शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार

By admin | Updated: July 3, 2014 00:53 IST

मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान नाही. त्यामुळे मराठी सिनेमा पाहिलाच पाहिजे, असे त्याला वाटत नाही. त्यामुळे मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार आहे,

मुलाखत : सिनेपटकथाकार संजय पवार यांची लोकमतशी बातचीतसंतोष कुंडकर - चंद्रपूरमराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान नाही. त्यामुळे मराठी सिनेमा पाहिलाच पाहिजे, असे त्याला वाटत नाही. त्यामुळे मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार आहे, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात सिनेपटकथा तथा नाट्य लेखक संजय पवार यांनी व्यक्त केले.राज्य नाट्य स्पर्धेतील विजेत्या नाटकांच्या महोत्सवाला बुधवारपासून येथे प्रारंभ झाला. या महोत्सवासाठी येथे आलेल्या संजय पवार यांनी ‘लोकमत’शी बातचीत केली. मराठी सिनेमांना प्रेक्षक मिळत नाही, ही ओरड सातत्याने होते. त्याला असलेल्या अनेक कारणांपैकी भाषाभिमान हेदेखील एक कारण आहे. दक्षिणेतील चित्रपट केवळ दक्षिणेतच नाही, अन्य प्रांत वा देशातही चालतात. पण खुद्द महाराष्ट्रातच मराठी सिनेमा पहायला मराठी माणूस जात नाही. यावरून मराठी माणसांना मराठीचा किती अभिमान आहे, हे दिसून येते. दक्षिणेतील लोकांना त्यांच्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. म्हणून तेथे केवळ त्यांच्या भाषेतील चित्रपट चालतात. तेथे हिंदी सिनेमांनाही स्थान नाही. भोजपुरी सिनेमे दुबईतही चालतात. पण मराठी सिनेमा मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या बाहेर कधी पडत नाही. केवळ मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, अशी ओरड करण्यापेक्षा आपला सिनेमा किती दर्जेदार आहे, याचाही निर्मात्यांनी विचार केला पाहिजे. कोणतंही प्रॉडक्ट तेव्हाच विकल्या जाईल, जेव्हा त्याला दर्जा असेल. आज डझनवार मराठी सिनेमे निघतात. केवळ शासनाचे अनुदान मिळते म्हणून मराठी सिनेमांची निर्मिती करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु त्यातील किती सिनेमे चित्रपटगृहापर्यंत पोहचतात, हा देखील संशोधनाचा विषय आहे, असेही ते म्हणाले. मी ठरवूनच चित्रपटसृष्टीत आलो, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये प्रशिक्षण घेतले. तेथून नाट्यलेखनाची आवड निर्माण झाली. सुरूवातीला नाटकातही कामे केली. त्यानंतर एकांकिका लिहिल्या. चाळ कमिटी, जाहिरात, बाप बी बाप, दुकान कुणी मांडू नये, नार्इंटीन फोर्टी सेव्हन ते एके फोर्टी सेव्हन यासह विविध नाटकांचे लेखन केले. यातील अनेक नाटके गाजली. पुढे सिनेक्षेत्रात पाऊल टाकले. जब्बार पटेलांच्या ‘मुक्ता’ या सिनेमासाठी संवाद लेखन केले. त्यानंतर डोंबिवली फास्ट (संवाद), सातच्या आत घरात (संवाद), सनई चौघडे (संवाद), मी सिंधूताई सपकाळ (पटकथा संवाद), मी शिवाजी राजे भोसले बोलतोय.. (पटकथा संवाद) या चित्रपटांसाठी लेखनाचे काम केले. येत्या ११ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘लई भारी’ या चित्रपटाचे संवाद लेखनही पवार यांनी केले आहे. हिंदीतही त्यांनी ज्युली, बिरूद या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे. मी सिंधूताई सपकाळ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.