शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मांढळ बाजार समिती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेना संक्रमणामुळे राज्य शासनाच्या आदेशान्वये मांढळ (ता. कुही) कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमाल खरेदी-विक्री ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : काेराेना संक्रमणामुळे राज्य शासनाच्या आदेशान्वये मांढळ (ता. कुही) कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार बंद करण्यात आले हाेते. बाजार समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तीन आठवड्यानंतर बाजार समितीतील खरेदी-विक्री पुन्हा सुरू हाेणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केली आणि इतर बाजार समित्यांसाेबतच मांढळ बाजार समिती ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या काळात बाजार समितीच्या यार्डातील धान्य, वाळलेली मिरची व बैलबाजार बंद ठेवण्यात आले हाेते. शेतीमाल व गुरे खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांची माेठी अडचण झाली हाेती.

दरम्यान, बाजार समिती प्रशासनाने मागील आठवड्यात बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय ३ मे राेजी घेतला. त्याअनुषंगाने ४ मेपासून बाजार सुरू करण्यात आला. मात्र, बाजारामुळे काेराेना संक्रमण वाढण्याची शक्यता व्यक्त करीत मांढळ ग्रामपंचायत प्रशासनाने यावर आक्षेप नाेंदवित मिरची बाजार सुरू करण्यास मनाई केली. त्यांनी तसे तहसीलदार व पाेलीस निरीक्षक यांना पत्रही दिले. ही समस्या साेडविण्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने सरपंच व पाेलीस निरीक्षकांशी यावर विस्तृत सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे हा बाजार रविवार (दि. ९) पासून सुरू करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनीषा फेंडर, बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, हरिष कढव, सरपंच शाहू कुलसंगे, मोहन मते, पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, प्रदीप कुलरकर, राजेश तिवस्कर, भागेश्वर फेंडर, सचिव अंकुश झंझाळ, आशिष आवळे, प्रदीप धनरे, खेमराज तितरमारे, गुणाकार सेलोकर, उदाराम फेंडर, विनोद ठवकर, नरेश चौधरी, शंकी अरोरा उपस्थित होते.

...

ऐनवेळी तिढा

बाजारात रविवारी खरेदी-विक्री व्यवहाराला सुरुवात हाेताच पाेलीस बाजारात दाखल झाले. त्यामुळे बाजार पुन्हा बंद हाेण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सभापती मनाेज तितरमारे यांनी पुन्हा संबंधितांशी संपर्क साधून चर्चा केली. त्यावर बाजार भरवणे किंवा बंद ठेवणे याबाबत आपण कुणाकडे तक्रार अथवा सूचना केली नाही, अशी माहिती सरपंच शाहू कुलसंगे यांनी दिली. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता हा बाजार सुरू करण्यात आल्याचे मनाेज तितरमारे यांनी सर्वांना पटवून देत उपाययाेजनांचे काटेकाेर पालन केले जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने ऐनवेळी निर्माण झालेला तिढा सुटला.