शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

४ हजाराचे मनुष्यबळ आले ४४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST

नागपूर : शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक पानलोट व्यवस्थापन कार्यक्रम सुरू केला. त्यातून महाराष्ट्रात वसुंधरा पानलोट ...

नागपूर : शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक पानलोट व्यवस्थापन कार्यक्रम सुरू केला. त्यातून महाराष्ट्रात वसुंधरा पानलोट योजनेंतर्गत पाणी साठवणुकीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. २००९ पासून राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली. या कार्यक्रमात राज्यात ४ हजारावर कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्याने आपली सेवा दिली. पण सरकार आता हा कार्यक्रम गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. ४४ कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर एकात्मिक पानलोट व्यवस्थापनाचे काम सुरू असून, त्यांचेही ४ महिन्यापासून वेतन झालेले नाही.

पाण्याचे नियोजन आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी हा कार्यक्रम आखला होता. आतापर्यंत या कार्यक्रमाचे ६ टप्पे पार पडले. नागपूर विभागात १२९ पानलोटचे प्रकल्प राबविण्यात आले. पाणी साठणुकीसाठी सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, मजगी, शेततळे आदी काम करण्यात येत होते. जलयुक्त शिवार कार्यक्रमात एकात्मिक पानलोटचा निधी वापरण्यात आला. या कार्यक्रमात तालुकास्तरावर कृषीतज्ञ, समुदाय संघटक, उपजीविका तज्ञ म्हणून एमएसडब्ल्यू, कृषी डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांची नियुक्ती केली होती. या जिल्हास्तरावर व विभाग स्तरावर सुद्धा कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमात ४ ते ७ वर्षाचा एक प्रोजेक्ट होता. सरकारने प्रोजेक्ट संपल्यावर त्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले. असे करता करता आज जिल्हास्तरावर २ व विभाग स्तरावर १ कर्मचारी या कार्यक्रमात काम करतोय. त्यांचेही वेतन ४ महिन्यापासून झालेले नाही. सरकारने हा प्रकल्प ३१ मार्चपर्यंत गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचे एकात्मिक पानलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

कृषी विभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत होता. कृषी विभागाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे वसुंधरा पाणलोट योजनेत मोठा घोळ झाला. निकृष्ट दर्जाचे बंधारे, त्यांची झालेली पडझड, काही ठिकाणी कागदोपत्री भक्कम वाटणारे बंधारे अशा प्रकारांमुळे पाण्याऐवजी फक्त पैसाच झिरपला. या कार्यक्रमातील ५० टक्के निधीची लूटमार झाली, असेही संघटनेकडून सांगण्यात आले.

- एकात्मिक पानलोट व्यवस्थापन ही यंत्रणा कृषी विभागाशी संलग्नित न ठेवला स्वतंत्र ठेवली असती, तर त्याचे चांगले परिणाम झाले असते. राज्यातील ७० टक्के कोरडवाहू क्षेत्र या कार्यक्रमामुळे समृद्ध करण्याचा उद्देश सरकारचा होता. या कार्यक्रमात काही गावे समृद्ध झाली, काही ठेकेदारांचे भले झाले. काही अधिकाऱ्यांचा विकास झाला. मात्र या कार्यक्रमातील कर्मचारी भरडला गेला, तो बेरोजगार झाला.

प्रशांत पवार, विदर्भ प्रमुख, महा. राज्य एकात्मिक पानलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटना