शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

मराठा मोर्चाने दिली नवी शिस्त, नवी प्रेरणा

By admin | Updated: October 27, 2016 02:29 IST

सकल मराठा समाजातर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवारी मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात आला.

इतर मोर्चेकरी आदर्श घेणार का? : नागपूरकरांचा शिस्तीला सलामनागपूर : सकल मराठा समाजातर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवारी मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने नागपूरकरांचे केवळ लक्षच वेधले नाही तर शिस्त, स्वच्छता आणि संयमाचे आदर्शही डोळ्यासमोर ठेवले. हजारोंच्या संख्येने जमलेल्या मराठ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एकजूट होत, एकही नारा न देता, आरडाओरड, तोडफोड, दगडफेक न करता नि:शब्द हुंकार देत आपला आवाज बुलंद केला. त्यांच्या या शिस्तीला नागपूरकरांनी सलामही केला. या मोर्चाच्या निमित्ताने इतर मोर्चेकरी हा आदर्श घेणार का, असा प्रश्न चर्चेत आला आहे. मराठा क्रांती मूकमोर्चात समाजातील महिला आणि युवतीच्या हाती मोर्चाचे नेतृत्व सोपवून मराठ्यांचा जनसागर शिस्तबद्धरीत्या रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. मोर्चेकरी रेशीमबाग मैदानावर जमले. तेथून पाचच्या रांगेत शिस्तीत मोर्चा बाहेर पडला. हाती फलक होते. अनेकांच्या तोंडावर, दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. हजारो लोक मोर्चात सहभागी झाले मात्र मूकमोर्चा असल्यामुळे कुणीही एकमेकांशी एक शब्दही बोलत नव्हते. एवढेच नव्हे तर मोर्चातील एकहीजण मोबाईलवर बोलताना दिसले नाही. मोर्चा कस्तूरचंद पार्कवर पोहचेपर्यंत कुणीही मोर्चाच्या रांगेतून बाहेर पडले नाही. मोर्चा रस्त्यात मध्येमध्ये थांबायचा तोही एका ठरवून दिलेल्या शिस्तीत. मोर्चेकऱ्यांना पिण्याचे पाणी देण्यासाठी, वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ठराविक अंतरावर स्वयंसेवक तैनात होते. स्वयंसेवक मोर्चेकऱ्यांना पाण्याचे पाऊच द्यायचे. पाणी पिऊन झाले की पाऊच रस्त्यावर न फेकता ते पुन्हा स्वयंसेवकाकडे परत द्यायचे. स्वयंसेवक सर्व रिकामे पाऊच एका पिशवीत जमा करायचे. त्यामुळे रेशीमबाग ते कस्तूरचंद पार्कपर्यंतच्या रस्त्याने हजारोंचा मोर्चा गेल्यानंंतरही रस्त्यावर पाण्याचे एकही पाऊच किंवा कचरा पडलेला दिसला नाही. मोर्चेकरी कस्तूरचंद पार्कवर पोहचले. तेथे त्यांना बिस्किट पाकीट देण्यात आले. मात्र, बिस्किट खाल्यानंतर रिकामी झालेली पाकिटेदेखील गोळा करण्यात आलीत. कुणीही एकही बॅनर, पोस्टर, झेंडा रस्त्यावर टाकून दिला नाही. मोर्चानंतर सर्व सामग्री शिस्तबद्धरीत्या एका ठिकाणी गोळा करण्यात आली. यामुळे मोर्चानंतरही स्वच्छता पाहून येथून खरोखरच मोर्चा निघाला यावर विश्वासच बसत नव्हता. एरवी मोर्चे म्हटले की पोलिसांवर प्रचंड दबाव असतो. त्यातही समाजाचे मोर्चे असले की पोलिसांना सावध भूमिका घ्यावी लागते. मात्र, या मोर्चात मोर्चेकऱ्यांनी दाखविलेल्या शिस्तीमुळे पोलिसांना अजिबात मनस्ताप झाला नाही. उलट आयोजकांनी पाण्याचे पाऊच व बिस्किटाची पाकिटे पोलिसांकडेही ठेवली होती. त्यामुळे पोलीसही मोर्चातील नागरिकांना स्वयंस्फूर्तपणे मदत करताना दिसले. नागपुरात आजवर अनेक मोर्चे निघाले. मात्र, अशी शिस्त, संयम व स्वच्छता क्वचितच पहायला मिळाली असेल. एरवी मोठमोठ्याने घोषणा देणाऱ्या मोर्चांकडे नागपूरकर एक मिनिट थांबून पाहतही नाही. मात्र, नि:शब्द निघालेला मोर्चा समोरून जात असल्याचे पाहून नागपूरकरही शांत अन् स्तब्ध होत या शिस्तीला सलाम करीत होते. (प्रतिनिधी)