शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना रोजगार मुख्य प्राथमिकता

By admin | Updated: August 29, 2015 03:01 IST

विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे.

नितीन गडकरी : मागास व आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा प्रयत्ननागपूर : विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे. रिलायन्स समूहामुळे औद्योगिक घराणे नागपूर, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल. देशातील मागास आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा सरकारचा प्रयत्न आहे. अलीकडेच गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.(प्रतिनिधी)विमानतळासाठी जागतिक निविदानागपूर विमानतळासाठी लवकरच जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. येथील एमआरओमध्ये मलेशिया, चीन, इंडोनेशिया यासह जगभरातील विमाने देखभाल व दुरुस्तीसाठी यावीत, यासाठी विमान दुरुस्ती कर माफ करावा, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचे गडकरी यांनी सांगितले. उद्योगांना स्वस्त वीज : बावनकुळेचंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मिहान-सेझमधील उद्योगांना जनरेटरवर अवलंबून राहावे लागत होते. आता अखंड वीज येथील उद्योगांना देण्यात येत आहे. त्यांचा युनिट दर ४.४० रुपये असून तो पुढेही कायम राहील. अंबानी यांच्या उद्योगांनाही प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच दरात वीज देण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. मिहान झाले ‘महान’ : देसाईसुभाष देसाई म्हणाले, अनिल अंबानीच्या प्रकल्पामुळे मिहान आज ‘महान’ झाला आहे. ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ची मोहीम यशस्वी करावी लागेल. यासाठी राज्य सरकार उद्योगांना जमीन, वीज आणि अन्य पायाभूत सुविधा देण्यास तयार आहे. मिहानमध्ये धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्क आल्यामुळे विदर्भातील लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल. फडणवीस दूरदृष्टी असणारे नेतेअनिल अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुक्तकंठाणे प्रशंसा केली. फडणवीस यांचा साधेपणा, मैत्रीपूर्ण व्यवहार व काटेकोरपणा वाखाळण्याजोगा आहे. राज्याच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. हा प्रकल्पासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व जमीन हस्तांतरणासाठी दाखविलेली तत्परता प्रशंसनीय आहे. महाराष्ट्र नंबर एकचे राज्य करण्यासाठी रिलायन्सचे त्यांना नेहमी सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.