शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वन व्यवस्थापनात लक्षात घ्यावे लागणार वाघांचेही व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 21:22 IST

Nagpur News वन व्यवस्थापन करताना वाघांचेही योग्य व्यवस्थापन होईल याकडे लक्ष देण्याच्या आणि व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा

नागपूर : विदर्भातील वाघांची वाढती संख्या, जागेचे व्यस्त प्रमाण, यातून उद्भवणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. वन व्यवस्थापन करताना वाघांचेही योग्य व्यवस्थापन होईल याकडे लक्ष देण्याच्या आणि व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जीतसिंह, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोत्रे, अनिष अंधेरिया प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पोलिसांची मदत घेऊन तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन खबऱ्यांचे जाळे निर्माण करा. विदर्भात अलीकडे झालेल्या वाघांच्या शिकारीच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. हे टाळण्यासाठी जनजागृतीसोबतच कायद्याची कडक अंमलबजावणी करा, गरजेचे वाटल्यास आवश्यकतेनुसार कायद्यात बदलही करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

अपघातप्रवण स्थळ निश्चित करा

ज्या ठिकाणी वन्यजीवांचे अपघात होतात, अशी ठिकाणे निश्चित करून पर्यायी उपाययोजना राबविण्यात याव्यात. जंगलात विकासकामे करताना विशेषत: रेल्वे लाईनचे नियोजन करताना राज्याच्या वन विभागाशी चर्चा करून नियोजन केले जावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.

नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांचा व्यवस्थापन आराखडा तयार करा : आदित्य ठाकरे

शासनाने नव्याने जाहीर केलेल्या संवर्धन राखीव क्षेत्रांचा व्यवस्थापन आराखडा लवकर तयार करावा, अशा सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या. हे संवर्धन राखीव घोषित केल्याने संरक्षित वन क्षेत्रातले ग्रीन कव्हर वाढले का, हे पाहिले जावे, पुनर्जीवनीकरण करणे आवश्यक असलेल्या ठिकाणी व महामार्गालगतही वृक्ष लागवडीचा विचार केला जावा, असेही ते म्हणाले.

...

टॅग्स :Tigerवाघ