शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

युवकांना रोजगार मुख्य प्राथमिकता

By admin | Updated: August 29, 2015 03:01 IST

विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे.

नितीन गडकरी : मागास व आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा प्रयत्ननागपूर : विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे. रिलायन्स समूहामुळे औद्योगिक घराणे नागपूर, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल. देशातील मागास आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा सरकारचा प्रयत्न आहे. अलीकडेच गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.(प्रतिनिधी)विमानतळासाठी जागतिक निविदानागपूर विमानतळासाठी लवकरच जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. येथील एमआरओमध्ये मलेशिया, चीन, इंडोनेशिया यासह जगभरातील विमाने देखभाल व दुरुस्तीसाठी यावीत, यासाठी विमान दुरुस्ती कर माफ करावा, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचे गडकरी यांनी सांगितले. उद्योगांना स्वस्त वीज : बावनकुळेचंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मिहान-सेझमधील उद्योगांना जनरेटरवर अवलंबून राहावे लागत होते. आता अखंड वीज येथील उद्योगांना देण्यात येत आहे. त्यांचा युनिट दर ४.४० रुपये असून तो पुढेही कायम राहील. अंबानी यांच्या उद्योगांनाही प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच दरात वीज देण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. मिहान झाले ‘महान’ : देसाईसुभाष देसाई म्हणाले, अनिल अंबानीच्या प्रकल्पामुळे मिहान आज ‘महान’ झाला आहे. ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ची मोहीम यशस्वी करावी लागेल. यासाठी राज्य सरकार उद्योगांना जमीन, वीज आणि अन्य पायाभूत सुविधा देण्यास तयार आहे. मिहानमध्ये धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्क आल्यामुळे विदर्भातील लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल. फडणवीस दूरदृष्टी असणारे नेतेअनिल अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुक्तकंठाणे प्रशंसा केली. फडणवीस यांचा साधेपणा, मैत्रीपूर्ण व्यवहार व काटेकोरपणा वाखाळण्याजोगा आहे. राज्याच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. हा प्रकल्पासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व जमीन हस्तांतरणासाठी दाखविलेली तत्परता प्रशंसनीय आहे. महाराष्ट्र नंबर एकचे राज्य करण्यासाठी रिलायन्सचे त्यांना नेहमी सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.