शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

ममतांनी केलाय ‘सेल्फ गोल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कूचबिहार - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आटोपला असून, अखेरच्या पाच टप्प्यांमध्ये अनेक मतदारसंघ मुस्लिमबहुल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कूचबिहार - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आटोपला असून, अखेरच्या पाच टप्प्यांमध्ये अनेक मतदारसंघ मुस्लिमबहुल आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम मतदारांना एकजूट होण्याबाबत केलेल्या आवाहनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तृणमूल कॉंग्रेसला मत विभाजित होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी असे आवाहन केले आहे. मात्र, अशी भूमिका घेऊन तृणमूलने पराभव स्वीकारला असून, हा त्यांच्यासाठी ‘सेल्फ गोल' ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.

जर भाजपने सर्व हिंदूंना एकजूट होण्याचे आवाहन केले असते, तर आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून आठ ते दहा नोटीस प्राप्त झाल्या असत्या. फुटबॉलच्या मैदानातील ‘सेल्फ गोल' मोठे नुकसान करतो. निवडणुकीच्या रिंगणातदेखील तृणमूलसोबत असेच झाले आहे, असे मोदी यांनी प्रतिपादन केले.

ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लागत असलेल्या टेपवरदेखील मोदी यांनी भाष्य केले. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाईपो सर्व्हिस टॅक्स सुरू केला. गरिबांनी जोडलेला एक-एक रुपया त्या टॅक्समध्ये गेला. १० वर्षांच्या सत्ताकाळात तृणमूलच्या नेत्यांनी बंगालला अक्षरशः ओरबाडले. वंचित, आदिवासी, चहाच्या मळ्यांमधील मजुरांसोबत अन्याय होत गेला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप मोदींनी केला.