शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

युवकांना रोजगार मुख्य प्राथमिकता

By admin | Updated: August 29, 2015 03:01 IST

विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे.

नितीन गडकरी : मागास व आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा प्रयत्ननागपूर : विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे. रिलायन्स समूहामुळे औद्योगिक घराणे नागपूर, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल. देशातील मागास आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा सरकारचा प्रयत्न आहे. अलीकडेच गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.(प्रतिनिधी)विमानतळासाठी जागतिक निविदानागपूर विमानतळासाठी लवकरच जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. येथील एमआरओमध्ये मलेशिया, चीन, इंडोनेशिया यासह जगभरातील विमाने देखभाल व दुरुस्तीसाठी यावीत, यासाठी विमान दुरुस्ती कर माफ करावा, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचे गडकरी यांनी सांगितले. उद्योगांना स्वस्त वीज : बावनकुळेचंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मिहान-सेझमधील उद्योगांना जनरेटरवर अवलंबून राहावे लागत होते. आता अखंड वीज येथील उद्योगांना देण्यात येत आहे. त्यांचा युनिट दर ४.४० रुपये असून तो पुढेही कायम राहील. अंबानी यांच्या उद्योगांनाही प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच दरात वीज देण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. मिहान झाले ‘महान’ : देसाईसुभाष देसाई म्हणाले, अनिल अंबानीच्या प्रकल्पामुळे मिहान आज ‘महान’ झाला आहे. ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ची मोहीम यशस्वी करावी लागेल. यासाठी राज्य सरकार उद्योगांना जमीन, वीज आणि अन्य पायाभूत सुविधा देण्यास तयार आहे. मिहानमध्ये धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्क आल्यामुळे विदर्भातील लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल. फडणवीस दूरदृष्टी असणारे नेतेअनिल अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुक्तकंठाणे प्रशंसा केली. फडणवीस यांचा साधेपणा, मैत्रीपूर्ण व्यवहार व काटेकोरपणा वाखाळण्याजोगा आहे. राज्याच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. हा प्रकल्पासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व जमीन हस्तांतरणासाठी दाखविलेली तत्परता प्रशंसनीय आहे. महाराष्ट्र नंबर एकचे राज्य करण्यासाठी रिलायन्सचे त्यांना नेहमी सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.