शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मांढळ बाजार समिती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेना संक्रमणामुळे राज्य शासनाच्या आदेशान्वये मांढळ (ता. कुही) कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमाल खरेदी-विक्री ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : काेराेना संक्रमणामुळे राज्य शासनाच्या आदेशान्वये मांढळ (ता. कुही) कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार बंद करण्यात आले हाेते. बाजार समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तीन आठवड्यानंतर बाजार समितीतील खरेदी-विक्री पुन्हा सुरू हाेणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केली आणि इतर बाजार समित्यांसाेबतच मांढळ बाजार समिती ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या काळात बाजार समितीच्या यार्डातील धान्य, वाळलेली मिरची व बैलबाजार बंद ठेवण्यात आले हाेते. शेतीमाल व गुरे खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांची माेठी अडचण झाली हाेती.

दरम्यान, बाजार समिती प्रशासनाने मागील आठवड्यात बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय ३ मे राेजी घेतला. त्याअनुषंगाने ४ मेपासून बाजार सुरू करण्यात आला. मात्र, बाजारामुळे काेराेना संक्रमण वाढण्याची शक्यता व्यक्त करीत मांढळ ग्रामपंचायत प्रशासनाने यावर आक्षेप नाेंदवित मिरची बाजार सुरू करण्यास मनाई केली. त्यांनी तसे तहसीलदार व पाेलीस निरीक्षक यांना पत्रही दिले. ही समस्या साेडविण्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने सरपंच व पाेलीस निरीक्षकांशी यावर विस्तृत सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे हा बाजार रविवार (दि. ९) पासून सुरू करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनीषा फेंडर, बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, हरिष कढव, सरपंच शाहू कुलसंगे, मोहन मते, पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, प्रदीप कुलरकर, राजेश तिवस्कर, भागेश्वर फेंडर, सचिव अंकुश झंझाळ, आशिष आवळे, प्रदीप धनरे, खेमराज तितरमारे, गुणाकार सेलोकर, उदाराम फेंडर, विनोद ठवकर, नरेश चौधरी, शंकी अरोरा उपस्थित होते.

...

ऐनवेळी तिढा

बाजारात रविवारी खरेदी-विक्री व्यवहाराला सुरुवात हाेताच पाेलीस बाजारात दाखल झाले. त्यामुळे बाजार पुन्हा बंद हाेण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सभापती मनाेज तितरमारे यांनी पुन्हा संबंधितांशी संपर्क साधून चर्चा केली. त्यावर बाजार भरवणे किंवा बंद ठेवणे याबाबत आपण कुणाकडे तक्रार अथवा सूचना केली नाही, अशी माहिती सरपंच शाहू कुलसंगे यांनी दिली. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता हा बाजार सुरू करण्यात आल्याचे मनाेज तितरमारे यांनी सर्वांना पटवून देत उपाययाेजनांचे काटेकाेर पालन केले जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने ऐनवेळी निर्माण झालेला तिढा सुटला.