शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एक मराठा, लाख मराठा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा बुधवारी मुंबईत धडक देणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. मंगळवारी सायंकाळी नागपुरातून शेकडो कार्यकर्ते रेल्वेगाड्यांनी मुंबईकडे रवाना झाले.बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील जिजामाता उद्यान येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने नागपुरातून मंगळवारी ...

ठळक मुद्देमराठा मोर्चासाठी नागपुरातून शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना :रेल्वेगाड्यांमध्ये शिस्त पाळण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा बुधवारी मुंबईत धडक देणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. मंगळवारी सायंकाळी नागपुरातून शेकडो कार्यकर्ते रेल्वेगाड्यांनी मुंबईकडे रवाना झाले.बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील जिजामाता उद्यान येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने नागपुरातून मंगळवारी विदर्भ एक्स्प्रेस तसेच दुरांतो एक्स्प्रेसने शेकडो कार्यकर्ते रवाना झाले. रेल्वेगाडी निघायच्या अगोदर सर्व जण नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाटावर एकत्र आले व सर्वांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ नारे लावले. एकाच ठिकाणी आरक्षण मिळू न शकल्याने कार्यकर्ते विविध डब्यांमध्ये बसले होते.इतर प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सर्वच जण घेत होते. अनेक आंदोलक दुपारच्या सुमारासच मुंबईकडे रस्तामार्गाने निघाले आहेत. शिवाय विदर्भातील इतर भागांतील कार्यकर्ते अगोदरच रेल्वेगाड्यांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती दुरांतो एक्स्प्रेसने जाणाºया आंदोलकांनी दिली.सर्व बाबींचे ‘आॅनलाईन अपडेट’मुंबईला गेल्यावर नेमके कुठल्या स्थानकावर उतरायचे, न्याहरी कुठे करायची, त्यानंतर भायखळ्याला कसे जायचे व तेथून आझाद मैदानाकडे येणाºया मोर्चात कसे सहभागी व्हायचे, याची संपूर्ण माहिती आंदोलकांना अगोदरच देण्यात आली आहे. यासंदर्भात सर्वांच्या मोबाईलवर ‘अपडेट्स’ टाकण्यात येत आहेत.रेल्वेची विशेष व्यवस्थामराठा क्रांती मोर्चात सहभागी होणारे कार्यकर्ते तिकीट काढूनच मुंबईकडे गेले. मात्र कार्यकर्त्यांची होणारी संभाव्य गर्दी व याचा फायदा घेऊन काही समाजकंटक विनातिकीट प्रवास करण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वे प्रशासनातर्फे फलाटांवर विशेष लक्ष देण्यात येत होते. प्रवेशद्वारावरच ६ ते ७ तिकीट तपासनीस उभे होते. शिवाय रेल्वेस्थानक आणि रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षेवर जास्त भर देण्यात आला होता.