठी माणसांना मराठीचा किती अभिमान आहे, हे दिसून येते. दक्षिणेतील लोकांना त्यांच्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. म्हणून तेथे केवळ त्यांच्या भाषेतील चित्रपट चालतात. तेथे हिंदी सिनेमांनाही स्थान नाही. भोजपुरी सिनेमे दुबईतही चालतात. पण मराठी सिनेमा मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या बाहेर कधी पडत नाही. केवळ मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, अशी ओरड करण्यापेक्षा आपला सिनेमा किती दर्जेदार आहे, याचाही निर्मात्यांनी विचार केला पाहिजे. कोणतंही प्रॉडक्ट तेव्हाच विकल्या जाईल, जेव्हा त्याला दर्जा असेल. आज डझनवार मराठी सिनेमे निघतात. केवळ शासनाचे अनुदान मिळते म्हणून मराठी सिनेमांची निर्मिती करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु त्यातील किती सिनेमे चित्रपटगृहापर्यंत पोहचतात, हा देखील संशोधनाचा विषय आहे, असेही ते म्हणाले. मी ठरवूनच चित्रपटसृष्टीत आलो, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये प्रशिक्षण घेतले. तेथून नाट्यलेखनाची आवड निर्माण झाली. सुरूवातीला नाटकातही कामे केली. त्यानंतर एकांकिका लिहिल्या. चाळ कमिटी, जाहिरात, बाप बी बाप, दुकान कुणी मांडू नये, नार्इंटीन फोर्टी सेव्हन ते एके फोर्टी सेव्हन यासह विविध नाटकांचे लेखन केले. यातील अनेक नाटके गाजली. पुढे सिनेक्षेत्रात पाऊल टाकले. जब्बार पटेलांच्या ‘मुक्ता’ या सिनेमासाठी संवाद लेखन केले. त्यानंतर डोंबिवली फास्ट (संवाद), सातच्या आत घरात (संवाद), सनई चौघडे (संवाद), मी सिंधूताई सपकाळ (पटकथा संवाद), मी शिवाजी राजे भोसले बोलतोय.. (पटकथा संवाद) या चित्रपटांसाठी लेखनाचे काम केले. येत्या ११ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘लई भारी’ या चित्रपटाचे संवाद लेखनही पवार यांनी केले आहे. हिंदीतही त्यांनी ज्युली, बिरूद या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे. मी सिंधूताई सपकाळ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.