शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

अनेक निकालांची ‘डेडलाईन’ चुकली

By admin | Updated: July 29, 2015 03:01 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेलेच आहेत.

नागपूर विद्यापीठ : अभियांत्रिकीचे सर्व निकाल ३० जुलैपर्यंतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेलेच आहेत. विद्यापीठाने निकाल कधी जाहीर होणार याची यादी संकेतस्थळावर टाकली होती. परंतु यातील वेळापत्रकानुसार अनेक अभ्यासक्रमांचे निकाल ‘डेडलाईन’ टळून गेल्यावरदेखील लागलेले नाहीत. विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या मोठमोठ्या दाव्यांचे काय झाले असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान अभियांत्रिकीचे सर्व निकाल ३० जुलैपर्यंत घोषित होतील असा दावा कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला आहे.विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अर्ध्याहून अधिक निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठाने निकाल कधी लागतील याची यादी जाहीर केली होती. या यादीत नमूद केलेली तारीख उलटून गेल्यावरदेखील अनेक निकाल जाहीर झालेलेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. यामुळे, विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या जात आहे. विद्यापीठाने कधी तरी आपला शब्द पाळावा अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा निकाल लागला असून आता अंतिम आणि द्वितीय वर्षाचे निकाल कधी लागणार याबाबत प्रतीक्षा कायम आहे. उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे मागील आठवड्यात एमटेकचे प्रवेश सुरू झाले आहेत. प्रवेशपूर्व परीक्षा केव्हाच पार पडली असून आता प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशप्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी गुणपत्रिका आवश्यक आहे, मात्र अंतिम वर्षाचा निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थी संघटनांची विद्यापीठावर धडकदरम्यान, लवकरात लवकर विद्यापीठाने निकाल लावून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.महाराष्ट्र निवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभारी परीक्षा नियंत्रक अनिल हिरेखन यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले. एप्रिल महिन्यात परीक्षा होऊनदेखील अद्याप निकाल कसा लागत नाही असा सवाल यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. छात्र युवा संघर्ष समितीनेदेखील याच मुद्द्यावर कुलगुरूंची भेट घेतली. निकाल वेळेवर लागत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होत असून त्यांच्या स्थितीसाठी विद्यापीठच जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.