शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

सुरक्षा यंत्रणांवरील आरोपांमुळे ममता अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : निवडणूक कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाविरोधात केलेल्या आरोपांमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : निवडणूक कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाविरोधात केलेल्या आरोपांमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत आल्या आहेत. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे. ममता यांच्या निराधार, तथ्यहीन वक्तव्यांमुळे केंद्रीय सुरक्षा दलाचे मनोबल घटले आहे. हा जवानांचाच अपमान करण्याचा प्रयत्न आहे, अशी भूमिका आयोगाने मांडली आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी आपण आरोपांवर कायम असल्याचे म्हटले असून, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान लोकांना मतदान केंद्रापासून जाण्यापासून थांबवत आहेत. शिवाय महिलांशी असभ्य वागणूक करीत असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार भाजपला मदत करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. आयोगाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. यासंदर्भात त्यांना नोटीस बजाविण्यात आली असून, शनिवार ११ वाजेपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे. असे वक्तव्य करून ममता बॅनर्जी यांनी भारतीय दंड विधानाच्या अनेक कलमांचे उल्लंघन केले आहे. बॅनर्जी यांनी केंद्रीय दलाच्या जवानांवर आरोप करताना महिला मतदारांना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे हे दुर्दैवी आहे, असे नोटिशीत म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाची ही दुसरी नोटीस आहे.

ममता निराश झाल्या आहेत : शहा

केंद्रीय सुरक्षा दलांवर ममतांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री शहा यांनीदेखील भाष्य केले आहे. निवडणुकीत पराभव दिसून येत असल्याने ममता निराश झाल्या आहेत. त्यातूनच असे वक्तव्य करीत आहेत. ममता बंगालमध्ये अराजकता आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीच्या कालावधीत सुरक्षायंत्रणा आयोगाच्या निर्देशानुसार काम करतात याची जाणीव ममता यांना असायला हवी, असे शहा म्हणाले.

ममता परत आक्रमक

निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी परत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत भाजपासाठी काम करणे बंद करीत नाही तोपर्यंत सीआरपीएफच्या हस्तक्षेपाबाबत बोलत राहील. पंतप्रधान मतदानाच्या काळात परीक्षा पे चर्चाच्या माध्यमातून प्रचार करतात. ती बाब आयोगाला दिसत नाही का, असा प्रश्न ममता यांनी उपस्थित केला.