शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अनेक निकालांची ‘डेडलाईन’ चुकली

By admin | Updated: July 29, 2015 03:01 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेलेच आहेत.

नागपूर विद्यापीठ : अभियांत्रिकीचे सर्व निकाल ३० जुलैपर्यंतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेलेच आहेत. विद्यापीठाने निकाल कधी जाहीर होणार याची यादी संकेतस्थळावर टाकली होती. परंतु यातील वेळापत्रकानुसार अनेक अभ्यासक्रमांचे निकाल ‘डेडलाईन’ टळून गेल्यावरदेखील लागलेले नाहीत. विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या मोठमोठ्या दाव्यांचे काय झाले असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान अभियांत्रिकीचे सर्व निकाल ३० जुलैपर्यंत घोषित होतील असा दावा कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला आहे.विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अर्ध्याहून अधिक निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठाने निकाल कधी लागतील याची यादी जाहीर केली होती. या यादीत नमूद केलेली तारीख उलटून गेल्यावरदेखील अनेक निकाल जाहीर झालेलेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. यामुळे, विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या जात आहे. विद्यापीठाने कधी तरी आपला शब्द पाळावा अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा निकाल लागला असून आता अंतिम आणि द्वितीय वर्षाचे निकाल कधी लागणार याबाबत प्रतीक्षा कायम आहे. उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे मागील आठवड्यात एमटेकचे प्रवेश सुरू झाले आहेत. प्रवेशपूर्व परीक्षा केव्हाच पार पडली असून आता प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशप्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी गुणपत्रिका आवश्यक आहे, मात्र अंतिम वर्षाचा निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थी संघटनांची विद्यापीठावर धडकदरम्यान, लवकरात लवकर विद्यापीठाने निकाल लावून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.महाराष्ट्र निवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभारी परीक्षा नियंत्रक अनिल हिरेखन यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले. एप्रिल महिन्यात परीक्षा होऊनदेखील अद्याप निकाल कसा लागत नाही असा सवाल यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. छात्र युवा संघर्ष समितीनेदेखील याच मुद्द्यावर कुलगुरूंची भेट घेतली. निकाल वेळेवर लागत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होत असून त्यांच्या स्थितीसाठी विद्यापीठच जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.