शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

मंदाताई आमटेंच्या धाडीने दिले दारूबंदी आंदोलनाला बळ

By admin | Updated: September 2, 2014 01:09 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकल्या जात आहे. या दारूने अनेक जीव घेतले आहेत. तरीही राज्याचा उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन अवैध दारू विक्री

भामरागडात जप्त केली दारू : चंद्रपूर जिल्हा दारूबंदी आंदोलन तापण्याची शक्यतागडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकल्या जात आहे. या दारूने अनेक जीव घेतले आहेत. तरीही राज्याचा उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन अवैध दारू विक्री रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे गावागावातील महिलांनाच आता दारूबंदीसाठी पुढाकार घ्यावा लागत आहे.दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंदाकिनी आमटे यांनी शेकडो महिलांसह भामरागडसारख्या दुर्गम गावात दारूविक्रेत्यांवर धाड घालून अवैध दारुसाठा पकडण्यास पोलिसांना भाग पाडले. मंदातार्इंचे हे आंदोलन गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीसाठी सक्रिय काम करणाऱ्या अनेक महिला व पुरूषांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शासनाने महाराष्ट्रात वर्धा व गडचिरोली या दोन जिल्ह्यात दारूबंदी केलीे. मात्र दोन्ही ठिकाणी राजरोस विक्री सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीत चारही बाजूंना ३० ते ३५ दारू दुकानांचा वेढा पडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूचे मोठे व्यापारी येथे राजरोसपणे माल पुरवीत आहेत. चंद्रपूर जिल्हा संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी जोर धरत असताना कोकणातील काही दुकानांनाही गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दुकाने थाटण्यासाठी परवाने देण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस प्रशासनावर नक्षल मोहिमेचा भार असल्याने दारूबंदी विरोधात काम करताना त्यांना अडचणी येतात. मात्र उत्पादन शुल्क विभागाला कोणतीही अडचण नाही. जिल्ह्यात विषारी दारूही मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. पोळ्याच्या दिवशी आरमोरी तालुक्याच्या वनखी गावात एका तरूणाचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला. भामरागड गावात मागील काही वर्षात अवैध दारू विकण्यावर बंधने आली होती. मात्र अलीकडे खुलेआम विक्री वाढल्याने महिलांचा त्रासही वाढला आहे.ही बाब लक्षात घेऊन डॉ. मंदाकिनी आमटे व त्यांच्या कुटुंबातील महिलांसह शेकडो महिलांनी गावातील दारूविक्रेत्यांवर धाड मारुन साडेचार लाखाची दारू जप्त केली व पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. मंदातार्इंच्या दारूबंदीविषयक भूमिकेमुळे आंदोलनातील महिलांना बळ मिळाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनालाही आता बळकटी मिळणार आहे. राज्य सरकारने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तिनही जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी यापूर्वीच ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)