शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:मधील भीमसैनिक जागा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:21 IST

देशातील परिस्थिती विस्कटलेली आहे. अनुसूचित जाती, जमाती व ख्रिश्चनांवर अन्याय होत आहे. मुस्लीमांना दुय्यम नागरिक संबोधले जाते.

ठळक मुद्देधनराज डहाट : समता क्रांती परिषदेत आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील परिस्थिती विस्कटलेली आहे. अनुसूचित जाती, जमाती व ख्रिश्चनांवर अन्याय होत आहे. मुस्लीमांना दुय्यम नागरिक संबोधले जाते. मात्र या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत, कारण संघटित नाही. समतेचा लढा लढण्यासाठी आंबेडकरी समाजाला पुढाकार घ्यावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संघटना मजबूत करण्याचा संदेश दिला होता. त्यानुसार समता सैनिक दलाला बलशाली केले तर कुणी अन्याय करण्याची हिंमत करणार नाही. त्यासाठी स्वत:मधील भीमसैनिक जागा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक धनराज डहाट यांनी केले.समता सैनिक दलाच्यावतीने रविवारी धम्मगुरु भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात समता क्रांती मार्च व समता क्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेला उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अ‍ॅड. फिरदौस मिर्झा, बौद्ध रंगभूमीचे संजय जीवने, हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाचा सहकारी प्रशांत दोन्ता, हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे समन्वयक तुषार घाडगे, राजेंद्र साठे आदी उपस्थित होते. डहाट पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे ५० तुकडे झाले ही शोकांतिका आहे. मात्र बाबासाहेबांनी स्थापन केलेले समता सैनिक दल जिवंत आहे. अन्याय करणाºयापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. त्यामुळे आता अन्याय सहन करणे बंद करा व समाजात अस्मितेचा लढा उभारा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. वैभव ओगले यांनी व प्रास्ताविक अ‍ॅड. स्मिता कांबळे यांनी केले.मग अ‍ॅट्रॉसिटीच्या तक्रारी कशाला करता : अ‍ॅड. मिर्झाअ‍ॅड. फिरदौस मिर्झा यांनी रोखठोक विचार व्यक्त केले. अ‍ॅट्रॉसिटी म्हणजे मानवतेविरुद्ध उचललेले पाऊल होय. मुस्लीम राज्यकर्त्यांच्या काळात दलितांवर अन्याय झाल्याची एकही घटना नमूद नाही. समतेवर आधारीत जगातील सर्वोत्कृष्ट संविधान देणाºया महामानव डॉ. आंबेडकरांच्या देशात अन्याय होणे ही शोकांतिका आहे. संविधानाचे रक्षण करण्यासह अल्पसंख्यांक म्हणून गणल्या जाणाºया मुस्लीमांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आंबेडकरी समाजाची आहे. मात्र ते यात कमी पडतात. अ‍ॅट्रॉसिटीचा लढा देण्यासाठी न्यायव्यवस्थेसारख्या संस्थांमध्ये आमचे ‘बेस्ट’ वकील नाहीत. बाबासाहेबांनी संविधान दिले व समाजाने ते अन्याय करणाºयांच्या हातात सोपविले. आमचे लोक घटनातज्ज्ञ कधी होणार? अन्यायकर्ते आपले काम करतात, मात्र आम्ही आमचे काम करण्यात कमी पडतो. मग अन्याय होत असल्याची तक्रार कशाला करता, असा सवाल त्यांनी केला. बाबासाहेबांनी हातात तलवार घेतली नाही, तर विद्वत्तेने विषमतेविरोधात लढा दिला. आंबेडकरी समाजालाही नव्या तंत्रज्ञानाची कास धरून संविधानाचे रक्षण करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.रोहित वेमुलाची जात शोधण्याचाच तपासरोहित वेमुलाने आंबेडकरी स्टुडंट्स असोसिएशनच्या माध्यमातून हैदराबाद विद्यापीठात अधिकारासाठी संघर्ष सुरू केला तेव्हा विद्यापीठाचे कुलगुरु अप्पाराव व केंद्रीय यंत्रणेने संघटनेच्या पाच विद्यार्थ्यांविरोधात युद्ध पुकारले. याच व्यवस्थेतून रोहित वेमुलाचा मृत्यू झाला. त्यानंतरही त्याच्या मृत्यूची कारणे व विद्यापीठापीठातील जातीय गैरव्यवहार शोधण्यापेक्षा तपास यंत्रणेने त्याची जात शोधण्यातच वेळ घालविला. रोहितच्या मृत्यूनंतरही संघटनेतील विद्यार्थ्यांना यंत्रणेकडून लक्ष्य केले जात आहे व त्याच्या आईलाही त्रास दिला जात आहे. मात्र आम्ही आमचा लढा थांबविणार नाही, असे प्रतिपादन प्रशांत दोन्ता याने यावेळी केले.