शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

घटस्फोटानंतरही पत्नीला खावटी देणे बंधनकारक; पतीचा विरोध फेटाळून लावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2023 07:45 IST

Nagpur News कायद्याने निर्धारित करून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या पत्नीला घटस्फोट झाल्यानंतरही खावटी देणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी एका प्रकरणात दिला.

राकेश घानोडे

नागपूर : कायद्याने निर्धारित करून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या पत्नीला घटस्फोट झाल्यानंतरही खावटी देणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी एका प्रकरणात दिला. तसेच, पतीची खावटीच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली.

पत्नी कोणत्याही ठोस कारणांशिवाय विभक्त राहत असल्याने आणि ती क्रूरपणे वागत असल्यामुळे कुटुंब न्यायालयाने घटस्फोट दिला आहे. करिता, पत्नीला खावटी दिली जाऊ शकत नाही, असे पतीचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने हा दावा अमान्य केला. घटस्फोट झाल्यानंतर पत्नी स्वत:ची देखभाल करण्यास असमर्थ असेल आणि तिने दुसरे लग्न केले नसेल तर, फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १२५ अनुसार ती पतीकडून खावटी मिळण्यासाठी पात्र आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याशिवाय, पत्नीने कुटुंब न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, याकडेही लक्ष वेधले. २६ जून २०१९ रोजी कुटुंब न्यायालयाने पीडित पत्नीला सात हजार रुपये खावटी मंजूर केली आहे. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पती रेल्वेत कर्मचारी असून त्याला ४५ हजार रुपये मासिक वेतन मिळते. या दाम्पत्याचे २७ मे २०११ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर तीन वर्षांतच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यांना १० वर्षांची मुलगी आहे.

काय म्हणतो कायदा?

फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १२५ (१) मध्ये पत्नी म्हणजे कोण? याविषयी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार पत्नीच्या श्रेणीमध्ये पतीने घटस्फोट दिलेल्या, तसेच पतीकडून घटस्फोट घेतलेल्या आणि घटस्फोटानंतर दुसरे लग्न केले नाही, अशा महिलेचा समावेश होतो. पत्नीची आयुष्यभर देखभाल करणे व तिला समान दर्जाचे जीवन प्रदान करणे पतीचे नैतिक दायित्व आहे, हे या तरतुदीवरून स्पष्ट होते.

- ॲड. रोहण छाबरा, हायकोर्ट

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय