शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

स्वत:मधील भीमसैनिक जागा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:21 IST

देशातील परिस्थिती विस्कटलेली आहे. अनुसूचित जाती, जमाती व ख्रिश्चनांवर अन्याय होत आहे. मुस्लीमांना दुय्यम नागरिक संबोधले जाते.

ठळक मुद्देधनराज डहाट : समता क्रांती परिषदेत आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील परिस्थिती विस्कटलेली आहे. अनुसूचित जाती, जमाती व ख्रिश्चनांवर अन्याय होत आहे. मुस्लीमांना दुय्यम नागरिक संबोधले जाते. मात्र या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत, कारण संघटित नाही. समतेचा लढा लढण्यासाठी आंबेडकरी समाजाला पुढाकार घ्यावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संघटना मजबूत करण्याचा संदेश दिला होता. त्यानुसार समता सैनिक दलाला बलशाली केले तर कुणी अन्याय करण्याची हिंमत करणार नाही. त्यासाठी स्वत:मधील भीमसैनिक जागा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक धनराज डहाट यांनी केले.समता सैनिक दलाच्यावतीने रविवारी धम्मगुरु भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात समता क्रांती मार्च व समता क्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेला उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अ‍ॅड. फिरदौस मिर्झा, बौद्ध रंगभूमीचे संजय जीवने, हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाचा सहकारी प्रशांत दोन्ता, हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे समन्वयक तुषार घाडगे, राजेंद्र साठे आदी उपस्थित होते. डहाट पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे ५० तुकडे झाले ही शोकांतिका आहे. मात्र बाबासाहेबांनी स्थापन केलेले समता सैनिक दल जिवंत आहे. अन्याय करणाºयापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. त्यामुळे आता अन्याय सहन करणे बंद करा व समाजात अस्मितेचा लढा उभारा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. वैभव ओगले यांनी व प्रास्ताविक अ‍ॅड. स्मिता कांबळे यांनी केले.मग अ‍ॅट्रॉसिटीच्या तक्रारी कशाला करता : अ‍ॅड. मिर्झाअ‍ॅड. फिरदौस मिर्झा यांनी रोखठोक विचार व्यक्त केले. अ‍ॅट्रॉसिटी म्हणजे मानवतेविरुद्ध उचललेले पाऊल होय. मुस्लीम राज्यकर्त्यांच्या काळात दलितांवर अन्याय झाल्याची एकही घटना नमूद नाही. समतेवर आधारीत जगातील सर्वोत्कृष्ट संविधान देणाºया महामानव डॉ. आंबेडकरांच्या देशात अन्याय होणे ही शोकांतिका आहे. संविधानाचे रक्षण करण्यासह अल्पसंख्यांक म्हणून गणल्या जाणाºया मुस्लीमांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आंबेडकरी समाजाची आहे. मात्र ते यात कमी पडतात. अ‍ॅट्रॉसिटीचा लढा देण्यासाठी न्यायव्यवस्थेसारख्या संस्थांमध्ये आमचे ‘बेस्ट’ वकील नाहीत. बाबासाहेबांनी संविधान दिले व समाजाने ते अन्याय करणाºयांच्या हातात सोपविले. आमचे लोक घटनातज्ज्ञ कधी होणार? अन्यायकर्ते आपले काम करतात, मात्र आम्ही आमचे काम करण्यात कमी पडतो. मग अन्याय होत असल्याची तक्रार कशाला करता, असा सवाल त्यांनी केला. बाबासाहेबांनी हातात तलवार घेतली नाही, तर विद्वत्तेने विषमतेविरोधात लढा दिला. आंबेडकरी समाजालाही नव्या तंत्रज्ञानाची कास धरून संविधानाचे रक्षण करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.रोहित वेमुलाची जात शोधण्याचाच तपासरोहित वेमुलाने आंबेडकरी स्टुडंट्स असोसिएशनच्या माध्यमातून हैदराबाद विद्यापीठात अधिकारासाठी संघर्ष सुरू केला तेव्हा विद्यापीठाचे कुलगुरु अप्पाराव व केंद्रीय यंत्रणेने संघटनेच्या पाच विद्यार्थ्यांविरोधात युद्ध पुकारले. याच व्यवस्थेतून रोहित वेमुलाचा मृत्यू झाला. त्यानंतरही त्याच्या मृत्यूची कारणे व विद्यापीठापीठातील जातीय गैरव्यवहार शोधण्यापेक्षा तपास यंत्रणेने त्याची जात शोधण्यातच वेळ घालविला. रोहितच्या मृत्यूनंतरही संघटनेतील विद्यार्थ्यांना यंत्रणेकडून लक्ष्य केले जात आहे व त्याच्या आईलाही त्रास दिला जात आहे. मात्र आम्ही आमचा लढा थांबविणार नाही, असे प्रतिपादन प्रशांत दोन्ता याने यावेळी केले.