शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

तेव्हा चळवळीसाठी लग्नास नकार देत मामा खूप भांडले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:08 IST

नागपूर : आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा. मा. येवले यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त डाॅ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील सभागृहात ...

नागपूर : आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा. मा. येवले यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त डाॅ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील सभागृहात त्यांचा हृद्य सत्कार तसेच त्यांच्यावरील ‘रिपब्लिकन झंझावात : मा.मा. येवले’ या चरित्रग्रंथाचे विमाेचन करण्यात आले. यावेळी आरपीआय नेते दादासाहेब गवई यांच्या पत्नी डाॅ. कमलताई गवई यांनी मामांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मामाचे लग्न करावे म्हणून आम्ही प्रयत्न चालविले हाेते. एका डाॅक्टर मुलीशी परिचयही करून दिला. मात्र आपल्या लग्नासाठी हा खटाटाेप चालल्याचे कळताच मामा प्रचंड चिडले आणि माझ्याशी खूप भांडले. रिपब्लिकन पक्ष, समाज व चळवळीसाठी आजीवन लग्न न करण्याची भूमिका घेतल्याची आठवण कमलताई यांनी सांगितली.

काॅलेजच्या कुंभारे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदन्त नागार्जुन सुरई ससाई, आमदार प्रा. जाेगेंद्र कवाडे, समितीचे सचिव डाॅ. सुधीर फुलझेले, हरिदास टेंभुर्णे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. मेहरे, विलास गजघाटे प्रामुख्याने उपस्थित हाेते. डाॅ. कमलताई यांनी पुढे, आजारी असताना सभेला हजर राहणे, खाेलीला आग लागली तेव्हा झाेपलेल्या मामांना ओढून काढण्याचा प्रसंग व दादासाहेबांवर जीवघेणा हल्ला झाला तेव्हा मामांची तळमळ, अशा विविध आठवणींना उजाळा दिला. प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनीही चळवळीसाठी मामांनी केलेल्या कार्याच्या आठवणी उलगडल्या. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्यायावर आधारित आंबेडकरी तत्त्वज्ञान हे वैश्विक तत्त्वज्ञान आहे. ते आहे तसे साधे पण त्यावर चालणे अग्निदिव्यावर चालण्यासारखे आहे. म्हणूनच आंबेडकरी चळवळीत काम करणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. अशा कर्मठ लाेकांमध्ये मामा येवले या भीमसैनिकाचा उल्लेख येताे. त्यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी वाहिले. भारत बाैद्धमय करण्याच्या बाबासाहेबांच्या संकल्पाच्या सिद्धीसाठी मामांनी संपूर्ण मराठवाड्यात धम्म परिषदा घेतल्या. आज कार्यकर्ते श्रीमंत आहेत पण चळवळ गरीब आहे. पूर्वी कार्यकर्ते गरीब हाेते पण चळवळ श्रीमंत हाेती. ती केवळ मामांसारख्या भीमसैनिकांमुळेच. नवीन पिढीला त्यांचे कार्य माहिती व्हावे, अशी भावना प्रा. कवाडे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक मामांवरील चरित्रग्रंथाचे लेखक रविचंद्र हडसनकर यांनी केले तर संचालन एन. आर. सुटे यांनी केले.