शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

ममतांनी केलाय ‘सेल्फ गोल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कूचबिहार - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आटोपला असून, अखेरच्या पाच टप्प्यांमध्ये अनेक मतदारसंघ मुस्लिमबहुल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कूचबिहार - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आटोपला असून, अखेरच्या पाच टप्प्यांमध्ये अनेक मतदारसंघ मुस्लिमबहुल आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम मतदारांना एकजूट होण्याबाबत केलेल्या आवाहनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तृणमूल कॉंग्रेसला मत विभाजित होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी असे आवाहन केले आहे. मात्र, अशी भूमिका घेऊन तृणमूलने पराभव स्वीकारला असून, हा त्यांच्यासाठी ‘सेल्फ गोल' ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.

जर भाजपने सर्व हिंदूंना एकजूट होण्याचे आवाहन केले असते, तर आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून आठ ते दहा नोटीस प्राप्त झाल्या असत्या. फुटबॉलच्या मैदानातील ‘सेल्फ गोल' मोठे नुकसान करतो. निवडणुकीच्या रिंगणातदेखील तृणमूलसोबत असेच झाले आहे, असे मोदी यांनी प्रतिपादन केले.

ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लागत असलेल्या टेपवरदेखील मोदी यांनी भाष्य केले. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाईपो सर्व्हिस टॅक्स सुरू केला. गरिबांनी जोडलेला एक-एक रुपया त्या टॅक्समध्ये गेला. १० वर्षांच्या सत्ताकाळात तृणमूलच्या नेत्यांनी बंगालला अक्षरशः ओरबाडले. वंचित, आदिवासी, चहाच्या मळ्यांमधील मजुरांसोबत अन्याय होत गेला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप मोदींनी केला.