शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मराठी राजभाषा दिन; एवढ्या जगात माय मानतो मराठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 11:12 IST

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याकडेही पाठपुरावा कमीच पडत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देमराठीबाबतच्या मागण्या कधी पूर्ण होणार? मराठी विद्यापीठ, विकास प्राधिकरण स्वप्नेच ठरणार!

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, नरहरी महाराजांसारख्या संतांनी मराठीला समृद्ध केले. मराठी भाषेचे आंदोलन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बळकट केले आणि इंग्रजीला पर्यायी शब्द निर्माण करवून दिले. एवढेच नव्हे तर ज्यांच्या साहित्याने मराठीला गर्भश्रीमंत केले अशा कुसुमाग्रज उपाख्य वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंतीला ‘मराठी राजभाषा दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय होऊनही बरीच वर्षे उलटली. असे असतानाही मराठी का विसरतो आहोत की विसरण्यास भाग पाडले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.मराठी भाषा, संस्कृती संवर्धन, विकासासाठी अनेक संस्था राज्यात कार्यरत आहेत. त्यात चर्चेत असणाऱ्या मराठी साहित्य महामंडळ, मराठी नाट्य परिषद आणि अन्य संस्था आपल्या प्रमुख अभियानात कमी पडत असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे मराठीच्या विकासासाठी मराठी विद्यापीठ आणि मराठी भाषा विकास प्राधिकरणाच्या स्थापनेची मागणी केली जात आहे. त्यासाठी दक्षिण भारतीय राज्यांचा आराखडाही महाराष्ट्र सरकारच्या संबंधित विविध खात्यांकडेही पाठविण्यात आला आहे. तरी देखील मराठी शासनाकडूनच मराठीबाबतची उदासीनता वारंवार निदर्शनास येत आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याकडेही पाठपुरावा कमीच पडत असल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर ज्या मराठी चित्रपटांचा लोहा सबंध देश मानतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलही घेतली जात आहे, अशा मराठी चित्रपटांसाठी सिनेमा थिएटर्सही उपलब्ध होत नाहीत.

आपल्याच भाषेचा इतका तिटकार का?जवळपास देशातील प्रत्येक राज्यात त्यांच्या भाषेचा अधिकार मानला गेला आहे. शालेय स्तरापासून ते शासकीय स्तरापर्यंत राजभाषा या नात्याने सर्व व्यवहार त्यांच्याच भाषेत होतो. मात्र, देशातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्यां भाषांमध्ये तिसरा-चौथा क्रमांक लागणाऱ्यां आणि जगात नववा-दहावा क्रमांक लागणाऱ्यां मराठी भाषेबाबत मराठी राज्यातच प्रचंड तुसडेपणाचा भाव दाखवला जात आहे.

वर्षानुवर्षे राहणाऱ्यां परभाषिकांना मराठीच येत नाही!मराठी माणूस देशाच्या व जगाच्या कानाकोपऱ्यांत गेल्यावर तिथे त्याला तिथल्या भाषेशिवाय पर्याय नसल्याने तिकडील भाषा शिकावी आणि बोलावीच लागते. महाराष्ट्रात सर्वसमावेशी वृत्ती जोपासली गेल्याने, भाषिक उदारता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्यां अनेक परभाषिकांना मराठी लिहिता, वाचता आणि बोलताही येत नाही. ते हिंदी, इंग्रजीमध्ये बोलले तरी त्यांना मराठी भाषिक आपल्या उदार स्वभावानुसार त्यांना सहज स्वीकारतो. याउलट देशाच्या कोणत्याही ठिकाणी गेलो तर उत्तरे तेथील भाषेतून मिळतील.

विद्यापीठ, प्राधिकरणाचे वचन पाळावे - श्रीपाद जोशीमराठी विद्यापीठाची स्थापना, मराठी विकास प्राधिकारणाची स्थापना, किमान १२वी पर्यंत मराठी सक्तीची अशा मागण्या सरकारकडे वारंवार करून झाल्या आहेत. त्याबाबतीतले आराखडेही पाठवून झाले आहेत. बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासनेही दिली होती. मात्र, एकाही मागण्यांची पूर्तता झालेली नाही. विद्यमान सरकारने आमच्या मागण्या त्यांच्या जाहीरनाम्यात घेतल्या होत्या. ते वचन पाळावे अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख व अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे.

टॅग्स :marathiमराठी